शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

भारताने स्वत:चा आवाज तयार करायला हवा- पररराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर 

By भाग्यश्री गिलडा | Updated: November 25, 2023 17:18 IST

आपली संस्कृती आपला इतिहास याकडे खुल्या नजरेने पहायला हवे. असे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले...

पुणे : पुण्यातील सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या वतीने "आंतरराष्ट्रीय संबंध" परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे उदघाटन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस.जयशंकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी देशाच्या धोरणात्मक संस्कृती- जागतिक आणि प्रादेशिक आव्हानांना संबोधित केले. भारताने स्वत:चा आवाज तयार करायला हवा. त्यासाठी आपली संस्कृती आपला इतिहास याकडे खुल्या नजरेने पहायला हवे. असे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

स्वातंत्र्यानंतर जपान, चीन आणि भारताबद्दल बोलायचे झाले तर आपण डॉमिनेट करणाऱ्यांचे कल्चर कॉपी केले आहे. परराष्ट्रीय धोरण हे अनेक अनियंत्रित घटकांवर अवलंबून असते आणि म्हणून आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील आपली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कोणत्याही देशाला कालबद्ध तसेच योजनाबद्ध असे आखीव धोरण ठरवणे शक्य नसते. या दृष्टीतून परराष्ट्रीय धोरणाची तुलना स्वयंचलित जहाजापेक्षा नौकानयनाशी करता येण्यासारखी आहे, असे ते म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले, राज्यकर्त्यालाही आपले ध्येय साध्य करण्यासाठी, नियंत्रणाबाहेर असलेले अनेक घटक, वरचेवर घडणाऱ्या अकल्पित घटना लक्षात घेऊन आपल्या धोरणाची दिशा आणि डावपेच ठरवावे लागतात. अर्थात परराष्ट्रीय धोरण परिणामकारक होण्यासाठी त्यात एकसूत्रता आणि लवचिकपणा हे दोन्ही गुण आवश्यक असतात. परराष्ट्रीय धोरणाचे सत्तासमतोल हे सुद्धा पारंपरिक साधन मानले जाते. त्याचे अनेक अर्थ असले, तरी साधारणपणे आंतरराष्ट्रीय क्षेत्रात कोणताही एक देश अतिबलशाली होऊ नये, यासाठी केलेली राष्ट्रांची युती अथवा केलेले करार, असा याचा अर्थरूढ आहे. सतराव्या शतकापासून ते विसाव्या शतकापर्यंत इंग्लंडने युरोपातील राष्ट्रांमध्ये समतोल राखण्याची भूमिका बजाविली होती. असे प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी केले.

डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी परराष्ट्र धोरणासाठी सांस्कृतीक देवाणघेवान महत्त्वाची असल्याचे नमूद केले. पुण्याची सांस्कृतिक देवाणघेवाण आणि सिंबायोसिसची पाया देशाच्या सांस्कृतिक परराष्ट्र धोरणात महत्त्वाचे योगदान देत आहे. असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी सिंबायोसिसचे संस्थापक डॉ. शां.ब. मुजुमदार, कुलगुरू डॉ. रामकृष्ण रमण आणि डॉ. विद्या येरवडेकर उपस्थित होते.

टॅग्स :Puneपुणेsymbiosisसिंबायोसिस