शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
2
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
3
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
4
Arjun Tendulkarचा विजय हजारे स्पर्धेत फ्लॉप शो; ३ सामने खेळून झाले, तरी एकही विकेट मिळेना
5
केवळ १६ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा १ कोटींहून अधिक परतावा; SIP ठरतेय वरदान, सोपं गणित पाहा
6
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध विजयी; प्रभाग २४मध्ये जल्लोष
7
संघर्षाची गाथा! वडिलांची नोकरी गेली; मोमोज विकत लेकीने NEET क्रॅक केली, आता होणार डॉक्टर
8
१५ ऑगस्ट… बुलेट ट्रेन मुहूर्त ठरला! पहिला रुट कोणता, मुंबईत कधी सुरू होणार? मोठी माहिती समोर
9
GST संकलनातून भरली सरकारची तिजोरी; डिसेंबरमध्ये 6% वाढीसह ₹1.74 लाख कोटी पार...
10
Municipal Election 2026: भाजपाचा विजयरथ सुसाट! मतदानाआधी ११ उमेदवार बिनविरोध जिंकले, कुठे-कुठे फुलले कमळ?
11
पुण्यात भाजपाला धक्का, अधिकृत उमेदवाराने अर्ज घेतला मागे; माघारीनंतर पूजा मोरेंना अश्रू अनावर
12
Vastu Tips : नवीन वर्षाचे कॅलेंडर या दिशेला ठेवू नका; नाही तर अडचणी येऊ शकतात
13
Ahilyanagar Election 2025: मतदानाआधीच 'बिनविरोध' निकालांचा पाऊस; अहिल्यानगरमध्ये अजित पवारांचे दोन उमेदवार विजयी
14
ठरले! स्लीपर वंदे भारत ‘या’ तारखेपासून प्रवासी सेवेत, तिकीट दरही आले; PM मोदी करणार लोकार्पण
15
या देशात पत्र पाठवण्याची सेवा बंद, ४०१ वर्षांची परंपरा संपली; असे करणारा जगातील पहिलाच देश ठरला
16
२०२६ मध्ये राज्यसभेतील गणित बदलणार; महाराष्ट्रातील एका जागेसह ७५ जागांचं भवितव्य ठरणार
17
आयटी रिटर्नची मुदत संपली तरी आशा कायम! 'या' मार्गाने मिळवू शकता रखडलेला टॅक्स रिफंड
18
निवडणुकीसाठी अपक्षांना पाव, वाटाणे अन् अक्रोड अशी १९४ मुक्त चिन्हे, 'रिक्षा' चिन्हाची मोठी मागणी
19
AI दिसत नाही, पण आहे सर्वत्र! आपल्या रोजच्या आयुष्यात AI ने नेमकं काय बदललं?
20
नवीन वर्षाच्या पार्टीदरम्यान बारमध्ये भीषण स्फोट, १० जणांचा होरपळून मृत्यू, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषणात वाढ ! धुराने काळवंडतोय हिंजवडी आयटी परिसर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 02:14 IST

प्रदूषणात वाढ : कचऱ्याला आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ

हिंजवडी : हिंजवडी, माण आयटीनगरी परिसरात सध्या कचºयाच्या ढिगाºयाला अचानक लागणाºया आगीच्या घटनांमुळे हवेत नेहमीच काळेकुट्ट धुराचे लोट दिसतात. आयटी पार्क परिसरातील मोकळ्या जागांवर कचरा, प्लॅस्टिक, फोम, तसेच वाहनांचे टायर, हॉटेलमधील उरलेले अन्नपदार्थ बिनदिक्कतपणे टाकले जात असल्याने अनेक ठिकाणी छोट्या स्वरूपातील कचरा डेपो तयार झाले आहेत. कोणत्या ना कोणत्या ठिकाणी आग लागून हिंजवडी परिसरात निरभ्र आकाशात काळेकुट्ट धुराचे लोट दिसून येत असल्याने आयटी परिसरात प्रदूषण करणाºया कंपन्या दाखल झाल्या की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आयटी पार्क परिसरात सुमारे १२८ हून अधिक आयटी कंपन्या आहेत. उच्चशिक्षित, उच्चभ्रू जीवनशैली जगणारे हजारो आयटीयन्स या ठिकाणी काम करतात. सध्या मोकळ्या जागांवरील कचºयाला आग लागण्याच्या घटना या भागात नित्याच्याच झाल्या आहेत. मोठ्या प्रमाणात घनकचरा, कंपन्यांचे भंगार, प्लॅस्टिक, शिळे अन्नपदार्थ टाकले जात असून, ग्रामपंचायत, एमआयडीसी अथवा या परिसरात काम करणाºया जबाबदार संस्था यांपैकी कोणीच याकडे लक्ष देत नाही.पंधरा दिवसांत कचºयाला आग लागण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. फेज १ मधील हिंजवडी, माण रस्त्यावरील अशोक मिडोज सोसायटीशेजारील मोकळ्या मैदानात रात्री मोठ्या प्रमाणात कचरा टाकून पेटवण्यात आला होता, तरचार दिवसांपूर्वी माण हद्दीतील फेज ३ मधील गंगारामवाडीजवळील मोकळ्या मैदानात मोठ्याप्रमाणात कचºयाच्या ढिगाºयाला आग लागली होती. फेज ३ मधील अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्काळ धाव घेत आग आटोक्यात आणली होती. कचरा मोकळ्या जागेत टाकला जात आहे.उपाययोजना : यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभावकचºयाच्या ढिगाºयामध्ये कंपन्यांचे प्लॅस्टिक, भंगार मोठ्या प्रमाणात आहे. अनेक वेळा एमआयडीसी, ग्रामपंचायत अथवा संबंधित यंत्रणा यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव असल्याने अज्ञातांचे फावते; मात्र अशा घटनांना आळा बसला पाहिजे. ही जबाबदारी सर्वांचीच आहे. असा प्रकार होत असल्याचे दिसताच संबंधित यंत्रणांना कळवणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतीकडे कर्मचारी संख्या अपुरी असते; मात्र परिसरात रात्रंदिवस टेहळणी होणे गरजेचे आहे. - भरत पाटील, ग्रामविकास अधिकारी, माणकचरा टाकून पेटवणाºयांचा बंदोबस्त व्हायला पाहिजे. कंपन्यांना ओला कचरा कंपनीमध्येच नष्ट करावा लागतो हा नियम आहे, तर भंगार अथवा वेस्ट मटेरियल व्हेंडरकडून बाहेर पाठवले जाते. त्यामुळे कंपन्यांकडून असे प्रकार होत नसावेत; मात्र एमआयडीसी हद्दीत आमचे लक्ष असते. अशा घटना घडू नयेत म्हणून आमचा विभाग दक्ष आहे.- नीलेश मोढवे, कार्यकारी अभियंता, हिंजवडी एमआयडीसीआयटी पार्कमध्ये कचºयाच्या ढिगाºयाला आग लागण्याच्या घटना वारंवार घडत असतात. माहिती मिळाल्यावर तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग नियंत्रणात आणली जाते. आगीत प्रामुख्याने प्लॅस्टिक, फोम, स्क्रॅप, अन्नपदार्थ यांचे प्रमाण अधिक असल्याने काळा धूर होतो.- सुनील इंगवले,अग्निशामक अधिकारी, हिंजवडी फेज ३.

टॅग्स :Puneपुणे