शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
4
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
5
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
6
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
9
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
10
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
11
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
12
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
13
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
14
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
15
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
16
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
17
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
18
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
19
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
20
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

इंदापूरला बळीराजा चिंतेत, शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 00:52 IST

रविवार व सोमवारी इंदापूर तालुक्यात कडक ऊन होते; मात्र पाऊस न पडल्याने बळीराजा चिंतेत पडला आहे. शेतक-याची ग्रामीण भागात एक म्हण आहे की, भाद्रपद महिन्यात कडक ऊन पडल्यास पाऊस पडतो.

पळसदेव - रविवार व सोमवारी इंदापूर तालुक्यात कडक ऊन होते; मात्र पाऊस न पडल्याने बळीराजा चिंतेत पडला आहे. शेतक-याची ग्रामीण भागात एक म्हण आहे की, भाद्रपद महिन्यात कडक ऊन पडल्यास पाऊस पडतो; मात्र पाऊस नाही प्रचंड उकाडा मात्र निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतातील पिके धोक्यात आली आहेत.तलाव कोरडे, पाऊस नाही, विहिरींची पाणीपातळी कमी होत आहे. अशा तिहेरी मनस्थितीत शेतकरी सापडला आहे. एकीकडे खडकवासला कालवा व नीरा डाव्या कालव्याच्या पाण्यावरून सत्ताधारी व विरोधक नेत्यांमध्ये राजकारण सुरू आहे; मात्र तलावांमध्ये अद्याप पाणी आलेले नाही. काहीही होवो आमच्या पाझर तलावांमध्ये पाणी सोडण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. बाजरी पीक तर जळून गेले, आता उसाचे काय होणार, अशी चिंता शेतकºयांना वाटू लागली आहे. एकीकडे हुमणी सारख्या रोगाने उसाला संपूर्ण ग्रासले आहे. औषधे फवारणी करून ही हुमणी आळी नष्ट होत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पाऊस नसल्याने अनेक मेंढपाळांचे कळप चाºयाच्या शोधार्थ भटकंती करत आहेत.पाण्याच्या प्रश्नावर प्रथमच इंदापूर तालुक्यात असे एवढे वाईट दिवस आले नव्हते; मात्र चार वर्षांत शेतकºयांची हेटाळणी म्हणायची की दोष, अशी चर्चा सुरू आहे, दरम्यान शेतकºयांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.पाण्याचे राजकारण नको : नागरिकांची अपेक्षाइंदापूर तालुक्यातील राजकारण दूषित - दौंड तालुक्याच्या राजकारणानंतर इंदापूर तालुक्यात राजकारण सुरू आहे. विशेषत: पाणप्रश्नावर आमदार व माजी मंत्री यांची जुगलबंदी चालते; मात्र जनतेच्या पदरात काहीच पडत नाही. याच्या अगोदर अनेक नेते मंडळी आमदार होऊन गेले. त्यामधे कै. शंकरराव पाटील, कै. राजेंद्र कुमार घोलप, कै. गणपतराव पाटील या माजी आमदारांनी राजकारण विरहित कार्य केले. सध्याचे राजकारण मात्र वेगळे सुरू असल्याचे वयोवृद्ध नागरिकांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस