शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

झोपडपट्ट्यांचे वाढते अतिक्रमण, घाणीच्या साम्राज्यात मूलभूत गरजाही अपूर्ण, यंत्रणेला अपयश, पुनर्वसनानंतरही ताबे कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 03:28 IST

पर्वती टेकडी परिसरातील अंदाजे ११० एकरमध्ये वसलेल्या जनता वसाहतमध्ये आजही नवीन झोपड्या तयार होत आहेत. जे नागरिक येथे राहतात त्यांच्या मूलभूत गरजाही येथे पूर्ण होत नाहीत.

- गौरव कदमसहकारनगर : पर्वती टेकडी परिसरातील अंदाजे ११० एकरमध्ये वसलेल्या जनता वसाहतमध्ये आजही नवीन झोपड्या तयार होत आहेत. जे नागरिक येथे राहतात त्यांच्या मूलभूत गरजाही येथे पूर्ण होत नाहीत. घाणीच्या साम्राज्यात ते राहत असताना वाढतच जाणाºया अतिक्रमणाला थांबविणे शासकीय यंत्रणेला शक्य होत नसल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. जनता वसाहतीची सध्या ६० ते ७० हजार लोकसंख्या असल्याचे सांगण्यात येते.पुण्याच्या पर्वती परिसरात १९७५ साली आसपासच्या गावांमधील गरजू नागरिकांनी रोजगारासाठी प्रवेश केला. रस्त्यावर झोपता झोपता ऋतूचक्रापासून बचाव म्हणून झोपड्या बांधण्यास सुरुवात झाली. पर्वती पुण्याचा सांस्कृतिक वारसा असलेले ठिकाण होते. त्याच वारशाच्या आजुबाजूला जनता वसाहत नावाने मोठी झोपडपट्टी वसण्यास सुरुवात झाली. गरज आणि गरिबी आंधळी असते, असे म्हणतात.येथील नागरिकांना स्वत:चे हक्काचे घर मिळावे, यासाठी वाल्मीकी आवास योजना, घरकुल योजना अशा पद्धतीच्या शासकीय योजना राबविल्या जाव्यात, अशी भावना काही नागरिकांनी व्यक्त केली. नागरिकांची त्यासाठी मानसिकता बदलणे गरजेचे आहे. वसाहतीमध्ये सुविधा खर्च नाही. पक्क्या घरात, इमारतींमध्ये गेल्यास खर्च वाढेल, अशी अनेक नागरिकांची मानसिकता आहे. काही नागरिकांकडे पैसे असूनही जागेवरील हक्क जाईल, या भीतीने ते जागा सोडत नाहीत. अनेक नागरिकांनी चढ्या भावाने घरे विकली अथवा भाड्याने दिली आहेत. अनेक कुटुंबांना वा विद्यार्थ्यांना कमी भाड्यात जागा मिळत असल्याने येथे आश्रय घेतला जातो. काही वाईट प्रवृत्तीच्या लोकांमुळे वातावरण दूषित होऊन युवावर्ग भुरट्या चोºयांकडे वळत आहे. नागरिकांनी पुढील पिढी संस्कृत, शिक्षित असावी, यासाठी योग्य पर्याय निवडून विरोधाला विरोध न करता शासकीय योजनेशी समतोल राखत पुढाकार घेऊन योग्य पर्याय निवडणे गरजेचे आहे.स्वच्छतागृहांमध्ये घाणस्वच्छतेबाबत जनजागृती नसल्याने वसाहतीमध्ये अनेक जागी खुल्यावर शौच केले जाते. जागोजागी गुटखा खाऊन थुंकलेल्यांमुळे पिचका-या पाहण्यास मिळतात. शासकीय स्वच्छतागृहांमध्ये कही खुशी कही गम अशी अस्वछतेची भयानक परिस्थिती पाहण्यास मिळते. जनता वसाहतीमधील कचरा घाण पावसामुळे शेजारील कालव्यात जात आहे. हे सर्वच नागरिकांना पुढे धोकादायक व आजारी पडण्यास कारणीभूत ठरते. कालव्याच्या बाजुस सुरक्षा जाळी बसविली असली तरी कपडे-भांडी धुण्याचे काम कालव्यातच केले जाते. सांडपाणी वाहिनीचे योग्य नियोजन वसाहतमध्ये होणे गरजेचे आहे.जनता वसाहतीमध्ये नागरिकांना स्वच्छतेबाबत जनजागृती होणे, होणाºया आजारांचे मुख्य कारण समजणे गरजेचे आहे. वसाहतीमध्ये शासकीय पातळीवर औषध फवारणी, संसर्गजन्य रोगांची माहिती पुरविणे गरजेचे आहे. थंडीच्या दिवसांत अनेक जागी गाडीचे टायर सर्रास जाळले जातात. पर्वतीवरून सकाळी जनता वसाहतमधून मोठ्या प्रमाणात निघणाºया धुराचे दर्शन होते. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वायूप्रदूषणपाहावयास मिळते.

टॅग्स :Puneपुणे