शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

G20 Summit In India: 'जी-२०' परिषदेची एक बैठक पुण्यात होणार, २० देशांचे तब्बल ३०० मंत्री येणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 23:12 IST

भारत देशाने जगातील विविध विकसित देशांचा सहभाग असलेल्या ‘जी-२०’ परिषदेचे यजमान पद यंदा स्वीकारले असून, पुण्यात या परिषदेची एक बैठक होणार आहे.

पुणे :

भारत देशाने जगातील विविध विकसित देशांचा सहभाग असलेल्या ‘जी-२०’ परिषदेचे यजमान पद यंदा स्वीकारले असून, पुण्यात या परिषदेची एक बैठक होणार आहे. यावेळी परदेशी पाहुणे पुण्यात दाखल होणार असून, पुण्यातील इतिहास, वैविध्यपूर्ण संस्कृती ते जाणून घेणार आहेत.    डिसेंबर , २०२२ पासून सुरू होणाऱ्या व भारतात होणाऱ्या ‘जी-२०’ परिषदेच्या विविध बैठका पैकी, महाराष्ट्र राज्यात मुंबई व पुणे येथे प्रत्येकी एक बैठक घेतली जाणार आहे. यानुसार केंद्र सरकारच्या पथकाने बुधवारी पुणे भेटीत या मंत्र्यांसाठी राहण्याची व्यवस्था, त्यांची वाहन, सुरक्षा व्यवस्था तसेच संभाव्य कार्यक्रमांच्या अनुषंगाने चाचपणी केली आहे.  

‘जी-२०’ परिषदेच्या निमित्ताने पुण्यात या २० देशांतील ३०० मंत्री दाखल होणार असून ते पुण्यातील इतिहास, वैविध्यपूर्ण संस्कृती जाणून घेणार आहेत. याकरिता केंद्र  सरकारचे पथक आज पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी  विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता व महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांची भेट घेत या परिषदेच्या नियोजन विषयक चर्चा केली.

‘भारताला २०२२ साली स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षं पूर्ण होणार आहेत. भारत देश जगात सगळ्यांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असून येथे येऊन भारताचा समृद्ध इतिहास आणि वैविध्यपूर्ण संस्कृती जाणून घ्या आणि भारताच्या पाहुणचाराचाही आस्वाद घ्या,’ असे मोदींनी ट्विटद्वारे आवाहन केले होते. त्यानुसार केंद्र सरकारच्या पथकानेही पुण्यातील कार्यक्रमांची आखणी करताना ऐतिहासिक स्थळांची आवर्जुन माहिती घेतली आहे. यावेळी ‘जी-२०’ गटातील शक्तीशाली २० देशांच्या ३०० मंत्र्यांचे पुणे सफर होणार आहे. यावेळी आलेल्या पाहुण्यांना पुण्यातील संस्कृती व ऐतिहासिक वारसा दाखवितानाच, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आज आलेल्या केंद्रीय पथकाने सर्व पाहणी केली. यात आलेल्या पाहुण्यांची निवास व्यवस्था, प्रवास व्यवस्था करण्यासाठी व्ही व्हीआयपी गाड्या यांची व्यवस्था करण्याबाबत स्थानिक यंत्रणेला सूचित केले आहे.

डिसेंबर २०२२ पासून ही परिषद होणार असली तरी याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये पुण्याचा समावेश करण्यात आल्याने, या परिषदेच्या माध्यमातून पुण्याच्या नावलौकिकात आणखी एक मनाचा तुरा बसणार आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी