शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

Pune: कार्यकर्त्याला हात लागला तर तुम्हाला सुरक्षितपणे फिरता येणार नाही, राजू शेट्टींचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 19:25 IST

मंचर उपजिल्हा रुग्णालयात प्रभाकर बांगर यांची घेतली भेट...

मंचर (पुणे) : स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांना मारहाण झाल्याने कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. आरोपी अद्यापही मोकाट फिरत आहेत. येथून पुढे स्वाभिमानीच्या कोणत्याही कार्यकर्त्याला धक्का लागला तर याद राखा, तुम्हाला सुरक्षितपणे फिरता येणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांना एकलहरे येथे मारहाण करण्यात आली. त्यांच्यावर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून राजू शेट्टी यांनी सकाळी येथे येऊन बांगर यांची भेट घेत विचारपूस केली. बांगर यांनी मारहाणीचा सर्व प्रकार कथन केला. त्यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी संघटनेचे कार्यकर्ते नेहमीच आंदोलन करतात. त्यांच्यावर हल्ला अथवा मारहाण होणे हा प्रकार आम्हाला नवीन नाही. मात्र बांगर यांच्या मारहाण प्रकरणातील आरोपीवर कसाबसा गुन्हा दाखल झाला आहे. हे आरोपी अद्याप मोकाट फिरत आहेत. पोलिस ठाण्यात महात्मा गांधी जयंतीला आरोपी हजर होते. मात्र तरीही पोलिसांच्या हाती ते लागत नाही. काही आरोपी हॉस्पिटल परिसरात फिरून दहशत निर्माण करू पाहत होते. आमच्या विरुद्ध आंदोलन कराल तर याद राखा, असा संदेश ते देऊ पाहत होते. याद्वारे कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेले आहेत. प्रभाकर बांगर यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन बाहेर आणतो. दम असेल तर पुन्हा हल्ला करा, जशास तसे उत्तर देऊ, असे ठणकावले. यावेळी प्रकाश बालवडकर, बापूसाहेब करंडे, अमरसिंह कदम, मारुती गोरडे, काशिनाथ दौंडकर तसेच उदय पाटील, सचिन बांगर, राजू बेंडे-पाटील, गणेश खानदेशे, वनाजी बांगर आदीसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सूत्रधारावर गुन्हा दाखल करावा

इथून पुढे स्वाभिमानीच्या कोणत्याही कार्यकर्त्याला धक्का लागला तर याद राखा तुम्हाला सुरक्षितपणे फिरता येणार नाही. बांगर यांच्या वडिलांना धक्का बसल्याने त्यांनी विष प्राशन केले आहे. त्यांचे काही बरे वाईट झाले तर वेगळा गुन्हा दाखल होईल. यातील आरोपींबरोबरच सूत्रधारांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ही राजू शेट्टी यांनी केली. यासंदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षकांना भेटणार असल्याचे सांगून सत्तेचा माज मस्ती आल्याने तसेच वर्षानुवर्ष तीच लोक पुन्हा पुन्हा निवडून दिल्याने हा माज आला आहे. सर्वसामान्य लोक याचा विचार करतील, असे राजू शेट्टी म्हणाले.

एफआरपी अधिक चारशे रुपये सोडणार नाही. मूळ मुद्दा भरकटवण्यासाठी दहशत माजवण्याचा उद्योग कोणी करत असेल तर रक्त सांडू, डोके फोडून घेऊ पण तुमच्या घशातून चारशे रुपये काढूच, हा कारखानदारांना इशारा आहे. या मागणीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलने सुरू असून मागणी मान्य न झाल्यास साखर कोंडी करून यावर्षीचा सिझन सुरू होऊ देणार नाही.

- राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीPuneपुणे