शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

Pune: कार्यकर्त्याला हात लागला तर तुम्हाला सुरक्षितपणे फिरता येणार नाही, राजू शेट्टींचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 19:25 IST

मंचर उपजिल्हा रुग्णालयात प्रभाकर बांगर यांची घेतली भेट...

मंचर (पुणे) : स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांना मारहाण झाल्याने कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. आरोपी अद्यापही मोकाट फिरत आहेत. येथून पुढे स्वाभिमानीच्या कोणत्याही कार्यकर्त्याला धक्का लागला तर याद राखा, तुम्हाला सुरक्षितपणे फिरता येणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांना एकलहरे येथे मारहाण करण्यात आली. त्यांच्यावर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून राजू शेट्टी यांनी सकाळी येथे येऊन बांगर यांची भेट घेत विचारपूस केली. बांगर यांनी मारहाणीचा सर्व प्रकार कथन केला. त्यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी संघटनेचे कार्यकर्ते नेहमीच आंदोलन करतात. त्यांच्यावर हल्ला अथवा मारहाण होणे हा प्रकार आम्हाला नवीन नाही. मात्र बांगर यांच्या मारहाण प्रकरणातील आरोपीवर कसाबसा गुन्हा दाखल झाला आहे. हे आरोपी अद्याप मोकाट फिरत आहेत. पोलिस ठाण्यात महात्मा गांधी जयंतीला आरोपी हजर होते. मात्र तरीही पोलिसांच्या हाती ते लागत नाही. काही आरोपी हॉस्पिटल परिसरात फिरून दहशत निर्माण करू पाहत होते. आमच्या विरुद्ध आंदोलन कराल तर याद राखा, असा संदेश ते देऊ पाहत होते. याद्वारे कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेले आहेत. प्रभाकर बांगर यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन बाहेर आणतो. दम असेल तर पुन्हा हल्ला करा, जशास तसे उत्तर देऊ, असे ठणकावले. यावेळी प्रकाश बालवडकर, बापूसाहेब करंडे, अमरसिंह कदम, मारुती गोरडे, काशिनाथ दौंडकर तसेच उदय पाटील, सचिन बांगर, राजू बेंडे-पाटील, गणेश खानदेशे, वनाजी बांगर आदीसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सूत्रधारावर गुन्हा दाखल करावा

इथून पुढे स्वाभिमानीच्या कोणत्याही कार्यकर्त्याला धक्का लागला तर याद राखा तुम्हाला सुरक्षितपणे फिरता येणार नाही. बांगर यांच्या वडिलांना धक्का बसल्याने त्यांनी विष प्राशन केले आहे. त्यांचे काही बरे वाईट झाले तर वेगळा गुन्हा दाखल होईल. यातील आरोपींबरोबरच सूत्रधारांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ही राजू शेट्टी यांनी केली. यासंदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षकांना भेटणार असल्याचे सांगून सत्तेचा माज मस्ती आल्याने तसेच वर्षानुवर्ष तीच लोक पुन्हा पुन्हा निवडून दिल्याने हा माज आला आहे. सर्वसामान्य लोक याचा विचार करतील, असे राजू शेट्टी म्हणाले.

एफआरपी अधिक चारशे रुपये सोडणार नाही. मूळ मुद्दा भरकटवण्यासाठी दहशत माजवण्याचा उद्योग कोणी करत असेल तर रक्त सांडू, डोके फोडून घेऊ पण तुमच्या घशातून चारशे रुपये काढूच, हा कारखानदारांना इशारा आहे. या मागणीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलने सुरू असून मागणी मान्य न झाल्यास साखर कोंडी करून यावर्षीचा सिझन सुरू होऊ देणार नाही.

- राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीPuneपुणे