शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बायोगॅस प्रकल्पांची क्षमता पालिका वाढविणार

By admin | Updated: October 15, 2015 01:15 IST

शून्य कचरा मोहिमेत सुमारे १२ कोटी रुपये खर्च करून सुरू केलेल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती प्रकल्पांमधून अपेक्षित प्रमाणात गॅसनिर्मिती

पुणे : शून्य कचरा मोहिमेत सुमारे १२ कोटी रुपये खर्च करून सुरू केलेल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती प्रकल्पांमधून अपेक्षित प्रमाणात गॅसनिर्मिती होत नसल्याने त्यात सुधारणा करण्यासाठी महापालिकेने तांत्रिक समितीची स्थापना केली आहे. वर्षभरापूर्वी फुरसुंगी व उरुळी देवाची येथील ग्रामस्थांनी कचरा टाकण्यास विरोध केल्यानंतर त्यातून सुटका करून कचऱ्यापासून वीज तसेच बायोगॅस निर्मिती प्रकल्प सुरू करण्यावर भर दिला. शहरात कात्रज, बावधन, औंध, बाणेर, तळजाई, मॉडेल कॉलनी अशा सुमारे २० ठिकाणी प्रत्येकी ५ मेट्रिक टन क्षमतेचे २० प्रकल्प काही खासगी संस्थांच्या साह्याने सुरू करण्यात आले. रोज किमान १०० टन ओला कचरा वापरला जाणे अपेक्षित होते.सुरुवातीच्या काळात हे प्रकल्प सुरू होते. नंतर मात्र अपेक्षित गॅस निर्मिती होणे थांबले. त्यामुळे आता त्यात रोज फक्त ७० ते ८० टन ओला कचराच वापरला जातो. गॅस निर्मितीही फक्त ५४ टक्केच होते.कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती क्षेत्रात आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आले आहे. त्याचा वापर केल्यास महापालिकेच्या प्रकल्पांमध्ये सुधारणा होऊ शकते; मात्र महापालिकेकडे तंत्रज्ञ नाहीत. त्यामुळेच या प्रकल्पांसाठी आता घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त किशोरी गद्रे यांनी या तज्ज्ञांची एक समिती स्थापन केली आहे. या समितीने सर्व प्रकल्पांचा अभ्यास करून काय त्रुटी आहेत, याचा अहवाल महापालिकेला द्यायचा आहे. त्याप्रमाणे बदल केल्यानंतर हे सर्व प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होतील.वीजनिर्मितीसाठी महापालिकेने रामटेकडी येथील प्रकल्प सुरू करण्यास रोकेम या संस्थेला मान्यता दिली होती. या प्रकल्पात सुमारे ७०० टन ओला व सुका कचरा वापरला जाणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र त्यांच्याकडून फक्त २५० टन कचऱ्याचाच वापर केला जात आहे. हा प्रकल्पही पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची तंबी महापालिकेने रोकेमला दिली आहे. त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. (प्रतिनिधी)बायोगॅस निर्मितीतून गॅस इंजिनाद्वारे वीज तयार करून तिचा वापर त्या परिसरातील पथदिव्यांसाठी केला जावा, असे अपेक्षित आहे. मॉडेल कॉलनी येथील प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या गॅसपासून इंजिनाद्वारे वीज तयार करून तिचा वापर परिसरातील पथदिव्यांसाठी केला जातो; मात्र हे प्रमाणही कमी आहे. तसेच, काही ठिकाणच्या प्रकल्पांमध्ये यासाठी लागणारी तांत्रिक सुविधा नाही. त्यामुळे तिथे तयार होणारा गॅस जाळला जातो. शहरात निर्माण होणारा कचरा शहरातच जिरवला जावा, हा मूळ उद्देश असल्यामुळे वीजनिर्मिती व त्याचा वापर याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे.