शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
3
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
4
घटनास्थळी दहशतीच्या खुणा, रस्त्यांवर शुकशुकाट, लष्कराची वर्दळ, हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आहे अशी परिस्थिती
5
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
6
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
7
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
8
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
9
महेश भट आणि पूजा भटच्या लिप किसवर पहिल्यांदाच बोलला त्यांचा मुलगा, म्हणाला- "हे मी लहानपणासून बघत आलोय..."
10
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
11
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
12
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
13
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
14
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
15
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
16
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
17
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
18
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
19
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
20
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान

झोपडपट्ट्यांचे वाढते अतिक्रमण, घाणीच्या साम्राज्यात मूलभूत गरजाही अपूर्ण, यंत्रणेला अपयश, पुनर्वसनानंतरही ताबे कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 03:28 IST

पर्वती टेकडी परिसरातील अंदाजे ११० एकरमध्ये वसलेल्या जनता वसाहतमध्ये आजही नवीन झोपड्या तयार होत आहेत. जे नागरिक येथे राहतात त्यांच्या मूलभूत गरजाही येथे पूर्ण होत नाहीत.

- गौरव कदमसहकारनगर : पर्वती टेकडी परिसरातील अंदाजे ११० एकरमध्ये वसलेल्या जनता वसाहतमध्ये आजही नवीन झोपड्या तयार होत आहेत. जे नागरिक येथे राहतात त्यांच्या मूलभूत गरजाही येथे पूर्ण होत नाहीत. घाणीच्या साम्राज्यात ते राहत असताना वाढतच जाणाºया अतिक्रमणाला थांबविणे शासकीय यंत्रणेला शक्य होत नसल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. जनता वसाहतीची सध्या ६० ते ७० हजार लोकसंख्या असल्याचे सांगण्यात येते.पुण्याच्या पर्वती परिसरात १९७५ साली आसपासच्या गावांमधील गरजू नागरिकांनी रोजगारासाठी प्रवेश केला. रस्त्यावर झोपता झोपता ऋतूचक्रापासून बचाव म्हणून झोपड्या बांधण्यास सुरुवात झाली. पर्वती पुण्याचा सांस्कृतिक वारसा असलेले ठिकाण होते. त्याच वारशाच्या आजुबाजूला जनता वसाहत नावाने मोठी झोपडपट्टी वसण्यास सुरुवात झाली. गरज आणि गरिबी आंधळी असते, असे म्हणतात.येथील नागरिकांना स्वत:चे हक्काचे घर मिळावे, यासाठी वाल्मीकी आवास योजना, घरकुल योजना अशा पद्धतीच्या शासकीय योजना राबविल्या जाव्यात, अशी भावना काही नागरिकांनी व्यक्त केली. नागरिकांची त्यासाठी मानसिकता बदलणे गरजेचे आहे. वसाहतीमध्ये सुविधा खर्च नाही. पक्क्या घरात, इमारतींमध्ये गेल्यास खर्च वाढेल, अशी अनेक नागरिकांची मानसिकता आहे. काही नागरिकांकडे पैसे असूनही जागेवरील हक्क जाईल, या भीतीने ते जागा सोडत नाहीत. अनेक नागरिकांनी चढ्या भावाने घरे विकली अथवा भाड्याने दिली आहेत. अनेक कुटुंबांना वा विद्यार्थ्यांना कमी भाड्यात जागा मिळत असल्याने येथे आश्रय घेतला जातो. काही वाईट प्रवृत्तीच्या लोकांमुळे वातावरण दूषित होऊन युवावर्ग भुरट्या चोºयांकडे वळत आहे. नागरिकांनी पुढील पिढी संस्कृत, शिक्षित असावी, यासाठी योग्य पर्याय निवडून विरोधाला विरोध न करता शासकीय योजनेशी समतोल राखत पुढाकार घेऊन योग्य पर्याय निवडणे गरजेचे आहे.स्वच्छतागृहांमध्ये घाणस्वच्छतेबाबत जनजागृती नसल्याने वसाहतीमध्ये अनेक जागी खुल्यावर शौच केले जाते. जागोजागी गुटखा खाऊन थुंकलेल्यांमुळे पिचका-या पाहण्यास मिळतात. शासकीय स्वच्छतागृहांमध्ये कही खुशी कही गम अशी अस्वछतेची भयानक परिस्थिती पाहण्यास मिळते. जनता वसाहतीमधील कचरा घाण पावसामुळे शेजारील कालव्यात जात आहे. हे सर्वच नागरिकांना पुढे धोकादायक व आजारी पडण्यास कारणीभूत ठरते. कालव्याच्या बाजुस सुरक्षा जाळी बसविली असली तरी कपडे-भांडी धुण्याचे काम कालव्यातच केले जाते. सांडपाणी वाहिनीचे योग्य नियोजन वसाहतमध्ये होणे गरजेचे आहे.जनता वसाहतीमध्ये नागरिकांना स्वच्छतेबाबत जनजागृती होणे, होणाºया आजारांचे मुख्य कारण समजणे गरजेचे आहे. वसाहतीमध्ये शासकीय पातळीवर औषध फवारणी, संसर्गजन्य रोगांची माहिती पुरविणे गरजेचे आहे. थंडीच्या दिवसांत अनेक जागी गाडीचे टायर सर्रास जाळले जातात. पर्वतीवरून सकाळी जनता वसाहतमधून मोठ्या प्रमाणात निघणाºया धुराचे दर्शन होते. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वायूप्रदूषणपाहावयास मिळते.

टॅग्स :Puneपुणे