शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

जगात सर्पदंशाचे सर्वाधिक रुग्ण भारतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:13 IST

-- नागपंचमी विशेष अशोक खरात : खोडद जगात सर्वाधिक सर्पदंश भारतात होत असून सर्पदंशामध्ये शेतकऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. दरवर्षी ...

--

नागपंचमी विशेष

अशोक खरात : खोडद

जगात सर्वाधिक सर्पदंश भारतात होत असून सर्पदंशामध्ये शेतकऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. दरवर्षी जगभरात ५० ते ६० लाख लोकांना सर्पदंश होतो, तर त्यापैकी २७ ते ३० लाख लोकांना विषबाधा होते ८० हजार ते १ लाख ३८ हजार लोकांनाच सर्पदंशामुळे मृत्यू होतो. सर्पदंशामुळे ४ लाखांपेक्षा अधिक लोकांना कायमचे अपंगत्व येते. अनेक रुग्णांमचे हात किंवा पाय काढून टाकावे लागतात तर काहींमध्ये मध्ये दृष्टी दोष निर्माण होतात किंवा दोन्ही किडन्या कायमस्वरूपी निकाम्या होतात. काही रुग्णांना सतत मानसिक त्रास होतो आणि याचे दुष्परिणाम अनेक वर्षांपर्यंत राहतात. जगात सर्पदंशाने होणाऱ्या मृत्यूपैकी जवळपास ५० टक्के मृत्यू भारतात होतात. भारतात दरवर्षी सरासरी ५८ हजार रुग्णांचा सर्पदंशाने मृत्यू होतो अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्य व सर्पदंश तज्ज्ञ सदानंद राऊत यांनी सांगितले.

नागपंचमी सणानिमित्त भारतातील सर्पदंशाबद्दल त्यांच्याशी बातचीत केली त्यावेळी ते बोलत होते. जुन्नर व आंबेगाव तालुक्यात २००५ पासून डॉ. सदानंद राऊत व डॉ. पल्लवी राऊत यांनी ''शून्य सर्पदंश मृत्यूदर प्रकल्प'' सुरू केला आहे. त्याअंतर्गत आदिवासी वाडी, वस्ती, शाळा, महाविद्यालये, आशा वर्कर, वनकर्मचारी यांना विषारी व बिनविषारी सर्प ओळखणे, सर्पदंश होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी, प्रथमोपचार या विषयी व्याख्याने व माहितीपटांच्या द्वारे माहिती देऊन त्यांच्यात प्रबोधन केले जाते.

डॉ. राऊत म्हणाले की, शिक्षणाचा अभाव ,सर्पदंशाविषयी गैरसमज, जनजागृतीचा अभाव, अंधश्रद्धा यामुळे सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. सर्पदंश हा आजार अतिदुर्लक्षित आजार आहे. सर्पदंश साधारणपणे शेतकरी, शेतमजूर, मेंढपाळ, सर्पमित्र, शिकारी, आदिवासी, मच्छिमार यांना होतो. बहुतांश रुग्ण हे कुटुंबातील कर्ते तरुण , महिला व मुले असतात. जागतिक आरोग्य संघटनेने २०१७ मध्ये जिनिव्हा येथील परिषदेत सर्पदंशाची अतिदुर्लक्षित आजारांमध्ये गणना केली आहे.

--

कोट

सर्पदंश झाल्यानंतर प्रथमोपचाराविषयी अज्ञान व अपुरे ज्ञान, सर्पदंश झाल्यानंतर तातडीने आणि योग्य ते उपचार उपलब्ध न होणे, प्रशिक्षित वैद्यकीय व खासगी डॉक्टरांची अनुउपलब्धतता याच्यामुळे भारतात सर्पदंशामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.जागतिक आरोग्य संघटनेने सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण २०३० पर्यंत ५० टक्क्यांवर आणण्याचे ठरवले आहे.

डॉ. सदानंद राऊत, नारायणगाव

तज्ज्ञ सर्पदंशसमिती, जागतिक आरोग्य संघटना