शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
2
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
3
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: आंदोलन सुरूच राहणार, सर्व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही: मनोज जरांगे
4
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
5
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
6
गणेशोत्सव साजरा करत नाही आलिया? ट्रोल झाल्यानंतर दिलं सडेतोड उत्तर; फोटो शेअर करत म्हणाली...
7
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
8
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
9
४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न!
10
'ही' आंतरराष्ट्रीय बँक भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?
11
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
12
तुम्हाला कन्नड येते का? मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपतींचे चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या,'प्रत्येकाने आपली भाषा...'
13
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
14
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
15
लेख: मतभेद पुसून न टाकता ऐक्य साधता येईल काय?
16
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
17
Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार
18
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
19
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
20
आजचा अग्रलेख: अमेरिका विरुद्ध सर्व? ट्रम्प यांच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी अनेक देश एकत्र

राज्याच्या चुकीने डावलले पिंपरीला

By admin | Updated: September 10, 2015 04:10 IST

महाराष्ट्रातून स्मार्ट सिटी योजनेसाठी ११ शहरांचे प्रस्ताव पाठविले होते. त्यावेळी पुणे व पिंपरी-चिंचवड एकत्र न करता स्वतंत्र नावे पाठविण्याची सूचना दिली होती. त्यानंतर शासनाने पाठविलेल्या

पिंपरी : महाराष्ट्रातून स्मार्ट सिटी योजनेसाठी ११ शहरांचे प्रस्ताव पाठविले होते. त्यावेळी पुणे व पिंपरी-चिंचवड एकत्र न करता स्वतंत्र नावे पाठविण्याची सूचना दिली होती. त्यानंतर शासनाने पाठविलेल्या यादीतून पिंपरी-चिंचवड शहर गायब होते. ही चूक राज्य शासनाची असून, त्यामध्ये केंद्र शासनाचा कोणताही हस्तक्षेप नाही, असा गौप्यस्फोट केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी पिंपरी-चिंचवडच्या शिष्टमंडळापुढे बुधवारी केला. स्मार्ट सिटी योजनेत डावलल्याने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्ली येथे बुधवारी सकाळी साडेनऊला नगरविकासमंत्री नायडू यांची भेट घेतली. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह खासदार वंदना चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, महापौर शकुंतला धराडे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, विरोधी पक्षनेते विनोद नढे, स्थायी समिती अध्यक्ष अतुल शितोळे, पक्षनेत्या मंगला कदम, माजी महापौर योगेश बहल, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, आयुक्त राजीव जाधव आदी उपस्थित होते. ‘‘पिंपरी-चिंचवड आणि पुणे ही जुळी शहरे आहेत. या ठिकाणी केंद्राचे अनेक प्रकल्प एकत्रितपणे सुरू आहेत. आयटी हब आणि आॅटो हब म्हणून लौकिक मिळालेला आहे. या ठिकाणी अनेक उद्योग येत आहेत. मात्र, पिंपरी-चिंचवडला डावलल्याने नवीन उद्योगधंदे येण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. चांगले गुण मिळवूनही पिंपरी-चिंचवडवर अन्याय झाला आहे, अशी आमची भावना आहे. आपण याबाबत लक्ष घालावे,’’ अशी विनंती शिष्टमंडळातर्फे शरद पवार यांनी नायडू यांच्याकडे केली. तसेच, नायडू यांना महापौरांनी मागणीचे निवेदन दिले. त्यावर ‘पिंपरी-चिंचवड शहर पहिल्या पाचमध्ये होते. त्यामुळे आमचा समावेश होईल, असा आम्हाला विश्वास होता. गुणवत्ता पाहून स्मार्ट सिटीत समावेश करावा. एकशे एकावे शहर म्हणून या योजनेत समावेश करावा,’ अशी मागणी पवार यांनी केली. त्यावर नायडू म्हणाले, ‘‘मी मुख्यमंत्री, पंतप्रधान कार्यालयाशी बोलतो. चर्चा करतो. माहिती घेतो. केंद्र सरकारने कोणताही अन्याय केलेला नाही. सहानुभूतीने, सकारात्मकतेने विचार करू.’’ (प्रतिनिधी)मी ज्या भागाचे नेतृत्व करतो, त्या बंगळुरूचाही समावेश स्मार्ट सिटीत नाही. स्मार्ट सिटीबाबत केंद्र सरकारने कोणताही हस्तक्षेप केलेला नाही किंवा तुमचे नाव रद्द केलेले नाही. याबाबत राज्य सरकारने जी नावे पाठविली, त्यांचा विचार केला आहे. ज्या वेळी यादी जाहीर झाली, त्याच वेळी अपील किंवा आपले म्हणणे मांडणे आवश्यक होते.- व्यंकय्या नायडू, केंद्रीय नगरविकासमंत्री