शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

आमदारांच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र अधिकारी

By admin | Updated: December 3, 2015 03:34 IST

राज्य सरकारकडे असणाऱ्या प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करू, मात्र महापालिकेने शहरातील समस्या सोडवण्यासाठीही प्रभावी उपाय योजावेत, आमदारांचे प्रश्नही महत्त्वाचे असून

पुणे : राज्य सरकारकडे असणाऱ्या प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करू, मात्र महापालिकेने शहरातील समस्या सोडवण्यासाठीही प्रभावी उपाय योजावेत, आमदारांचे प्रश्नही महत्त्वाचे असून त्यांच्या निराकरणासाठी उपायुक्त दर्जाचा स्वतंत्र अधिकारी नियुक्त करावा, अशी सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी पालिका आयुक्तांना आज केली.आमदारांसमवेत पालिका आयुक्त व अधिकारी अशी संयुक्त बैठक बापट यांनी आज महापालिकेत घेतली. आमदार माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, भीमराव तापकीर, योगेश टिळेकर, जगदीश मुळिक, शरद रणपिसे, दीप्ती चवधरी या वेळी उपस्थित होते. आयुक्त कुणाल कुमार यांनी सुरूवातीला राज्य सरकारकडे असलेल्या पालिकेच्या सुमारे ४९० कोटी रुपयांच्या थकबाकीचा उल्लेख केला. पीएमपीसाठीची बसखरेदी, भामा आसखेड प्रकल्प, वडगाव जलशुद्धीकरण केंद्र यासाठीची निधीही राज्य सरकारकडे प्रलंबीत असल्याची माहिती त्यांनी दिली. हा निधी त्वरित मिळावा, यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याची ग्वाही बापट यांनी दिली. त्याचबरोबर शहरातील कचऱ्यासारखे प्रश्न सोडवण्यात पालिका प्रशासन कमी पडते आहे, याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. बांधकाम व्यावसायिक महापालिकेला देत असलेल्या रिकाम्या जागांचा वापर करता येईल का याचा विचार करावा, अशी सूचना बापट यांनी केली. दलितवस्ती सुधारणासाठी पालिकेला ४ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे, त्याच्या विनियोगापुर्वी आमदारांशी चर्चा केली जावी, ज्या ठिकाणी लोकसंख्या जास्त आहे, तिथेच हा निधी खर्च व्हावा, अशी अपेक्षा आमदारांनी व्यक्त केली.पालिकेकडून आमदारांना सुचवलेल्या कामांकडे दुर्लक्ष होते अशी तक्रार आमदारांनी केली. बापट यांनी त्याची दखल घेत आयुक्तांना आमदारांच्या कामांकडे लक्ष देण्याची सुचना केली. प्रत्येक आमदाराने त्याच्या मतदारासंघातील ५ महत्त्वाचे प्रश्न थेट आयुक्तांकडे द्यावेत. या प्रश्नांच्या निराकरणासाठी उपायुक्त दर्जाचा एक स्वतंत्र अधिकारीच नियुक्त केला जाणार आहे.कचरा निर्मुलनाच्या कामासाठी आपण १० लाख रुपये दिले होते, मात्र त्याचा वापर झाला नाही, अशी तक्रार आमदार रणपिसे यांनी केली. मेधा कुलकर्णी यांनीही तसेच सांगितले. त्यावर बापट यांनी अधिकाऱ्यांना विचारणा केली तर एका अधिकाऱ्याने १० लाख रुपयांत काय होणार, असे उत्तर दिले, बापट यांनी त्यावर संतप्त होत निदान घंटागाडी तरी घ्यायची, असे सांगितले.