शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

बायोगॅस प्रकल्पांची क्षमता पालिका वाढविणार

By admin | Updated: October 15, 2015 01:15 IST

शून्य कचरा मोहिमेत सुमारे १२ कोटी रुपये खर्च करून सुरू केलेल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती प्रकल्पांमधून अपेक्षित प्रमाणात गॅसनिर्मिती

पुणे : शून्य कचरा मोहिमेत सुमारे १२ कोटी रुपये खर्च करून सुरू केलेल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती प्रकल्पांमधून अपेक्षित प्रमाणात गॅसनिर्मिती होत नसल्याने त्यात सुधारणा करण्यासाठी महापालिकेने तांत्रिक समितीची स्थापना केली आहे. वर्षभरापूर्वी फुरसुंगी व उरुळी देवाची येथील ग्रामस्थांनी कचरा टाकण्यास विरोध केल्यानंतर त्यातून सुटका करून कचऱ्यापासून वीज तसेच बायोगॅस निर्मिती प्रकल्प सुरू करण्यावर भर दिला. शहरात कात्रज, बावधन, औंध, बाणेर, तळजाई, मॉडेल कॉलनी अशा सुमारे २० ठिकाणी प्रत्येकी ५ मेट्रिक टन क्षमतेचे २० प्रकल्प काही खासगी संस्थांच्या साह्याने सुरू करण्यात आले. रोज किमान १०० टन ओला कचरा वापरला जाणे अपेक्षित होते.सुरुवातीच्या काळात हे प्रकल्प सुरू होते. नंतर मात्र अपेक्षित गॅस निर्मिती होणे थांबले. त्यामुळे आता त्यात रोज फक्त ७० ते ८० टन ओला कचराच वापरला जातो. गॅस निर्मितीही फक्त ५४ टक्केच होते.कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती क्षेत्रात आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आले आहे. त्याचा वापर केल्यास महापालिकेच्या प्रकल्पांमध्ये सुधारणा होऊ शकते; मात्र महापालिकेकडे तंत्रज्ञ नाहीत. त्यामुळेच या प्रकल्पांसाठी आता घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त किशोरी गद्रे यांनी या तज्ज्ञांची एक समिती स्थापन केली आहे. या समितीने सर्व प्रकल्पांचा अभ्यास करून काय त्रुटी आहेत, याचा अहवाल महापालिकेला द्यायचा आहे. त्याप्रमाणे बदल केल्यानंतर हे सर्व प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होतील.वीजनिर्मितीसाठी महापालिकेने रामटेकडी येथील प्रकल्प सुरू करण्यास रोकेम या संस्थेला मान्यता दिली होती. या प्रकल्पात सुमारे ७०० टन ओला व सुका कचरा वापरला जाणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र त्यांच्याकडून फक्त २५० टन कचऱ्याचाच वापर केला जात आहे. हा प्रकल्पही पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची तंबी महापालिकेने रोकेमला दिली आहे. त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. (प्रतिनिधी)बायोगॅस निर्मितीतून गॅस इंजिनाद्वारे वीज तयार करून तिचा वापर त्या परिसरातील पथदिव्यांसाठी केला जावा, असे अपेक्षित आहे. मॉडेल कॉलनी येथील प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या गॅसपासून इंजिनाद्वारे वीज तयार करून तिचा वापर परिसरातील पथदिव्यांसाठी केला जातो; मात्र हे प्रमाणही कमी आहे. तसेच, काही ठिकाणच्या प्रकल्पांमध्ये यासाठी लागणारी तांत्रिक सुविधा नाही. त्यामुळे तिथे तयार होणारा गॅस जाळला जातो. शहरात निर्माण होणारा कचरा शहरातच जिरवला जावा, हा मूळ उद्देश असल्यामुळे वीजनिर्मिती व त्याचा वापर याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे.