शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
2
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
3
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
4
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
5
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
6
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
7
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
8
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
9
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
10
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
11
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
12
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
13
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
14
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
15
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
16
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
17
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
18
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
19
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
20
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषणात वाढ ! धुराने काळवंडतोय हिंजवडी आयटी परिसर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 02:14 IST

प्रदूषणात वाढ : कचऱ्याला आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ

हिंजवडी : हिंजवडी, माण आयटीनगरी परिसरात सध्या कचºयाच्या ढिगाºयाला अचानक लागणाºया आगीच्या घटनांमुळे हवेत नेहमीच काळेकुट्ट धुराचे लोट दिसतात. आयटी पार्क परिसरातील मोकळ्या जागांवर कचरा, प्लॅस्टिक, फोम, तसेच वाहनांचे टायर, हॉटेलमधील उरलेले अन्नपदार्थ बिनदिक्कतपणे टाकले जात असल्याने अनेक ठिकाणी छोट्या स्वरूपातील कचरा डेपो तयार झाले आहेत. कोणत्या ना कोणत्या ठिकाणी आग लागून हिंजवडी परिसरात निरभ्र आकाशात काळेकुट्ट धुराचे लोट दिसून येत असल्याने आयटी परिसरात प्रदूषण करणाºया कंपन्या दाखल झाल्या की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आयटी पार्क परिसरात सुमारे १२८ हून अधिक आयटी कंपन्या आहेत. उच्चशिक्षित, उच्चभ्रू जीवनशैली जगणारे हजारो आयटीयन्स या ठिकाणी काम करतात. सध्या मोकळ्या जागांवरील कचºयाला आग लागण्याच्या घटना या भागात नित्याच्याच झाल्या आहेत. मोठ्या प्रमाणात घनकचरा, कंपन्यांचे भंगार, प्लॅस्टिक, शिळे अन्नपदार्थ टाकले जात असून, ग्रामपंचायत, एमआयडीसी अथवा या परिसरात काम करणाºया जबाबदार संस्था यांपैकी कोणीच याकडे लक्ष देत नाही.पंधरा दिवसांत कचºयाला आग लागण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. फेज १ मधील हिंजवडी, माण रस्त्यावरील अशोक मिडोज सोसायटीशेजारील मोकळ्या मैदानात रात्री मोठ्या प्रमाणात कचरा टाकून पेटवण्यात आला होता, तरचार दिवसांपूर्वी माण हद्दीतील फेज ३ मधील गंगारामवाडीजवळील मोकळ्या मैदानात मोठ्याप्रमाणात कचºयाच्या ढिगाºयाला आग लागली होती. फेज ३ मधील अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्काळ धाव घेत आग आटोक्यात आणली होती. कचरा मोकळ्या जागेत टाकला जात आहे.उपाययोजना : यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभावकचºयाच्या ढिगाºयामध्ये कंपन्यांचे प्लॅस्टिक, भंगार मोठ्या प्रमाणात आहे. अनेक वेळा एमआयडीसी, ग्रामपंचायत अथवा संबंधित यंत्रणा यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव असल्याने अज्ञातांचे फावते; मात्र अशा घटनांना आळा बसला पाहिजे. ही जबाबदारी सर्वांचीच आहे. असा प्रकार होत असल्याचे दिसताच संबंधित यंत्रणांना कळवणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतीकडे कर्मचारी संख्या अपुरी असते; मात्र परिसरात रात्रंदिवस टेहळणी होणे गरजेचे आहे. - भरत पाटील, ग्रामविकास अधिकारी, माणकचरा टाकून पेटवणाºयांचा बंदोबस्त व्हायला पाहिजे. कंपन्यांना ओला कचरा कंपनीमध्येच नष्ट करावा लागतो हा नियम आहे, तर भंगार अथवा वेस्ट मटेरियल व्हेंडरकडून बाहेर पाठवले जाते. त्यामुळे कंपन्यांकडून असे प्रकार होत नसावेत; मात्र एमआयडीसी हद्दीत आमचे लक्ष असते. अशा घटना घडू नयेत म्हणून आमचा विभाग दक्ष आहे.- नीलेश मोढवे, कार्यकारी अभियंता, हिंजवडी एमआयडीसीआयटी पार्कमध्ये कचºयाच्या ढिगाºयाला आग लागण्याच्या घटना वारंवार घडत असतात. माहिती मिळाल्यावर तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग नियंत्रणात आणली जाते. आगीत प्रामुख्याने प्लॅस्टिक, फोम, स्क्रॅप, अन्नपदार्थ यांचे प्रमाण अधिक असल्याने काळा धूर होतो.- सुनील इंगवले,अग्निशामक अधिकारी, हिंजवडी फेज ३.

टॅग्स :Puneपुणे