शहरं
Join us  
Trending Stories
1
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
2
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
4
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
5
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
6
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
7
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
8
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
9
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
10
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
11
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
12
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
13
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
14
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
15
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
16
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
17
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
18
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
19
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
20
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?

मार्चएंडमुळे कर्जाच्या वसुलीला चढला जोर

By admin | Updated: March 29, 2017 00:24 IST

मार्चएंडमुळे वीजबिल, बँकांचे हप्ते वसुलीला जोर आला असून, कांद्याला बाजारभाव मिळत नसल्यामुळे

टाकळी हाजी : मार्चएंडमुळे वीजबिल, बँकांचे हप्ते वसुलीला जोर आला असून, कांद्याला बाजारभाव मिळत नसल्यामुळे हप्त्याबरोबरच मुला-मुलींचे लग्न कसे करायचे आणि कर्जाचे हप्ते फेडायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. गेल्यावर्षी दुष्काळ परिस्थिती व शेतमालाला न मिळालेला बाजारभाव यामुळे कर्जात गेलेल्या शेतकऱ्याने मोठ्या उमेदीने कर्ज काढून कांदा लागवड केली. नोटाबंदीमुळे तीन महिने भाजीपाल्याचे भाव मातीमोल झाले होते. गेल्या वर्षीचा कांदा अजून तसाच कांदाचाळीत आहे. आता सध्या कांदा काढणीच्या कामाला वेग आला आहे. मात्र, बाजारभाव ४ ते ५ रुपये किलोच मिळत आहे. त्यामधून कांद्याचा उत्पादन खर्चसुद्धा मिळत नाही; परंतु बँकांचा तगादा, वीजबिल वसुली यामुळे मातीमोल भावाने शेतकरी कांदा विकत आहे. भाजीपाल्याचे पैसे झाले नाहीत. कांद्याचे नाही, मग कर्ज फेडायचे कसे, असा सवाल शेतकरीवर्गातून व्यक्त केला जात आहे. सलग दोन वर्षे शेतकरी बाजारभाव नसल्यामुळे आर्थिक संकटात आला असून, शेती करण्यापेक्षा पडीक ठेवलेली बरी अशी प्रतिक्रिया शेतकरीवर्गातून व्यक्त होत आहे. जिल्हा बँकांचे पीक कर्जाचे हप्तेही वेळेत नाही फेडले तर २ टक्के व्याजमाफीला तेथेही शेतकरी मुकणार आहे. (वार्ताहर)कांद्यासाठी नाफेड सुरू करावे : गावडेशासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी नाफेड सुरू करून १० रुपये किलोने कांदा खरेदी करावा, त्यामुळे पुणे, नगर, नाशिक, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना या कांदा उत्पादक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किमान खर्च, कर्ज देणे तसेच मुलामुलींचं लग्नकार्य तरी करणे शक्य होईल, अशी मागणी शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी केली आहे.