शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

वीज हवी असेल तर मारावे लागणार रिचार्ज- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 15:25 IST

उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती

बारामती: मोबाईल रिचार्ज प्रणालीप्रमाणे विजेसाठीसुद्धा प्रीपेड कार्ड पद्धत सुरू करण्याचा आम्ही विचार करत आहोत. जेवढ्या पैशांचा रिचार्ज केला जाईल, तेवढीच वीज संबंधितांना वापरता येईल. तुम्हाला चांगल्या प्रकारची सेवा हवी असेल तर आपल्याला नवीन टेक्नाॅलॉजी वापरावी लागेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. कोऱ्हाळे (ता. बारामती) येथील एका कार्यक्रमात रविवारी (दि. १७) ते बोलत होते.

पवार पुढे म्हणाले, जो वीज बिल नियमितपणे भरतो, त्याला फटका बसणार नाही. जे वीज बिल भरत नाहीत, त्यांचा भार वीज बिल भरणाऱ्यांवर बसतो. अलीकडे विजेची चणचण भासायला लागली आहे. देशात व राज्यात देखील कोळशाची कमतरता आहे. त्यासाठी आम्ही परदेशातून कोळसा आयात करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, आपल्या पॉवर प्लांटमध्ये १०० टक्के परदेशी कोळसा चालत नाही. उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे विजेची मागणी ३ ते ४ हजार मेगावॅटने वाढली आहे. बाहेरच्या राज्यांकडून देखील वीज खरेदीचा निर्णय झाला आहे. कोयना प्रकल्पातून विजेसाठी पाणी देण्याबाबत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मदत केली आहे. शेतकऱ्यांसाठी पाणी शिल्लक ठेवून उर्वरित पाण्याचे नियोजन वीजनिर्मितीसाठी केले आहे. भर दुपारी अनेक ठिकाणी वीज सुरू असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. आता जिल्हा परिषदेकडून मिळणारे हायमास्ट दिवे आम्ही बंद केले आहेत. मात्र, हे हायमास्ट दिवे वेळेत बंद होत नाहीत. त्याचा मोठा फटका राज्याला बसत आहे, असेही यावेळी पवार म्हणाले.

बारामतीमध्ये टायगर व लायन सफारी...

बारामती तालुक्यातील गाडीखेल परिसरामध्ये बिबट्या सफारीबाबत चर्चा सुरू होती. मात्र, ही चर्चा मागे पडल्यानंतर त्याच परिसरात टायगर व लायन सफारी करण्याचा मानस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथील कार्यक्रमांमध्ये व्यक्त केला. येथील जागा निश्चित झाली आहे, अशी माहिती पवार यांनी दिली. त्यामुळे बारामती येथे मयूरेश्वर अभयारण्य, चिंकारा पार्क, शिवसृष्टी याबरोबरच टायगर वन लायन सफारीमुळे येथील पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार आहे.

धर्म, जातीमध्ये तेड करणाऱ्याच्या नादाला लागू नका

सध्या राज्यात व देशामध्ये काही जणांकडून धर्मा-धर्मांमध्ये जातीजातींमध्ये तेड निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. कृपया कोणीही अशा मंडळींच्या नादाला लागू नका. जातीय तणाव निर्माण झाला तर त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याचा खरा फटका गरिबाला बसतो. दिवसभर काम केल्यावर ज्याच्या घरातील चूल पेटते, अशा लोकांच्यावर त्याचा परिणाम होतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांचा समाचार घेतला.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडelectricityवीज