शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

ऐक्य झाल्यास प्रकाश आंबेडकरांचे नेतृत्व स्वीकारणार- रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 01:59 IST

लोकसभेस रामटेक किंवा दक्षिण-मध्य मुंबई या मतदार संघातून निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचे आठवले यांनी सांगितले.

पुणे : भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील आरपीआय गटाच्या ऐक्यामध्ये काम करण्याची माझी तयारी आहे. मात्र, त्यासाठी ऐक्य झाले पाहिजे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरूवारी व्यक्त केले.लोकसभेस रामटेक किंवा दक्षिण-मध्य मुंबई या मतदार संघातून निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचे आठवले यांनी सांगितले. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आठवले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. ते म्हणाले, आंबेडकरी जनतेकडून आरपीआय गटाचे ऐक्य झाले पाहिजे, अशी भूमिका व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन निवडणूक लढवण्याची माझी तयारी आहे.आरपीआयचा २ मे रोजी मोर्चाअ‍ॅट्रोसिटी कायद्यात बदल करू नये. त्याचप्रमाणे अनेक कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत डावलले जाते. त्यामुळे केंद्राने पदोन्नती आरक्षणासाठी कायदा तयार करावा. तसेच कोरेगाव भीमा दंगल प्रकरणातील आरोपींवर कायदेशीर कारवाई करावी. संभाजी भिडे हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत, त्यामुळे ते दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई करावी आदी मागण्यांसाठी २ मे रोजी सर्व जिल्ह्यांत मोर्चा काढण्याचा ठराव या बैठकीत घेण्यात आला, असेही आठवले यांनी सांगितले.

 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर