शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

आमदारांच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र अधिकारी

By admin | Updated: December 3, 2015 03:34 IST

राज्य सरकारकडे असणाऱ्या प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करू, मात्र महापालिकेने शहरातील समस्या सोडवण्यासाठीही प्रभावी उपाय योजावेत, आमदारांचे प्रश्नही महत्त्वाचे असून

पुणे : राज्य सरकारकडे असणाऱ्या प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करू, मात्र महापालिकेने शहरातील समस्या सोडवण्यासाठीही प्रभावी उपाय योजावेत, आमदारांचे प्रश्नही महत्त्वाचे असून त्यांच्या निराकरणासाठी उपायुक्त दर्जाचा स्वतंत्र अधिकारी नियुक्त करावा, अशी सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी पालिका आयुक्तांना आज केली.आमदारांसमवेत पालिका आयुक्त व अधिकारी अशी संयुक्त बैठक बापट यांनी आज महापालिकेत घेतली. आमदार माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, भीमराव तापकीर, योगेश टिळेकर, जगदीश मुळिक, शरद रणपिसे, दीप्ती चवधरी या वेळी उपस्थित होते. आयुक्त कुणाल कुमार यांनी सुरूवातीला राज्य सरकारकडे असलेल्या पालिकेच्या सुमारे ४९० कोटी रुपयांच्या थकबाकीचा उल्लेख केला. पीएमपीसाठीची बसखरेदी, भामा आसखेड प्रकल्प, वडगाव जलशुद्धीकरण केंद्र यासाठीची निधीही राज्य सरकारकडे प्रलंबीत असल्याची माहिती त्यांनी दिली. हा निधी त्वरित मिळावा, यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याची ग्वाही बापट यांनी दिली. त्याचबरोबर शहरातील कचऱ्यासारखे प्रश्न सोडवण्यात पालिका प्रशासन कमी पडते आहे, याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. बांधकाम व्यावसायिक महापालिकेला देत असलेल्या रिकाम्या जागांचा वापर करता येईल का याचा विचार करावा, अशी सूचना बापट यांनी केली. दलितवस्ती सुधारणासाठी पालिकेला ४ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे, त्याच्या विनियोगापुर्वी आमदारांशी चर्चा केली जावी, ज्या ठिकाणी लोकसंख्या जास्त आहे, तिथेच हा निधी खर्च व्हावा, अशी अपेक्षा आमदारांनी व्यक्त केली.पालिकेकडून आमदारांना सुचवलेल्या कामांकडे दुर्लक्ष होते अशी तक्रार आमदारांनी केली. बापट यांनी त्याची दखल घेत आयुक्तांना आमदारांच्या कामांकडे लक्ष देण्याची सुचना केली. प्रत्येक आमदाराने त्याच्या मतदारासंघातील ५ महत्त्वाचे प्रश्न थेट आयुक्तांकडे द्यावेत. या प्रश्नांच्या निराकरणासाठी उपायुक्त दर्जाचा एक स्वतंत्र अधिकारीच नियुक्त केला जाणार आहे.कचरा निर्मुलनाच्या कामासाठी आपण १० लाख रुपये दिले होते, मात्र त्याचा वापर झाला नाही, अशी तक्रार आमदार रणपिसे यांनी केली. मेधा कुलकर्णी यांनीही तसेच सांगितले. त्यावर बापट यांनी अधिकाऱ्यांना विचारणा केली तर एका अधिकाऱ्याने १० लाख रुपयांत काय होणार, असे उत्तर दिले, बापट यांनी त्यावर संतप्त होत निदान घंटागाडी तरी घ्यायची, असे सांगितले.