शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

बायोगॅस प्रकल्पांची क्षमता पालिका वाढविणार

By admin | Updated: October 15, 2015 01:15 IST

शून्य कचरा मोहिमेत सुमारे १२ कोटी रुपये खर्च करून सुरू केलेल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती प्रकल्पांमधून अपेक्षित प्रमाणात गॅसनिर्मिती

पुणे : शून्य कचरा मोहिमेत सुमारे १२ कोटी रुपये खर्च करून सुरू केलेल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती प्रकल्पांमधून अपेक्षित प्रमाणात गॅसनिर्मिती होत नसल्याने त्यात सुधारणा करण्यासाठी महापालिकेने तांत्रिक समितीची स्थापना केली आहे. वर्षभरापूर्वी फुरसुंगी व उरुळी देवाची येथील ग्रामस्थांनी कचरा टाकण्यास विरोध केल्यानंतर त्यातून सुटका करून कचऱ्यापासून वीज तसेच बायोगॅस निर्मिती प्रकल्प सुरू करण्यावर भर दिला. शहरात कात्रज, बावधन, औंध, बाणेर, तळजाई, मॉडेल कॉलनी अशा सुमारे २० ठिकाणी प्रत्येकी ५ मेट्रिक टन क्षमतेचे २० प्रकल्प काही खासगी संस्थांच्या साह्याने सुरू करण्यात आले. रोज किमान १०० टन ओला कचरा वापरला जाणे अपेक्षित होते.सुरुवातीच्या काळात हे प्रकल्प सुरू होते. नंतर मात्र अपेक्षित गॅस निर्मिती होणे थांबले. त्यामुळे आता त्यात रोज फक्त ७० ते ८० टन ओला कचराच वापरला जातो. गॅस निर्मितीही फक्त ५४ टक्केच होते.कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती क्षेत्रात आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आले आहे. त्याचा वापर केल्यास महापालिकेच्या प्रकल्पांमध्ये सुधारणा होऊ शकते; मात्र महापालिकेकडे तंत्रज्ञ नाहीत. त्यामुळेच या प्रकल्पांसाठी आता घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त किशोरी गद्रे यांनी या तज्ज्ञांची एक समिती स्थापन केली आहे. या समितीने सर्व प्रकल्पांचा अभ्यास करून काय त्रुटी आहेत, याचा अहवाल महापालिकेला द्यायचा आहे. त्याप्रमाणे बदल केल्यानंतर हे सर्व प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होतील.वीजनिर्मितीसाठी महापालिकेने रामटेकडी येथील प्रकल्प सुरू करण्यास रोकेम या संस्थेला मान्यता दिली होती. या प्रकल्पात सुमारे ७०० टन ओला व सुका कचरा वापरला जाणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र त्यांच्याकडून फक्त २५० टन कचऱ्याचाच वापर केला जात आहे. हा प्रकल्पही पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची तंबी महापालिकेने रोकेमला दिली आहे. त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. (प्रतिनिधी)बायोगॅस निर्मितीतून गॅस इंजिनाद्वारे वीज तयार करून तिचा वापर त्या परिसरातील पथदिव्यांसाठी केला जावा, असे अपेक्षित आहे. मॉडेल कॉलनी येथील प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या गॅसपासून इंजिनाद्वारे वीज तयार करून तिचा वापर परिसरातील पथदिव्यांसाठी केला जातो; मात्र हे प्रमाणही कमी आहे. तसेच, काही ठिकाणच्या प्रकल्पांमध्ये यासाठी लागणारी तांत्रिक सुविधा नाही. त्यामुळे तिथे तयार होणारा गॅस जाळला जातो. शहरात निर्माण होणारा कचरा शहरातच जिरवला जावा, हा मूळ उद्देश असल्यामुळे वीजनिर्मिती व त्याचा वापर याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे.