शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

द्राक्ष निर्यातदार कंपन्यांची प्रोत्साहन रक्कम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:12 IST

राजू इनामदार लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : द्राक्ष निर्यात करणाऱ्या कंपन्यांना परदेशातून मिळणाऱ्या रकमेवर दिली जाणारी प्रोत्साहनपर रक्कम केंद्र ...

राजू इनामदार

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : द्राक्ष निर्यात करणाऱ्या कंपन्यांना परदेशातून मिळणाऱ्या रकमेवर दिली जाणारी प्रोत्साहनपर रक्कम केंद्र सरकारने बंद केली आहे. त्याचा थेट परिणाम द्राक्षांच्या किमतीवर होत असल्याने निर्यातदार शेतकरी हैराण झाले आहेत.

मागील वर्षांपर्यंत कंपन्यांना ही रक्कम मिळत होती. द्राक्ष निर्यातीला प्रोत्साहन म्हणून परदेशातून मिळत असलेल्या त्यांच्या चलनातील एकूण रकमेवर ७ टक्के या दराने भारतीय चलनात ही रक्कम निर्यातदार कंपनीला केंद्र सरकार देत असे. त्यामुळे अनेक निर्यातदार कंपन्या या क्षेत्रात पुढे आल्या. त्याचा द्राक्ष उत्पादन शेतकऱ्यांना अप्रत्यक्षपणे लाभ होत होता.

मागील ५ वर्षांत ही रक्कम ५ टक्के करण्यात आली. केंद्र सरकार यासाठी स्वतंत्र तरतूद करत होते, त्याऐवजी कृषी खात्याच्या वेगवेगळ्या योजनांमधून ही रक्कम देण्यात येऊ लागली. जानेवारी २०२१ पासून तर ती बंदच करण्यात आली आहे. गेल्या वर्षी ३५ हजार शेतकऱ्यांनी द्राक्ष निर्यात केली होती. दरवर्षी साधारण २ लाख द्राक्षे निर्यात होतात. सध्या २०० पेक्षा जास्त कंपन्या द्राक्ष निर्यातीत काम करतात. या निर्यातदार कंपन्यांनी द्राक्ष खरेदी दरात कपात केली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्रातील द्राक्षांना जागतिक बाजारपेठेत चांगली मागणी आहे. देशात यंदा ४२ हजार २५० द्राक्ष बागांची नोंदणी झाली आहे. त्यातील ४१ हजार ९८० बागा महाराष्ट्रातच आहेत. त्यातल्याही ३५ हजार २६० बागा फक्त नाशिक जिल्ह्यात आहेत. अनेक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येत द्राक्ष निर्यात कंपन्या स्थापन करून त्यात चांगला जम बसवला आहे. त्यांनाही केंद्र सरकारच्या या धोरणाचा फटका बसला आहे.

चौकट

निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेताना अनेक प्रकारची काळजी घ्यावी लागते. त्यासाठी खर्च करावा लागतो. चांगला दर मिळाला तरच यात फायदा आहे. त्यामुळे केंद्र सरकारने प्रोत्साहन रक्कम त्वरित सुरू करावी.

कैलास भोसले, खजिनदार, द्राक्ष बागायतदार संघ

चौकट

निर्यातदार कंपन्यांना प्रोत्साहन रकमेचा फायदा होत होता. ही योजना आता बंद आहे हे खरे आहे, मात्र नवी योजना सुरू करून ही रक्कम पूर्ववत देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

विलास शिंदे, सह्याद्री फार्म, द्राक्ष निर्यातदार कंपनी