शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

इंदापुरात तलाव झाले कोरडे, दुष्काळाची छाया गडद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 02:25 IST

यंदा डिसेंबर महिना सुरू होण्याअगोदरच ग्रामीण भागातील दुष्काळाची छाया गडद होऊ लागल्ली आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी पाऊस चांगल्या प्रमाणात होऊनदेखील इंदापूर तालुक्यातील पावसाने भरलेले तलाव सध्या कोरडे पडले आहेत.

अकोले : यंदा डिसेंबर महिना सुरू होण्याअगोदरच ग्रामीण भागातील दुष्काळाची छाया गडद होऊ लागल्ली आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी पाऊस चांगल्या प्रमाणात होऊनदेखील इंदापूर तालुक्यातील पावसाने भरलेले तलाव सध्या कोरडे पडले आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे पाणीउपसा करण्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे गावोगावी पाहायला मिळत आहे. जलउपसा करण्याच्या घटकामध्ये मोठी वाढ झाल्याचे हे परिणाम दिसून येत आहे.वाढती लोकसंख्या त्याचबरोबर पाणी वापराच्या प्रमाणातील वाढ यामुळे दिवसेंदिवस जलउपसा करण्याच्या प्रमाणात वाढ होताना जलस्रोताला बळकटी देण्याच्या प्रयत्नाला कोणी हातभार लावत नसल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात शेती व्यवसायाला पाण्याची मोठी प्रमाणात गरज भासत असून याची गरज भागविण्यासाठी विहिरींची सोय करण्यात येत आहे.त्यामुळे ज्याप्रमाणे महसुली नोंद असलेली कुटुंबे आहेत त्यांच्याकडे सरासरी एक विहिरीची नोंद आहे. याप्रमाणे तालुक्यात विहिरींबरोबरच घरगुती पाण्याच्या वापरासाठी घरासमोर बोअरवेलची पण सोय केलेली आहे. यामुळे दिवसेंदिवस पाणी उपसा करण्याच्या घटकांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याकारणाने भूगर्भातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे.बंधारे झपाट्याने कोरडेचार महिन्यांपूर्वी जलयुक्त शिवाराच्या कामामुळे पाण्याने भरलेले बंधारे झपाट्याने कोरडे झाल्याचे चित्र तालुक्यातील गावोगावी पाहायला मिळत आहे. यावर्षी जास्त पाऊस होऊनदेखील पाण्याची समस्या आताच भेडसावत असल्याने अजून सहा महिन्यांत शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याची समस्या बिकट होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. यासाठी जलउपसा करण्याबरोबरच शेती व्यवसायासाठी ठिबक सिंचन, शोषखड्डे यावर भर देऊन जलस्त्रोत बळकट करण्याला हातभार लावण्याची गरज आहे. जेणेकरून जलउपसा करण्याचे स्रोत दिवसेंदिवस वाढतील. त्या प्रमाणात पाणीबचत करण्याची काळजी लोकांनी घेतली पाहिजे.

टॅग्स :Puneपुणे