शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
3
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
4
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
5
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
6
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
7
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
8
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
9
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
11
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
12
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
13
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
14
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
15
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
16
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
17
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
18
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
19
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
20
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा

इंदापूरला बळीराजा चिंतेत, शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 00:52 IST

रविवार व सोमवारी इंदापूर तालुक्यात कडक ऊन होते; मात्र पाऊस न पडल्याने बळीराजा चिंतेत पडला आहे. शेतक-याची ग्रामीण भागात एक म्हण आहे की, भाद्रपद महिन्यात कडक ऊन पडल्यास पाऊस पडतो.

पळसदेव - रविवार व सोमवारी इंदापूर तालुक्यात कडक ऊन होते; मात्र पाऊस न पडल्याने बळीराजा चिंतेत पडला आहे. शेतक-याची ग्रामीण भागात एक म्हण आहे की, भाद्रपद महिन्यात कडक ऊन पडल्यास पाऊस पडतो; मात्र पाऊस नाही प्रचंड उकाडा मात्र निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतातील पिके धोक्यात आली आहेत.तलाव कोरडे, पाऊस नाही, विहिरींची पाणीपातळी कमी होत आहे. अशा तिहेरी मनस्थितीत शेतकरी सापडला आहे. एकीकडे खडकवासला कालवा व नीरा डाव्या कालव्याच्या पाण्यावरून सत्ताधारी व विरोधक नेत्यांमध्ये राजकारण सुरू आहे; मात्र तलावांमध्ये अद्याप पाणी आलेले नाही. काहीही होवो आमच्या पाझर तलावांमध्ये पाणी सोडण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. बाजरी पीक तर जळून गेले, आता उसाचे काय होणार, अशी चिंता शेतकºयांना वाटू लागली आहे. एकीकडे हुमणी सारख्या रोगाने उसाला संपूर्ण ग्रासले आहे. औषधे फवारणी करून ही हुमणी आळी नष्ट होत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पाऊस नसल्याने अनेक मेंढपाळांचे कळप चाºयाच्या शोधार्थ भटकंती करत आहेत.पाण्याच्या प्रश्नावर प्रथमच इंदापूर तालुक्यात असे एवढे वाईट दिवस आले नव्हते; मात्र चार वर्षांत शेतकºयांची हेटाळणी म्हणायची की दोष, अशी चर्चा सुरू आहे, दरम्यान शेतकºयांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.पाण्याचे राजकारण नको : नागरिकांची अपेक्षाइंदापूर तालुक्यातील राजकारण दूषित - दौंड तालुक्याच्या राजकारणानंतर इंदापूर तालुक्यात राजकारण सुरू आहे. विशेषत: पाणप्रश्नावर आमदार व माजी मंत्री यांची जुगलबंदी चालते; मात्र जनतेच्या पदरात काहीच पडत नाही. याच्या अगोदर अनेक नेते मंडळी आमदार होऊन गेले. त्यामधे कै. शंकरराव पाटील, कै. राजेंद्र कुमार घोलप, कै. गणपतराव पाटील या माजी आमदारांनी राजकारण विरहित कार्य केले. सध्याचे राजकारण मात्र वेगळे सुरू असल्याचे वयोवृद्ध नागरिकांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस