शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

कांद्याचा भाव वधारल्याने आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 02:33 IST

कांदा उत्पादकांना अच्छे दिन; दोन महिने उकिरड्यावर फेकल्यावर कांदा पुन्हा बाजारात

मंचर : कांद्याच्या भावात काहीशी वाढ झाल्यानंतर मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी कांद्याची विक्रमी आवक झाली आहे. तब्बल ५५ हजार पिशवी कांदा विक्रीसाठी आल्याने बाजार समिती आवारात माल ठेवण्यास जागा राहिली नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा माल वाहनातच राहून वाहतूक कोंडी झाली होती. सकाळी सुरू झालेला लिलाव सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होता.कांद्याचे ढासळलेले बाजारभाव सुधारत आहे. २ महिने कांद्याला बाजारभाव नव्हता परिणामी शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागला. काही शेतकऱ्यांनी कांदा शेतातच सोडून दिला. तर उभ्या पिकात जनावरे सोडण्याची वेळ शेतकºयांवर आली होती. १५ दिवसांपासून कांद्याच्या बाजारभावात काहीशी वाढ झाली. मंगळवारी झालेल्या लिलावात कांदा १० किलोस ९० रुपये या भावाने विकला गेला. बाजारभाव वाढू लागल्याने शेतकºयांनी तत्परतेने कांदा शेतातून काढून तसेच साठवून ठेवलेला कांदा विक्रीसाठी बाहेर काढला. त्यामुळे मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची विक्रमी आवक झाली. तब्बल ५५ हजार पिशवी कांदा विक्रीसाठी आला. हा आतापर्यंतचा उच्चांक असल्याची माहिती विक्रेते बाळासाहेब बाणखेले यांनी दिली. मागील लिलावाला २२ हजार पिशवी आवक होवून ९० रुपये भाव मिळाला होता. बाजार समितीचा आवार, तरकारी मार्केट, कांदा पिशव्यांनी भरुन गेला होता.शेडमध्ये जागा कमी पडल्याने अगदी रस्त्यावर कांदा ठेवण्यात आला होता. जागा मिळेल तेथे शेतकरी त्यांचा कांदा ठेवत होते. आंबेगाव तालुक्याबरोबरच शिरुर, खेड या तालुक्यातील आवक झाली होती. दुपारी जागा उपलब्ध नसल्याने कांदा ट्रॅक्टर, पिकअप, टेम्पो या वाहनातच ठेवण्याची वेळ आली. परिणामी बाजार समितीत वाहतुक कोंडी झाली होती. ती सुरळीत करताना सुरक्षा रक्षकांची दमछाक होत होती.दहा किलोलो ८५ रुपयेबाजार समितीत ३० आडते असून १५ खरेदीदार आहेत.सकाळी ११.३० वा.लिलावाला सुरुवात झाली. आवक भरपूर असल्याने सायंकाळी उशिरापर्यंत लिलाव सुरु होते. चांगला कांदा ८५ रुपये १० किलो या भावाने विकला गेला. बदला १० ते २० रुपये,गोळी कांदा २० ते ४० रुपये या भावाने विकला गेला. येथील कांदा निर्यात केला जातो तसेच दिल्ली व उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये हा कांदा प्रामुख्याने पाठविला जातो. कांद्याचे बाजारभाव वाढल्याने शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे. शेतकरी कांद्याचे भाव अजुन वाढण्याच्या प्रतिक्षेत आहे.

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी