शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

पाच दशकानंतर लढाऊ विमानाद्वारे पाकिस्तानवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 21:36 IST

१९७१ च्या युद्धानंतर भारतीय हवाई दलाच्या विमानांनी गेल्या पाच दशकानंतर पहिल्यांदा बॉम्ब हल्ले केले. सुखोई पाठोपाठ भारतीय हवाई दलातील प्रमुख स्ट्राईक विमानांपैकी एक असलेल्या मिराज २०००   विमाने ही शत्रुच्या रडार पासून दुर राहत लक्ष्याचा अचूक वेध घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

पुणे : १९७१ च्या युद्धानंतर भारतीय हवाई दलाच्या विमानांनी गेल्या पाच दशकानंतर पहिल्यांदा बॉम्ब हल्ले केले. सुखोई पाठोपाठ भारतीय हवाई दलातील प्रमुख स्ट्राईक विमानांपैकी एक असलेल्या मिराज २०००   विमाने ही शत्रुच्या रडार पासून दुर राहत लक्ष्याचा अचूक वेध घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ही विमाने फ्रान्सच्या दसाल्ट कंपनीने बनविली असून विमानाच्या या कौशल्यामुळे पाकिस्तानमधील दहशतवादी तळावर हल्ले करण्यासाठी या विमानांचा वापर करण्यात आला. 

                   मिराज २००० हे मल्टी रोल स्ट्राईक लढाऊ विमाने आहेत. गेल्या ३० वर्षाच्या काळात ५८३ मिराज विमाने वनविण्यात आले आहेत. १९९९ च्या कारगील युद्धात मिराज विमानांनी आपली क्षमता या आधी सिद्ध केली आहे. या युद्धात गायडेड बॉम्बचा वापर करत पाकिस्तानी सैन्याची बंकर भारतीय सैनीकांनी अचूक टिपली होती. लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची क्षमता, कमी उंचीवरून उडण्याचे कौशल्य तसेच अनेक क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता या विमानांमध्ये असल्याने जगातील  प्रमुख लढाऊ विमानांमध्ये या मिराजची गनना होते.

             मिराज हे सिंगल इंजीन असलेले विमान आहे. त्यात रडास डॉप्लर मल्टी टारगेट हे तंत्रज्ञान वापरण्यात आले असून यामुळे लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची क्षमता या विमानात आहे. लांब पल्यांच्या मोहिमांसाठी या विमानांचा वापर केला जाऊ शकतो. १९८५ नंतर भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात ही विमाने दाखल झाली. कारगील युद्धातली अतिऊंचावरून गायडेड बॉम्ब शत्रुच्या बंकरवर टाकून पाकिस्तानी सैन्याला  भारतीय वैमानिकांनी सळो की पळो करून सोडले होते. २००४ नंतर हवाई दलात या विमानांची स्कॉर्डन आणखी वाढविण्यात आल्या. या विमानांच्या आधूनिकीकरणासाठी २०११ मध्ये जवळपास २.२ बिलीअन डॉलर्सची गुंतवणूक भारत सरकारतर्फे करण्यात  आली. क्षेपणास्त्र तसेच मोठ्या वजनाचे बॉम्ब वाहून नेण्यासाठी ९ पॉर्इंट या विनामाच्या पंखावर बसविली आहेत. जवळपास १७ हजार किलो वजनाची शस्त्रास्त्रे वाहून नेण्याची क्षमता या विमानामध्ये आहेत. 

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकindian air forceभारतीय हवाई दलPakistanपाकिस्तान