शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

इंदापूरला बळीराजा चिंतेत, शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 00:52 IST

रविवार व सोमवारी इंदापूर तालुक्यात कडक ऊन होते; मात्र पाऊस न पडल्याने बळीराजा चिंतेत पडला आहे. शेतक-याची ग्रामीण भागात एक म्हण आहे की, भाद्रपद महिन्यात कडक ऊन पडल्यास पाऊस पडतो.

पळसदेव - रविवार व सोमवारी इंदापूर तालुक्यात कडक ऊन होते; मात्र पाऊस न पडल्याने बळीराजा चिंतेत पडला आहे. शेतक-याची ग्रामीण भागात एक म्हण आहे की, भाद्रपद महिन्यात कडक ऊन पडल्यास पाऊस पडतो; मात्र पाऊस नाही प्रचंड उकाडा मात्र निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतातील पिके धोक्यात आली आहेत.तलाव कोरडे, पाऊस नाही, विहिरींची पाणीपातळी कमी होत आहे. अशा तिहेरी मनस्थितीत शेतकरी सापडला आहे. एकीकडे खडकवासला कालवा व नीरा डाव्या कालव्याच्या पाण्यावरून सत्ताधारी व विरोधक नेत्यांमध्ये राजकारण सुरू आहे; मात्र तलावांमध्ये अद्याप पाणी आलेले नाही. काहीही होवो आमच्या पाझर तलावांमध्ये पाणी सोडण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. बाजरी पीक तर जळून गेले, आता उसाचे काय होणार, अशी चिंता शेतकºयांना वाटू लागली आहे. एकीकडे हुमणी सारख्या रोगाने उसाला संपूर्ण ग्रासले आहे. औषधे फवारणी करून ही हुमणी आळी नष्ट होत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पाऊस नसल्याने अनेक मेंढपाळांचे कळप चाºयाच्या शोधार्थ भटकंती करत आहेत.पाण्याच्या प्रश्नावर प्रथमच इंदापूर तालुक्यात असे एवढे वाईट दिवस आले नव्हते; मात्र चार वर्षांत शेतकºयांची हेटाळणी म्हणायची की दोष, अशी चर्चा सुरू आहे, दरम्यान शेतकºयांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.पाण्याचे राजकारण नको : नागरिकांची अपेक्षाइंदापूर तालुक्यातील राजकारण दूषित - दौंड तालुक्याच्या राजकारणानंतर इंदापूर तालुक्यात राजकारण सुरू आहे. विशेषत: पाणप्रश्नावर आमदार व माजी मंत्री यांची जुगलबंदी चालते; मात्र जनतेच्या पदरात काहीच पडत नाही. याच्या अगोदर अनेक नेते मंडळी आमदार होऊन गेले. त्यामधे कै. शंकरराव पाटील, कै. राजेंद्र कुमार घोलप, कै. गणपतराव पाटील या माजी आमदारांनी राजकारण विरहित कार्य केले. सध्याचे राजकारण मात्र वेगळे सुरू असल्याचे वयोवृद्ध नागरिकांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस