शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

येरवड्यातील टपऱ्यांचे अतिक्रमण काढले : ईशान्य मॉलजवळ कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 17:24 IST

येरवडा येथील ईशान्य मॉलजवळील जलसंपदा विभागाच्या वसाहतीच्या मोकळ्या जागेत बेकायदेशीरपणे टप-या उभ्या करून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण अखेर काढण्यात आले आहे.

पुणे: येरवडा येथील ईशान्य मॉलजवळील जलसंपदा विभागाच्या वसाहतीच्या मोकळ्या जागेत बेकायदेशीरपणे टप-या उभ्या करून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण अखेर काढण्यात आले आहे. संबंधित टपऱ्यांवर कारवाई करण्यास जलसंपदा विभागाकडून चालढकल केली जात असल्याचे दिसून आले होते. मात्र अखेर लोकमतच्या पाठपुराव्यानंतर हे अतिक्रमण काढण्यात आले. 

    येरवडा येथील महाराष्ट्र हौसिंग बोर्ड परिसरालगत जलसंपदा विभागाची वसाहती असून या वसाहतीमध्ये काही कुटुुंब वास्तव्यास आहेत. या वसाहतीच्या मोकळ्या जागेवर अनधिकृतपणे टप-या उभारण्यात आल्या होत्या. काही टप-या अनेक वर्षांपासून होत्या. मात्र,जलसंपदा विभागाकडून या टप-यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने टप-यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली होती. जलसंपदा विभागाकडून मे महिन्याच्या दुस-या आठवड्यात कारवाई केली जाणार होती. मात्र, काही राजकीय पक्षातील नेत्यांनी हस्तक्षेप केल्याने टप-यांवर कारवाई झाली नाही.त्यामुळे या परिसरात नवीन टप-या आणून ठेवण्यात आल्या होत्या .जलसंपदा विभागाच्या जागेत केवळ लहान व्यावसायिकांच्या टप-याच नाही तर अनधिकृतपणे किराना मालाचे दुकान,हॉटेल्स,आयस्क्रिम पार्लर आदी सुरू करण्यात आले होते. अखेर त्यांच्यावर आता कारवाई करत हे अतिक्रमण हटवण्यात आले आहे. 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणyerwadaयेरवडा