शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंची चूक कबुल केली, म्हणाले...
2
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
3
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
4
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
5
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
6
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
7
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
8
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
9
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
10
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
12
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
13
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
14
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
15
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
16
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
17
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
18
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
19
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

मार्चएंडमुळे कर्जाच्या वसुलीला चढला जोर

By admin | Updated: March 29, 2017 00:24 IST

मार्चएंडमुळे वीजबिल, बँकांचे हप्ते वसुलीला जोर आला असून, कांद्याला बाजारभाव मिळत नसल्यामुळे

टाकळी हाजी : मार्चएंडमुळे वीजबिल, बँकांचे हप्ते वसुलीला जोर आला असून, कांद्याला बाजारभाव मिळत नसल्यामुळे हप्त्याबरोबरच मुला-मुलींचे लग्न कसे करायचे आणि कर्जाचे हप्ते फेडायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. गेल्यावर्षी दुष्काळ परिस्थिती व शेतमालाला न मिळालेला बाजारभाव यामुळे कर्जात गेलेल्या शेतकऱ्याने मोठ्या उमेदीने कर्ज काढून कांदा लागवड केली. नोटाबंदीमुळे तीन महिने भाजीपाल्याचे भाव मातीमोल झाले होते. गेल्या वर्षीचा कांदा अजून तसाच कांदाचाळीत आहे. आता सध्या कांदा काढणीच्या कामाला वेग आला आहे. मात्र, बाजारभाव ४ ते ५ रुपये किलोच मिळत आहे. त्यामधून कांद्याचा उत्पादन खर्चसुद्धा मिळत नाही; परंतु बँकांचा तगादा, वीजबिल वसुली यामुळे मातीमोल भावाने शेतकरी कांदा विकत आहे. भाजीपाल्याचे पैसे झाले नाहीत. कांद्याचे नाही, मग कर्ज फेडायचे कसे, असा सवाल शेतकरीवर्गातून व्यक्त केला जात आहे. सलग दोन वर्षे शेतकरी बाजारभाव नसल्यामुळे आर्थिक संकटात आला असून, शेती करण्यापेक्षा पडीक ठेवलेली बरी अशी प्रतिक्रिया शेतकरीवर्गातून व्यक्त होत आहे. जिल्हा बँकांचे पीक कर्जाचे हप्तेही वेळेत नाही फेडले तर २ टक्के व्याजमाफीला तेथेही शेतकरी मुकणार आहे. (वार्ताहर)कांद्यासाठी नाफेड सुरू करावे : गावडेशासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी नाफेड सुरू करून १० रुपये किलोने कांदा खरेदी करावा, त्यामुळे पुणे, नगर, नाशिक, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना या कांदा उत्पादक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किमान खर्च, कर्ज देणे तसेच मुलामुलींचं लग्नकार्य तरी करणे शक्य होईल, अशी मागणी शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी केली आहे.