शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

संस्था जगल्या तर खेळाडू घडतील - शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 1:11 AM

संस्था नेहमी दुर्लक्षित राहतात. आजच्या काळात संस्था जगवण्याची गरज आहे. त्यांना बळ दिले तरच खेळाडूंचे पीक निर्माण होईल, असे मत माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले

पुणे : संस्था नेहमी दुर्लक्षित राहतात. आजच्या काळात संस्था जगवण्याची गरज आहे. त्यांना बळ दिले तरच खेळाडूंचे पीक निर्माण होईल, असे मत माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.सिम्बायोसिस स्पोर्ट सेंटरच्या आदर्श क्रीडा संस्थेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ शं. बा. मुजुमदार, स्पोर्ट सेंटरचे संचालक डॉ. सतीश ठिगळे, उपाध्यक्ष डॉ ए. बी. संगमनेरकर, प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर आदी उपस्थित होते.पवार यांनी आपल्या भाषणात क्रीडा संस्थांशी निगडित अनेक अनुभव सांगितले. खेळ, खेळाडू, खेळाचे नियम, खेळाडूंचे नियम यापासून आम्ही दूर असतो. त्या क्षेत्रातील जाणकारांनी त्यासंबंधीचे निर्णय घ्यावेत. मात्र त्यांना समाजाचा आश्रय मिळवून देण्याची जबाबदारी आपण घ्यावी असा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना खो-खो सारखा खेळ शरीरसंपदा आणि बुद्धिमत्ता यांचा मेळ घालणारा आहे परंतु हा खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर तितकासा नावाजला गेला नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.या कार्यक्रमात क्रीडा क्षेत्रात अनेक वर्षांपासून कार्यरत असणाºया आणि अनेक राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडवणाºया संस्थांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यामध्ये साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर, सन्मित्र संघ क्रीडामहर्षी हरिभाऊ साने क्रीडा संकुल, महाराष्ट्रीय मंडळ, नवमहाराष्ट्र संघ, दाजीसाहेब नातू बॅडमिंटन प्रमोशन फाउंडेशन या संस्थांचा समावेश होता. याशिवाय क्रीडा क्षेत्रात आंतराराष्ट्रीय स्तरावर कामगिरी करणाºया मुरलीकांत पेटकर यांनाही सन्मानित करण्यात आले. डॉ मुजुमदार म्हणाले की, या संस्था स्थापन होऊन अनेक वर्षे उलटली आहेत, मात्र आजही संस्थापकांची नावे कोणाला माहिती नाहीत.या निमित्ताने त्यांची आठवण व्हावी हा या पुरस्कारामागचा भाग असल्याचे त्यांनी सांगितले. सामाजिक हित जपण्याकरता या संस्था स्थापन केल्या असून, त्यांच्या वारसदारांनीही हा वारसा जपल्याचा उल्लेखही त्यांनी केला.पेटकर यांनी सन्मानाला उत्तर देताना मी दिव्यांग असताना विश्वविक्रम करू शकतो तर विद्यार्थी का करू शकत नाहीत, अशा शब्दांत तरुण खेळाडूंचे मनोबल वाढवले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार