शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेतून पाठविण्यात येणारे सामान ‘रामभरोसे’: नागरिकांच्या तक्रारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2019 08:00 IST

देशभरात रेल्वेचे जाळे मोठ्या प्रमाणावर पसरले आहे. प्रवासी सेवेबरोबरच सामानाची ने-आण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.

ठळक मुद्देरेल्वेकडून सामानाची वाहतुक करण्याचे दर निश्चितदोन ठिकाणांमधील अंतर व सामानाच्या वजनानुसार नागरिकांकडून शुल्क सामान पार्सल कार्यालयात दिल्यानंतर प्रवाशांचा अनेकदा गोंधळ

फरफट सामानाची भाग १- राजानंद मोरे- पुणे : रेल्वेमधून पाठविण्यात येणाऱ्या सामानाचा ठावठिकाणा लावता-लावता नागरिकांच्या नाकीनऊ येत असल्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. नागरिकांना वेळेवर सामान न मिळणे, सामान गहाळ होणे, परत येणे, जादा पैसे घेणे अशा तक्रारी केल्या जात आहेत. सामानाचे ठिकाण कळण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने नागरिकांना थेट रेल्वे स्थानकावरच खेटे घालावे लागत आहेत. देशभरात रेल्वेचे जाळे मोठ्या प्रमाणावर पसरले आहे. प्रवासी सेवेबरोबरच सामानाची ने-आण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. त्यासाठी रेल्वेकडून सामानाची वाहतुक करण्याचे दर निश्चित करण्यात आले आहेत. दोन ठिकाणांमधील अंतर व सामानाच्या वजनानुसार नागरिकांकडून शुल्क घेतले जाते. पण, नागरिकांनी एकदा हे सामान पार्सल कार्यालयात दिल्यानंतर त्याचा ठावठिकाणा प्रवाशांना समजत नसल्याने अनेकदा गोंधळ उडतो. अनेकदा नियोजित स्थानकावर सामान वेळेवर पोहचत नसल्याचा अनुभव प्रवाशांना येतो. काही नागरिकांचे सामान गहाळ झाल्याच्याही तक्रारी रेल्वेकडे येतात. याबाबत पार्सल कार्यालयाकडूनही योग्य उत्तरे मिळत नसल्याबद्दल नागरिक नाराजी व्यक्त करतात.कोंढवा येथे राहणारे गौरव सिंग यांचे पार्सलने दरभंगा एक्सप्रेसने दोन फेऱ्या मारल्या आहेत. त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, पुणे-दरभंगा एक्सप्रेसने दि. १ मे रोजी २० किलो वजनाचे एक पार्सल पाठविले होते. मुजफ्फरपुर येथे वडीलांना हे सामान मिळाले नाही. चौकशी केली असता दि. ५ मे रोजी हे पार्सल परत आले होते. पुन्हा दि. ८ मेला पार्सल त्याच गाडीने पाठविले. पुन्हा तोच अनुभव आला. पुणे पार्सल कार्यालयात चौकशी केल्यानंतर मुजफ्फरपुर स्थानकात हे सामान उतरविले गेले नाही, असे सांगितले. दि. १५ मेला पुन्हा त्याच गाडीत सामान पाठविले आहे. आतातरी हे सामान उतरविले आहे किंवा नाही, याबाबत पुणे कार्यालयात चौकशी करावी लागणार आहे. सामानामध्ये देवघर व इतर साहित्य आहे. एवढ्यावेळा चढ-उतार करण्यात आल्याने त्याची मोडतोड झाल्याची शक्यता आहे. हा अनुभव अत्यंत वाईट आहे.--------------------

सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या अभिषेक गुप्ता यांनी आग्रा येथून दि. ९ मे रोजी दुचाकी पुण्यात पाठविण्यासाठी दिली होती. आग्राहून रेल्वेने पुण्यात येण्यासाठी साधारणपणे २२ ते २४ तास लागतात. पण गुप्ता यांची दुचाकी १६ तारखेपर्यंत पुण्यात आली नाही. पुणे स्थानकावर दुरध्वनीवर विचारले असता माहिती नसल्याचे सांगितले. मग त्यांनी टिष्ट्वटरवर ही माहिती टाकल्यानंतर दि. १६ मे रोजी दुचाकी आग्रा स्थानकातून पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.सुनिता सुराणा यांच्या नावाने उदयपुर येथून दि. ६ मे रोजी २९ किलो वजनाचे घरगुती सामान पार्सल केले होते. पण त्यांना हे पार्सल पुण्यात १३ तारखेपर्यंत मिळाले नाही, त्यामुळे पुण्यातील दक्षा सुराणा यांनी तक्रारही केली. टिष्ट्वटरवरही त्यांनी याची माहिती दिली. पण त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. याबाबत त्यांनी तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे. असे अनुभव प्रवाशांना सातत्याने येत आहेत.

नागरिकांना मिळत नाही माहितीसामान बुक केल्यानंतर त्याचा ठावठिकाणा नागरिकांना समजावा यासाठी रेल्वेकडे कोणतीही यंत्रणा नाही. नागरिकांना थेट पार्सल कार्यालयात जाऊन चौकशी करावी लागते. सामान नियोजित ठिकाणी पोहचले की नाही याची माहिती मिळत नाही. रेल्वेकडून त्यांच्या सोयीनुसार पार्सल पाठविले जाते. पण ते कधी गाडीत पाठविले, कधी पोहचणार हे कळविले जात नाही. त्यामुळे प्रवाशांना पार्सल कार्यालयात खेटे मारावे लागत आहेत. ही यंत्रणा रेल्वे निर्माण करावी अशी अपेक्षा अभिषेक गुप्ता यांनी व्यक्त केली.

टॅग्स :PuneपुणेIndian Railwayभारतीय रेल्वे