शहरं
Join us  
Trending Stories
1
Satara Crime: महिला डॉक्टरने थेट सातारच्या डीएसपींनाही फोन केलेला...; आतेभावाच्या आरोपाने खळबळ
2
पीएसआय गोपाल बदने अद्यापही फरार, बनकर पहाटे सापडला; महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट
3
IND vs AUS : गिलनं पुन्हा गमावला टॉस; युवा ऑलराउंडर दुखापतीमुळे OUT; कुलदीपसह प्रसिद्ध कृष्णाला संधी
4
टाटा मोटर्सचं नाव बदललं, आता 'या' नावाने शेअर बाजारात ओळखली जाणार कंपनी; डिमर्जरनंतर झाला मोठा बदल
5
सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या अणुशास्त्रज्ञाला वाचविले; सीआयएच्या माजी अधिकाऱ्याचे सनसनाटी गौप्यस्फोट 
6
SIP Investment: एका वर्षात एसआयपीनं भरला खिसा, मागील दिवाळीनंतर या ५ म्युच्युअल फंडांनी दिला २०% पेक्षा जास्त रिटर्न
7
"सलमान खानसोबत चित्रपट करणार नाही"; महेश मांजरेकरांचं मोठं विधान, म्हणाले- "मी त्याला शिवी..."
8
महागठबंधन नव्हे महालठबंधन, NDA मोडणार सर्व विक्रम; PM मोदींनी फुंकले प्रचाराचे रणशिंग
9
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, पतीने पत्नीला कुऱ्हाडीनं कापलं! नंतर पोलीस स्टेशनला जाऊन म्हणाला..
10
आजचे राशीभविष्य २५ ऑक्टोबर २०२५ : आठ राशींसाठी आजचा दिवस चांगला, इतर...
11
जान्हवी कपूर विवाहबंधनात अडकणार? अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल; लग्नाची तारीख सांगितल्याची चर्चा
12
५ दिवस पुन्हा अवकाळी; उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी, ‘या’ ठिकाणी यलो अलर्ट
13
“...आता राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ राबविणार”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
देवाकडून मार्गदर्शन मागणे म्हणजे फसवणूक नाही; राम मंदिरचा निर्णय अवैध ठरवायची याचिका फेटाळली
15
भारत व्यापार करार दबावाखाली करत नाही; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेला ठणकावले
16
लोकपाल सदस्यांना बीएमडब्ल्यू देण्यावरून राजकारण तापले; आता स्वदेशी चळवळीचे काय झाले?
17
कोणत्याही शत्रूला कमी न लेखता लष्करी जवानांनी सदैव सतर्क राहावे: संरक्षण मंत्री राजनाथसिंह
18
“तेजस्वी मुख्यमंत्री म्हणजे बिहारचे लोक मुख्यमंत्री”; पहिल्या दिवसापासूनच प्रचार धडाका
19
“राजदचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर बिहारमध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी”: अमित शाह
20
बिहार निवडणूक २०२५: दुसऱ्या टप्प्यात १२२ जागा, १३०२ जण रिंगणात; १३७२ उमेदवारांचे अर्ज वैध

जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांमध्ये ११८ परदेशी नागरिकांना दिले भारतीय नागरिकत्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 06:00 IST

नागरिकत्व मिळालेल्यांमध्ये सर्वांधिक ११७ पाकिस्तानचे तर एक बांगलादेशचा नागरिक 

ठळक मुद्दे नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूरपाकिस्तान, बांगलादेश आणि अफगणिस्तान या देशामधून आलेले नागरिक ‘लॉग टर्म व्हिस’ वर

सुषमा नेहरकर-शिंदेपुणे : केंद्र शासनाने सन २०१६ आणि १८ मध्ये प्रकाशित केलेल्या राजपत्रामध्ये राज्यात वास्तव्यास असणारे हिंदू, शिख, बौध्द, जैन, पारसी आणि ख्रिश्चन वर्गातील अल्पसंख्यांक पाकिस्तानी, बांगलादेशी आणि अफगाणी नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. या अधिकाराचा वापर करुन पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या सुमारे ११८ परदेशी नागरिकांना भारतीय नागरिक्तव देण्यात आले असल्याची माहिती अधिकृत सुत्रांनी दिली.     केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मांडलेले नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाले. या वादग्रस्त विधेयकामध्ये पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशांमधील अल्पसंख्यांकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद करण्यात आली आहे. परंतु विधेयक मंजूर झाल्यानंतर याबाबत विधेयकाच्या बाजूने आणि विरोधामध्ये जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात गेल्या दोन-तीन वर्षांत किती परदेशी नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले याबाबतचा आढावा घेण्यात आला. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगणिस्तान या देशामधून आलेले नागरिक ‘लॉग टर्म व्हिस’ वर जिल्ह्यात ग्रामीण भागात, पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये राहत आहेत. या सर्व नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्याचे अधिकार केंद्र शासनाने पुणे जिल्ह्यात जिल्हाधिका-यांना दिले आहेत. त्यानुसार सन २०१६ मध्ये जिल्हा प्रशासनाने २१ नागरिकांना आणि २०१७ ते २०१९ मध्ये एकूण १६९ नागरिकांना भारतीय नागरिकत्व मिळावे यासाठी अर्ज केला होता. भारतीय नागरिकत्व देण्यापूर्वी सर्व कागदपत्रांची छाननी करण्यात आली. गुप्तचर विभागाकडूनही (आयबी) तपासणी करण्यात आली. कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर ९७ नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले. अद्याप ५२ लोकांचे प्रस्ताव प्रलंबित असून, कागदपत्रांची खात्री करुन घेण्यात येत आहे.            सध्या पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्याच्या काही भागात पाकिस्तान, बांगलादेश आणि आफगणिस्तान येथील नागरिक 'लाँग टर्म व्हिसा' वर राहत आहेत. यात पाकिस्तान, बांगलादेशाचे नागरिकत्व असल्याने त्यांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. प्रत्येक वेळी त्यांना पासपोर्ट, व्हिसाचे नूतनीकरण करणे आणि अन्य सरकारी सोपस्कार पार पाडावे लागत होते. परंतु भारतीय नागरिकत्व मिळाल्याने आता या नागरिकांची या सर्व त्रासातून सुटका झाली आहे. 

टॅग्स :PuneपुणेAfghanistanअफगाणिस्तानPakistanपाकिस्तानBangladeshबांगलादेश