शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

इंदापुरात तलाव झाले कोरडे, दुष्काळाची छाया गडद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 02:25 IST

यंदा डिसेंबर महिना सुरू होण्याअगोदरच ग्रामीण भागातील दुष्काळाची छाया गडद होऊ लागल्ली आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी पाऊस चांगल्या प्रमाणात होऊनदेखील इंदापूर तालुक्यातील पावसाने भरलेले तलाव सध्या कोरडे पडले आहेत.

अकोले : यंदा डिसेंबर महिना सुरू होण्याअगोदरच ग्रामीण भागातील दुष्काळाची छाया गडद होऊ लागल्ली आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी पाऊस चांगल्या प्रमाणात होऊनदेखील इंदापूर तालुक्यातील पावसाने भरलेले तलाव सध्या कोरडे पडले आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे पाणीउपसा करण्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे गावोगावी पाहायला मिळत आहे. जलउपसा करण्याच्या घटकामध्ये मोठी वाढ झाल्याचे हे परिणाम दिसून येत आहे.वाढती लोकसंख्या त्याचबरोबर पाणी वापराच्या प्रमाणातील वाढ यामुळे दिवसेंदिवस जलउपसा करण्याच्या प्रमाणात वाढ होताना जलस्रोताला बळकटी देण्याच्या प्रयत्नाला कोणी हातभार लावत नसल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात शेती व्यवसायाला पाण्याची मोठी प्रमाणात गरज भासत असून याची गरज भागविण्यासाठी विहिरींची सोय करण्यात येत आहे.त्यामुळे ज्याप्रमाणे महसुली नोंद असलेली कुटुंबे आहेत त्यांच्याकडे सरासरी एक विहिरीची नोंद आहे. याप्रमाणे तालुक्यात विहिरींबरोबरच घरगुती पाण्याच्या वापरासाठी घरासमोर बोअरवेलची पण सोय केलेली आहे. यामुळे दिवसेंदिवस पाणी उपसा करण्याच्या घटकांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याकारणाने भूगर्भातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे.बंधारे झपाट्याने कोरडेचार महिन्यांपूर्वी जलयुक्त शिवाराच्या कामामुळे पाण्याने भरलेले बंधारे झपाट्याने कोरडे झाल्याचे चित्र तालुक्यातील गावोगावी पाहायला मिळत आहे. यावर्षी जास्त पाऊस होऊनदेखील पाण्याची समस्या आताच भेडसावत असल्याने अजून सहा महिन्यांत शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याची समस्या बिकट होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. यासाठी जलउपसा करण्याबरोबरच शेती व्यवसायासाठी ठिबक सिंचन, शोषखड्डे यावर भर देऊन जलस्त्रोत बळकट करण्याला हातभार लावण्याची गरज आहे. जेणेकरून जलउपसा करण्याचे स्रोत दिवसेंदिवस वाढतील. त्या प्रमाणात पाणीबचत करण्याची काळजी लोकांनी घेतली पाहिजे.

टॅग्स :Puneपुणे