शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

तिरंदाजी खेळाला भारतात मोठा इतिहास :ए. एस. क्रुझ, राष्ट्रीय अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 19:01 IST

सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्डच्या आणि आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या संयुक्त विद्यमाने आणि भारतीय तिरंदाजी महासंघाच्या मान्यतेने राष्ट्रीय तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेला गुरुवारी पुण्यात दिमाखात सुरवात झाली.

ठळक मुद्देया स्पर्धेत इंडियन राउंड,रिकर्व्ह आणि कंपाउंड राऊंड मध्ये स्पर्धक आपले नशीब आजमावणारस्पर्धेचे उद्घाटन लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. एस. ए. क्रुझ यांच्या हस्ते या स्पर्धेत राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि इतर असे ३९ संघ सहभागी

पुणे: युद्धाप्रमाणे खेळातही नियोजन, तयारी आणि अभ्यास महत्वाचा असतो. यामुळे खेळाडू हा सशक्त बनतो. परिणामी कुठल्याही परिस्थितीत तो खेळु शकतो. भारतात नेमबाजी आणि तिरंदाजी या खेळांना इतिहास आहे. गेल्या काही वषार्तील कामगिरी बघता भारताच्या नावाने हे खेळ जगात ओळखू जाऊ लागले आहे, असे प्रतिपादन निवृत्त लेफ्टनंत जनरल तसेच क्रीडा प्रकारातील वैद्यकीय तज्ज्ञ ए. एस. क्रुझ यांनी केले. सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्डच्या आणि आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या संयुक्त विद्यमाने आणि भारतीय तिरंदाजी महासंघाच्या मान्यतेने राष्ट्रीय तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेला गुरुवारी पुण्यात दिमाखात सुरवात झाली. ही स्पर्धा आर्मी इन्स्टिट्यूटच्या मुंढवा रोड येथील आउटडोअर रेंज वर १२ एप्रिल पर्यंत सुरु असणार आहे. या स्पर्धेत इंडियन राउंड,रिकर्व्ह आणि कंपाउंड राऊंड मध्ये स्पर्धक आपले नशीब आजमावणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. एस. ए. क्रुझ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ब्रिगेडीयर (निवृत्त) पिकेएम राजा, आणि भारतीय तिरंदाजी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे तसेच स्पधेर्चे उदघाटक म्हणून क्रूझ बोलत होते. क्रूझ म्हणाले, भारतीय खेळाडूंच्या रक्तात पूर्वजांचे गुण आहेत. यामुळे ते चांगली कामगिरी करू शकतात. यासाठी त्यांना चांगल्या मार्गदर्शनाची गरज आहे. आर्मी स्पोर्ट इन्स्टिट्युशनतर्फे हे काम चांगल्या पद्धतीने केले जात आहे.लेफ्टनंट कर्नल ए.एन. झा यांनी स्पर्धेची माहिती देतांना सांगितले,या स्पर्धेत राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि इतर असे ३९ संघ सहभागी होत असून ९०० तिरंदाज सुवर्ण,रौप्य, आणि कांस्य पदकांसाठी आपले नशीब आजमावणार आहे. महिला, पुरुष आणि मिश्र अशा ६ विविध गटात विजेतेपद आणि एक सर्वसाधारण विजेतेपद असणार आहे.१२ एप्रिल पर्यंत सुरु असणाºया या स्पर्धेत इंडियन राउंड राष्ट्रीय पातळीवर संपुष्टात येणार असून रिकर्व्ह आणि कंपाउंड प्रकारातील पहिल्या ८ मध्ये येणारे खेळाडू २०१८ मध्ये होणाºया आशियाई स्पर्धेच्या चाचणी स्पर्धेसाठी पात्र ठरतील. या स्पर्धेच्या रिकर्व्ह इव्हेंटमध्ये तरुणदीप राय, जयंता तालुकदार, राहुल बॅनर्जी, मंगल सिंग चंपिया, अंतनु दास,दीपिका कुमारी, एमएस एल बम्बलादेवी,लक्ष्मी रानी माझी, एमएस रिमेल बरुली आणि एमएस व्ही. पॅनेटा या सारख्या ३० हुन अधिक आंतरराष्ट्रीय तिरंदाजांच्या निशाणेबाजीचा अनुभव पुणेकरांना घेता येईल. 

टॅग्स :PuneपुणेSportsक्रीडाGold medalसुवर्ण पदक