शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

वाढती गुन्हेगारी अन् अपुरे कर्मचारी, पोलिसांवर कामाचा ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 00:01 IST

१९६१च्या लोकसंख्येच्या आकृतिबंधानुसार : ९६ गावांसाठी फक्त ४५ कर्मचारी

शिवाजी आतकरी

खेड : तालुक्याच्या गावाचे पोलीस ठाणे विविध समस्यांच्या गर्तेत आहे. वाढती गुन्हेगारी, अपुरे कर्मचारी यांमुळे कामाचा अतिरिक्त ताण या पोलीस ठाण्यावर आहे. शासन दरबारी पोलिसांच्या प्रश्नांबाबत उदासीनता याचा एकूण कामकाजावर परिणाम झाल्याचे स्पष्ट होत आहे.राजगुरुनगर पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र ९६ गावांसाठी आहे. या गावांसाठी ४५ कर्मचारी कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी आहेत.

राजगुरुनगर, वाडा, चास, कडूस, दावडी, वाफगाव ही त्यातील मोठी गावे येतात. पूर्व-पश्चिम असा विस्तार असणाऱ्या पोलीस कार्यक्षेत्रात डोंगरी-दुर्गम भागातील गावेही मोठ्या संख्येने येतात. भौगोलिक परिस्थिती आणि पोलीस कर्मचारी संख्या लक्षात घेता, कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारास पायबंद घालणे हे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे. १९६१च्या लोकसंख्येच्या आकृतिबंधानुसार सध्या पोलीस कर्मचारी आहेत, असे सांगण्यात येते. अपुºया कर्मचाºयांमुळे दैनंदिन कामावर परिणाम होत आहे. कार्यालयात साधारण दहा कर्मचारी नियमित आवश्यक आहे. साप्ताहिक सुट्टी, रजा यांमुळे प्रमुखास कामकाज चालवणे ही कसरत असते. कर्मचारी संख्येबरोबरच इतक्या मोठ्या भौगोलिक क्षेत्रासाठी पोलिसांना वाहनही पुरेसे नाही. वैयक्तिक दुचाक्या वापरून पोलीस सरकारी कामे करताना दिसतात; तसेच इतर खासगी वाहने वापरताना पोलिसांना डिझेल, पेट्रोल भत्ता मिळत नाही. पोलीस ठाण्यातील किरकोळ दुरुस्ती-देखभाल, स्टेशनरी वगैरेंसाठी पोलिसांच्याच खिशाला कात्री असते, ही वस्तुस्थिती आहे. वाडा, वाफगाव परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण जास्त आहे. राजगुरुनगर शहरामध्ये एक कक्ष करावा, ही शहरवासीयांची मागणी त्यामुळे पोलीस पूर्ण करू शकत नाही.सातत्याने होणारी वाहतूककोंडी, सणासुदीला बंदोबस्त वगैरे दुय्यम दर्जाच्या कामात पोलीस अधिक व्यस्त असतात. अशा पार्श्वभूमीवर मोठ्या गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांना पुरेसा वेळ मिळत नसल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये. पोलीस ठाणे इमारत सुसज्ज असली, तरी इमारतीमागे असणारा कचरा, नाला आणि स्मशानभूमीतील धूर यांमुळे पोलीस ठाणे परिसरात दुर्गंधी असते. अशा वातावरणात राजगुरुनगर पोलिसांना काम करावे लागते. मानसिक संयमाची कसोटी पाहणारे येथील वातावरण अनेकदा अनुभवण्यास मिळते.पोलिसांसाठी घरे, कामासाठी पूरक वातावरण राजगुरुनगरमध्ये तरी नाही. पोलिसांची बिले, निरनिराळे भत्ते, सोयी-सुविधा यांची कमतरता येथे जाणवते. कामाच्या अतिरिक्त ताणामुळे एकूणच पोलिसांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे. शासन दरबारी पोलिसांनीच फिर्याद मांडावी, अशी स्थिती सध्या आहे.

टॅग्स :PoliceपोलिसPuneपुणे