शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

मराठवाड्याच्या व्यापक विकासाशिवाय महाराष्ट्राची प्रगती अशक्य : डॉ. श्रीपाल सबनीस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 19:59 IST

उसाची शेती आणि साखर कारखान्यांच्या जोरावर पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेल्या समृद्धीमागे मराठवाड्यातील ऊस तोडणी कामगारांचे कष्ट आहेत.

ठळक मुद्देअ‍ॅड. वर्षा देशपांडे लिखित ‘कोयत्याच्या मुठीत’ या ग्रंथाचे रसिकार्पण

पुणे : उसाची शेती आणि साखर कारखान्यांच्या जोरावर पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेल्या समृद्धीमागे मराठवाड्यातील ऊस तोडणी कामगारांचे कष्ट आहेत. या कामगारांच्या कुटुंबांना आणि विशेषत: त्यांच्या मुलींना ज्या परिस्थितीला सामोरे जावे लागते, ते अतिशय विदारक सत्य आहे. हे वास्तव लक्षात घेता  मराठवाड्याच्या व्यापक विकासाशिवाय महाराष्ट्राची प्रगती अशक्य आहे, असे मत ज्येष्ठ समीक्षक आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. कविता रसिक मंडळीच्या वतीने लेक लाडकी अभियान आयोजित समारंभात अ‍ॅड. वर्षा देशपांडे लिखित ‘कोयत्याच्या मुठीत’ या ग्रंथाचे रसिकार्पण डॉ. सबनीस यांच्या हस्ते झाले. यावेळी प्राचार्य भाऊसाहेब जाधव, कविता रसिक मंडळीचे प्रमुख भूषण कटककर, अ‍ॅड. वर्षा देशपांडे, डॉ. राजेंद्र माने, कैलास जाधव, सिंधू ठोंबरे, सीमा बडे आणि सुप्रिया जाधव उपस्थित होते. सबनीस म्हणाले, महाराष्ट्राला असलेल्या सामाजिक चळवळीच्या पार्श्वभूमीवर समकालीन प्रश्न मांडणारा हा एक महत्त्वपूर्ण दस्ताऐवज आहे. बालविवाह हे एक विदारक सत्य आहे. विकासाच्या प्रारूपाला या पुस्तकाच्या माध्यमातून प्रश्नांकीत केले आहे.शहरी व ग्रामीण समाजातील वैचारीक दरी इतकी भीषण आहे की, एक समाज होरपळत असताना दुसरा समाज उत्सवप्रेमी व आत्ममग्न झालेला आहे.भूषण कटककर म्हणाले, की मुलगी जन्माला आली तर आपल्या स्थलांतराच्या भिन्न जीवनशैलीमुळे त्या मुलीला सुरक्षित ठेवताच येणार नाही म्हणून मुलीला जन्माला घालायलाच नको असे गर्भपाताचे एक धक्कादायक व निराळेच कारण ह्या पुस्तकाद्वारे समोर आलेले आहे. त्यातूनही मुलीचा जन्म झाला तर तिला सुरक्षित ठेवता येत नसल्याने शक्य तितक्या लवकर तिचे लग्न लावून देण्याचाही प्रकार असाच अमानवी आहे. आपण माणूस म्हणून पुरेसे उत्क्रांतच झालेलो नाहीत असे म्हणायला वाव आहे. वर्षा देशपांडे म्हणाल्या, की ऊसदर वाढीसाठी आंदोलन होते, पण ऊसतोड कामगारांच्या वेतनासाठी, सुरक्षेसाठी त्यांच्या विम्यासाठी कोणीही पुढाकार घेताना दिसत नाही,  हे दुर्दैव आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ऊसतोड कामगार आणि त्यांच्या कुटुंबांचे प्रश्न पोहोचण्याच्या उद्देशाने हे पुस्तक लिहिले आहे. बालविवाह हा या क्षेत्रातील महत्वाचा प्रश्न आहे. यावेळी सोनाली बडे आणि सिंधू ठोंबरे या बालविवाहितांनी अनुभव कथन केले. त्याद्वारे ऊसतोडणी कामगारांच्या मुलींच्या नशिबी लहान वयातच येत असलेल्या भीषण संघर्षाचे दारूण चित्र आणि त्याविरुद्ध दिलेल्या प्रखर लढ्याची कथा ऐकायला मिळाली. सुप्रिया जाधव यांनी सूत्रसंचलन केले, तर वर्षा कुलकर्णी यांनी आभार मानले.  

टॅग्स :PuneपुणेShripal Sabnisश्रीपाल सबनीस