शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांमध्ये ११८ परदेशी नागरिकांना दिले भारतीय नागरिकत्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 06:00 IST

नागरिकत्व मिळालेल्यांमध्ये सर्वांधिक ११७ पाकिस्तानचे तर एक बांगलादेशचा नागरिक 

ठळक मुद्दे नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूरपाकिस्तान, बांगलादेश आणि अफगणिस्तान या देशामधून आलेले नागरिक ‘लॉग टर्म व्हिस’ वर

सुषमा नेहरकर-शिंदेपुणे : केंद्र शासनाने सन २०१६ आणि १८ मध्ये प्रकाशित केलेल्या राजपत्रामध्ये राज्यात वास्तव्यास असणारे हिंदू, शिख, बौध्द, जैन, पारसी आणि ख्रिश्चन वर्गातील अल्पसंख्यांक पाकिस्तानी, बांगलादेशी आणि अफगाणी नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. या अधिकाराचा वापर करुन पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या सुमारे ११८ परदेशी नागरिकांना भारतीय नागरिक्तव देण्यात आले असल्याची माहिती अधिकृत सुत्रांनी दिली.     केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मांडलेले नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाले. या वादग्रस्त विधेयकामध्ये पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशांमधील अल्पसंख्यांकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद करण्यात आली आहे. परंतु विधेयक मंजूर झाल्यानंतर याबाबत विधेयकाच्या बाजूने आणि विरोधामध्ये जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात गेल्या दोन-तीन वर्षांत किती परदेशी नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले याबाबतचा आढावा घेण्यात आला. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगणिस्तान या देशामधून आलेले नागरिक ‘लॉग टर्म व्हिस’ वर जिल्ह्यात ग्रामीण भागात, पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये राहत आहेत. या सर्व नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्याचे अधिकार केंद्र शासनाने पुणे जिल्ह्यात जिल्हाधिका-यांना दिले आहेत. त्यानुसार सन २०१६ मध्ये जिल्हा प्रशासनाने २१ नागरिकांना आणि २०१७ ते २०१९ मध्ये एकूण १६९ नागरिकांना भारतीय नागरिकत्व मिळावे यासाठी अर्ज केला होता. भारतीय नागरिकत्व देण्यापूर्वी सर्व कागदपत्रांची छाननी करण्यात आली. गुप्तचर विभागाकडूनही (आयबी) तपासणी करण्यात आली. कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर ९७ नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले. अद्याप ५२ लोकांचे प्रस्ताव प्रलंबित असून, कागदपत्रांची खात्री करुन घेण्यात येत आहे.            सध्या पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्याच्या काही भागात पाकिस्तान, बांगलादेश आणि आफगणिस्तान येथील नागरिक 'लाँग टर्म व्हिसा' वर राहत आहेत. यात पाकिस्तान, बांगलादेशाचे नागरिकत्व असल्याने त्यांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. प्रत्येक वेळी त्यांना पासपोर्ट, व्हिसाचे नूतनीकरण करणे आणि अन्य सरकारी सोपस्कार पार पाडावे लागत होते. परंतु भारतीय नागरिकत्व मिळाल्याने आता या नागरिकांची या सर्व त्रासातून सुटका झाली आहे. 

टॅग्स :PuneपुणेAfghanistanअफगाणिस्तानPakistanपाकिस्तानBangladeshबांगलादेश