शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
4
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
5
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
6
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
7
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
8
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
9
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
10
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
11
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
12
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
13
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
14
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
15
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
16
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
17
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
18
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
19
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
20
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी

‘आयुष्मान भारत’मध्ये नुसताच जाहिरातींचा मारा, उपचार शून्य! कार्ड काढण्याचा मात्र धडाका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 09:59 IST

आयुष्मान भारत ही केंद्र शासनाने २०१८ राेजी सुरू केलेली पाच लाख रुपयापर्यंत माेफत उपचार देणारी याेजना आहे...

पुणे : प्रत्येकाला पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार माेफत करण्याची जाहिरात माेठ्या प्रमाणावर केली जात आहे. त्यासाठी केंद्र शासनाच्या आयुष्मान भारत याेजनेचे कार्ड काढून देण्याचा धडाका सुरू आहे. दुसरीकडे या याेजनेतून ससून आणि पुणे कॅन्टाेन्मेंट हाॅस्पिटल वगळता इतर काेणत्याही शासकीय किंवा खासगी हाॅस्पिटलमध्ये उपचार हाेत नाहीत. त्यामुळे या कार्डचा उपयाेग सध्यातरी शून्य हाेत असल्याचा अनुभव रुग्ण आणि नातेवाइकांना येत आहे.

महात्मा फुले जन आराेग्य याेजनेतून अनेक शस्त्रक्रिया हाेत नाहीत आणि पाच लाख रुपयांची मर्यादाही अजून लागू झाली नसल्याने दाेन्ही आराेग्य याेजनांचा नुसताच गवगवा केला जात असल्याचा अनुभव रुग्णांना येत आहे.

काय आहे याेजना?

आयुष्मान भारत ही केंद्र शासनाने २०१८ राेजी सुरू केलेली पाच लाख रुपयापर्यंत माेफत उपचार देणारी याेजना आहे. याबाबत केंद्र व राज्य शासनाकडून माेठ्या प्रमाणावर जाहिरात केली जाते. परंतु, माेठ्या खासगी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेल्या मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये ही याेजनाच नाही. ही याेजना प्रामुख्याने शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांची रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये येथे आहे.

समस्या काय :

या याेजनेस पात्र असलेल्या रुग्णाला सुरुवातीला थेट या याेजनेतून उपचार केले जात नाही. तर, आधी महात्मा फुले जन आराेग्य याेजनेतून उपचार केले जातात आणि याेजनेचा दीड लाखाचा निधी संपला तर आणि आयुष्मान भारत या याेजनेत घेऊन उपचार केले जातात. परंतु, तुरळक प्रकारच्या पेशंटना याची गरज पडते. म्हणून आयुष्मान भारत ही याेजना पांढरा हत्ती ठरत आहे.

प्रमुख उपचार महात्मा फुले याेजनेतूनच :

वास्तविक पाहता अंगीकृत रुग्णालयांमध्ये आयुष्मान भारत याेजना महाराष्ट्रासह देशात २०१८ मध्ये लागू झाली. मात्र, महाराष्ट्रात दीड लाखापर्यंत माेफत उपचार देणारी महात्मा फुले जन आराेग्य याेजना (राजीव गांधी जन आराेग्य याेजना) २०१४ पासूनच सुरू हाेती. त्याअंतर्गत अपघात, अँजिओप्लास्टी, बायपास, अस्थिराेग, मेंदूविकार यासह साडेसातशे प्रकारचे उपचार हाेत हाेते. म्हणून आयुष्मान भारत याेजना आल्यावर २०१८ पासून या याेजनेची महाराष्ट्रात कशी अंमलबजावणी करायची याचा पेच हाेता. म्हणून महात्मा फुले जन आराेग्य याेजना आणि आयुष्मान भारत याेजना एकत्र केली आहे. परंतु, प्रमुख उपचार महात्मा फुले याेजनेतूनच हाेत आहेत.

परतावा मिळेना म्हणून टाळाटाळ :

महात्मा फुले जनआराेग्य याेजना ही पुण्यातील सरकारी आणि खासगी मिळून ६९ रुग्णालयांत आहे. आयुष्मान भारत ही याेजना ससून रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, कॅंटाेन्मेंट रुग्णालय आणि काही उपजिल्हा रुग्णालयांतच आहे. ज्यांनी या याेजनेतून उपचार घेतले त्या हाॅस्पिटल्सना शासनाकडून परतावाही मिळालेला नाही. त्यामुळे या याेजनेतून उपचार देण्यास सरकारी रुग्णालयेही टाळाटाळ करत आहेत.

कार्ड काढण्याचा मात्र धडाका!

आयुष्मान भारत याेजनेतून उपचार मिळत नसले तरी याचे कार्ड काढण्याचा धडाका केंद्र आणि राज्य शासनाने लावला आहे. आराेग्य विभागासह सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडूनही हे कार्ड काढले जावे, यासाठी प्रचंड फाॅलाेअप सुरू आहे. तसेच महात्मा फुले जनआराेग्य याेजनेच्या कर्मचारी-अधिकाऱ्यांनाही याचे प्रेशर आहे. दुसरीकडे या कार्डचा काही उपयाेग हाेत नसल्याने रुग्णांच्या संतापाला सामाेरे जावे लागत आहे.

पॅकेज वाढवणे गरजेचे :

महात्मा फुले जनआराेग्य याेजना २०१४ मध्ये सुरू झाली. त्यावेळी या अंतर्गत खासगी रुग्णालयांना शस्त्रक्रिया किंवा प्रक्रिया करण्यासाठी जे पॅकेज हाेते ते आज ९ वर्षांनंतरही कायम आहे. त्यामुळे ते पॅकेज खासगी रुग्णालयांना परवडत नाही. त्यामुळे खासगी रुग्णालये या याेजनेत येण्यास उत्सुक नसतात. त्यासाठी पॅकेज वाढवणे गरजेचे आहे.

टॅग्स :Puneपुणेayushman bharatआयुष्मान भारत