शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

पालखीला पालिकेकडूनच ‘गैरसोय’

By admin | Updated: June 22, 2017 06:56 IST

संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी पुणे पालिकेकडून कोणत्याही प्रकारची तयारी करण्यात आलेली नव्हती

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी पुणे पालिकेकडून कोणत्याही प्रकारची तयारी करण्यात आलेली नव्हती, असा आरोप काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी केला. या नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेमधून काढता पाय घेत नाराजी व्यक्त केली. वारकऱ्यांसाठी ना प्यायच्या पाण्याची व्यवस्था होती, ना आरोग्याच्या सुविधा देण्यात आल्या होत्या. मांडवही घालण्यात आलेले नसल्याचे सांगून महापौर काहीही ऐकून घेत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. महापौर मुक्ता टिळक यांनी मात्र विरोधी पक्षाची भाषा चुकीची असल्याचा बचावात्मक पवित्रा घेतला आहे. विरोधी पक्षांनी वारकऱ्यांच्या झालेल्या गैरसोयीवर लक्ष वेधून महापौर प्रशासनाला जाब विचारण्याऐवजी पाठीशी घालत असल्याचा आरोप केला. सभात्यागाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक बाबूराव चांदेरे आणि शिवसेना गटनेते संजय भोसले यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. वारकऱ्यांना प्यायला पाणी नव्हते, औषधोपचार मिळाले नाहीत. पूर्वी शहरात १५० मांडव टाकण्यात येत असत, या वेळी केवळ ९० मांडव टाकण्यात आल्याचे काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले. सर्वसाधारण सभेत महापौरांनी या विषयावर चर्चा होऊ दिली नाही, असेही ते म्हणाले.विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी गेल्या ६० वर्षांत वारकऱ्यांची पहिल्यांदाच एवढी गैरसोय झाली असून, १५ वर्षांपासून महापालिकेत असलेल्या भाजपा सदस्यांना वारकऱ्यांना कोणत्या प्रकारच्या सोयीसुविधा द्यायच्या, याची माहिती नाही का? असा प्रश्न उपस्थित केला. तर नाना पेठ, भवानी पेठेत वारकऱ्यांना विविध गैरसोयींचा सामना करावा लागला, असे माजी नगरसेवक रवींद्र माळवदकर यांनी सांगितले.