शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

शिक्षक मान्यतेच्या चिरीमिरीला आळा, न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 05:14 IST

शिक्षकांच्या मान्यतेचे प्रस्ताव मुद्दाम रखडवून एजंटांच्या माध्यमातून तसेच थेटपणे चिरीमिरी घेण्याच्या प्रकाराला आता आळा बसणार आहे.

पुणे : शिक्षकांच्या मान्यतेचे प्रस्ताव मुद्दाम रखडवून एजंटांच्या माध्यमातून तसेच थेटपणे चिरीमिरी घेण्याच्या प्रकाराला आता आळा बसणार आहे. शाळांकडून शिक्षणाधिकारी तसेच विभागीय उपसंचालक कार्यालयांकडे दाखल झालेल्या मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मान्यतेचा प्रस्ताव दोन महिन्यांच्या (आठ आठवडे) आत निकाली काढण्याचे निर्देश शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत.राज्यातील हजारो शिक्षकांचे प्रस्ताव शिक्षणाधिकारी तसेच शिक्षण उपसंचालकांकडे रखडले आहेत. याप्रकरणी एका शिक्षणसंस्थेने औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती. तीवर निर्णय देताना शिक्षक मान्यतेच्या प्रकरणांचा निपटारा दोन महिन्यांच्या आत करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार शिक्षण विभागाकडून त्याबाबची अंमलबजाणी करण्याचे परिपत्रकही काढण्यात आले आहे. शिक्षण संचालक, विभागीय उपसंचालक, शिक्षणाधिकारी याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.शिक्षक मान्यतेच्या प्रस्तावांवर वर्षानुवर्षे निर्णय न घेता तीप्रकरणे स्थगित ठेवण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर, शिक्षक मान्यतेच्या प्रस्तावांना मंजुरीसाठी पैसे घेण्याचे प्रकार घडत होते. त्यामुळे मान्यतेचा निर्णय घेण्यासाठी एक निश्चित कार्यकाळ ठरवून देण्यात आला आहे.सद्य:स्थितीतील प्रस्तावांनाही नियम1शाळेतील शिक्षकांच्या नियुक्तीसाठी आलेले प्रस्ताव नियमानुसार आहेत का, त्याची खात्री करावी. संस्थेकडून आलेल्या मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षणसेवक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नियुक्तीला मान्यता देण्यासाठी प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून दोन महिन्यांच्या आत त्यावर निर्णय घ्यावा. तो निर्णय संबंधित संस्था अथवा विद्यालयप्रमुखांना कळवावा. सद्य:स्थितीत प्रलंबित असलेल्या प्रस्तावावरदेखील दोन महिन्यांच्या आता निर्णय घ्यावा, असे आदेशामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.2 शिक्षक मान्यतेचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर त्याची छाननी करून आठ आठवड्याच्या आत संबंधित संस्था, विद्यालयांना निर्णय न कळविल्यास त्याची गंभीर दखल घेण्यात येईल. तसेच न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :Teacherशिक्षक