शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

सोशल मीडिया युवकांसाठी महत्त्वाचे माध्यम - डॉ. आशुतोष जावडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 05:17 IST

मला वाटते की, भारतीय माणसाच्या आत एक उत्सवी मन आहे. विविध प्रकारचे सण-उत्सव आपण साजरे करतो. त्यामुळे संमेलनावर आपण टीका करू नये, असे मत डॉ. आशुतोष जावडेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

युवा साहित्य संमेलन हे पुणे, मुंबई, नागपूर यासारख्या मोठ्या शहरांत न होता ते इस्लामपूरसारख्या परिघावर असलेल्या एका साहित्यिक ठिकाणी होत आहे, हे मला स्वागतार्ह वाटते. या संमेलनाने युवा पिढीला प्रेरणा मिळेल. संमेलनांवर अनेक वेळा टीका केली जाते. मला वाटते की, भारतीय माणसाच्या आत एक उत्सवी मन आहे. विविध प्रकारचे सण-उत्सव आपण साजरे करतो. त्यामुळे संमेलनावर आपण टीका करू नये, असे मत डॉ. आशुतोष जावडेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.जावडेकर म्हणाले, मी एक युवा डेंटिस्ट जरी झालो असलो तरीही लेखकाला लिखाणासाठी किंवा गायकाला गाण्यासाठी कुठली डिग्रीच लागते असे मला वाटत नाही. माझी एका वाक्यात ओळख सांगायची म्हणजे, मी लिहितो, गातो आणि दात काढतो. यातला क्रमही महत्त्वाचा आहे. कारण पहिल्या क्रमांकाला मी लेखक आहे. त्यानंतर मी गाण्यातला माणूस आहे आणि त्याही नंतर तिसºया क्रमांकाला मी दात काढतो. तोही मी फक्त उपजीविकेचे साधन म्हणून नव्हे तर, मला ते काम जमते आणि आवडते. मला नेहमी वाटते, की हा क्रम कळायला तुमच्या आयुष्यातील पस्तिशी उलटावी लागते.नाटकाविषयी सांगायचे, तर याविषयी युवा पिढीत एक जागरूकता आहे. तरुणांना त्याच्यामध्ये असलेली नाटकाची एक ऊर्मी म्हणजे अभिनय, संगीत, लेखन अशा सर्व कलांचा समन्वय असतो त्यामुळे त्यांना हे खूप आवडीचे वाटते. साहित्याविषयी युवा पिढीचा उत्साह हा त्यांच्या त्यांच्या कवितांमधून दिसतो. त्यांना अजूनही शब्दांमध्ये अभिव्यक्त व्हावेसे वाटते हे मला खूप महत्त्वाचे वाटते. आजच्या तरुण पिढीचे लेखन हे निराळे असणार आहे. निराळ्या प्रतलावरती चालणार आहे, हे खूप महत्त्वाचे आहे. आजच्या सोशल मीडियाच्या जगात तरुण मंडळी व्हॉट्स अ‍ॅपद्वारे जी चिन्हे पाठवतात किंवा छोटीशी चारोळी पाठवतात, त्यांचे संवाद हे नाटकासारखेच असतात. या सर्व गोष्टी बघता मला असे वाटते, की समाजाचे हे काम आहे, की त्यांच्यातील प्रतिभा ओळखून त्यांना योग्य ती दिशा देणे आणि ती फक्त व्हॉट्सअ‍ॅपच्या चॅटपुरती मर्यादित न राहता त्यातून काही चांगली निर्मिती होत राहणे होय.सोशल मीडियामुळे अभिव्यक्त होण्यासाठी फेसबुक पेज, ब्लॉग या प्रकारचे अतिशय महत्त्वाचे माध्यम युवा पिढीला मिळाले आहे. मग हे लेखन भलेही कसदार नसेल पण, ते महत्त्वाचे आहे आणि मला ते साहित्याचे लोकशाहीकरण वाटते.चांगली समीक्षा ही लेखकालाही दिशा देऊ शकते. ती मूळात स्वत: सर्जनशील असते. आपल्या मराठी समीक्षाने अत्यंत ढोबळ अशा निकषांमध्ये स्वत:ला अडकवून घेतले आहे. याचा परिणाम वाचक दुरावण्यात झाला.अनुवाद ही दुय्यम गोष्ट नसून, तीही सर्जनशील असते. अनुवादाला उत्तम असा वाचक वर्गदेखील आहे. विविध भाषेतील पुस्तके अनुवादित होत असतात. अनुवादित पुस्तके ही मूळ पुस्तकांपेक्षा सरस असतात. कारण, अनुवादामुळे वेगवेगळ्या भाषांतील संस्कृतीचा परिचय आपल्याला होतो. मराठी भाषेतील पुस्तके दुसºया भाषेत अनुवादित व्हायला हवी, असे मला वाटते.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाPuneपुणे