शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

जगात सर्पदंशाचे सर्वाधिक रुग्ण भारतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:13 IST

-- नागपंचमी विशेष अशोक खरात : खोडद जगात सर्वाधिक सर्पदंश भारतात होत असून सर्पदंशामध्ये शेतकऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. दरवर्षी ...

--

नागपंचमी विशेष

अशोक खरात : खोडद

जगात सर्वाधिक सर्पदंश भारतात होत असून सर्पदंशामध्ये शेतकऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. दरवर्षी जगभरात ५० ते ६० लाख लोकांना सर्पदंश होतो, तर त्यापैकी २७ ते ३० लाख लोकांना विषबाधा होते ८० हजार ते १ लाख ३८ हजार लोकांनाच सर्पदंशामुळे मृत्यू होतो. सर्पदंशामुळे ४ लाखांपेक्षा अधिक लोकांना कायमचे अपंगत्व येते. अनेक रुग्णांमचे हात किंवा पाय काढून टाकावे लागतात तर काहींमध्ये मध्ये दृष्टी दोष निर्माण होतात किंवा दोन्ही किडन्या कायमस्वरूपी निकाम्या होतात. काही रुग्णांना सतत मानसिक त्रास होतो आणि याचे दुष्परिणाम अनेक वर्षांपर्यंत राहतात. जगात सर्पदंशाने होणाऱ्या मृत्यूपैकी जवळपास ५० टक्के मृत्यू भारतात होतात. भारतात दरवर्षी सरासरी ५८ हजार रुग्णांचा सर्पदंशाने मृत्यू होतो अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्य व सर्पदंश तज्ज्ञ सदानंद राऊत यांनी सांगितले.

नागपंचमी सणानिमित्त भारतातील सर्पदंशाबद्दल त्यांच्याशी बातचीत केली त्यावेळी ते बोलत होते. जुन्नर व आंबेगाव तालुक्यात २००५ पासून डॉ. सदानंद राऊत व डॉ. पल्लवी राऊत यांनी ''शून्य सर्पदंश मृत्यूदर प्रकल्प'' सुरू केला आहे. त्याअंतर्गत आदिवासी वाडी, वस्ती, शाळा, महाविद्यालये, आशा वर्कर, वनकर्मचारी यांना विषारी व बिनविषारी सर्प ओळखणे, सर्पदंश होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी, प्रथमोपचार या विषयी व्याख्याने व माहितीपटांच्या द्वारे माहिती देऊन त्यांच्यात प्रबोधन केले जाते.

डॉ. राऊत म्हणाले की, शिक्षणाचा अभाव ,सर्पदंशाविषयी गैरसमज, जनजागृतीचा अभाव, अंधश्रद्धा यामुळे सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. सर्पदंश हा आजार अतिदुर्लक्षित आजार आहे. सर्पदंश साधारणपणे शेतकरी, शेतमजूर, मेंढपाळ, सर्पमित्र, शिकारी, आदिवासी, मच्छिमार यांना होतो. बहुतांश रुग्ण हे कुटुंबातील कर्ते तरुण , महिला व मुले असतात. जागतिक आरोग्य संघटनेने २०१७ मध्ये जिनिव्हा येथील परिषदेत सर्पदंशाची अतिदुर्लक्षित आजारांमध्ये गणना केली आहे.

--

कोट

सर्पदंश झाल्यानंतर प्रथमोपचाराविषयी अज्ञान व अपुरे ज्ञान, सर्पदंश झाल्यानंतर तातडीने आणि योग्य ते उपचार उपलब्ध न होणे, प्रशिक्षित वैद्यकीय व खासगी डॉक्टरांची अनुउपलब्धतता याच्यामुळे भारतात सर्पदंशामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.जागतिक आरोग्य संघटनेने सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण २०३० पर्यंत ५० टक्क्यांवर आणण्याचे ठरवले आहे.

डॉ. सदानंद राऊत, नारायणगाव

तज्ज्ञ सर्पदंशसमिती, जागतिक आरोग्य संघटना