शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

संस्था जगल्या तर खेळाडू घडतील - शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 01:11 IST

संस्था नेहमी दुर्लक्षित राहतात. आजच्या काळात संस्था जगवण्याची गरज आहे. त्यांना बळ दिले तरच खेळाडूंचे पीक निर्माण होईल, असे मत माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले

पुणे : संस्था नेहमी दुर्लक्षित राहतात. आजच्या काळात संस्था जगवण्याची गरज आहे. त्यांना बळ दिले तरच खेळाडूंचे पीक निर्माण होईल, असे मत माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.सिम्बायोसिस स्पोर्ट सेंटरच्या आदर्श क्रीडा संस्थेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ शं. बा. मुजुमदार, स्पोर्ट सेंटरचे संचालक डॉ. सतीश ठिगळे, उपाध्यक्ष डॉ ए. बी. संगमनेरकर, प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर आदी उपस्थित होते.पवार यांनी आपल्या भाषणात क्रीडा संस्थांशी निगडित अनेक अनुभव सांगितले. खेळ, खेळाडू, खेळाचे नियम, खेळाडूंचे नियम यापासून आम्ही दूर असतो. त्या क्षेत्रातील जाणकारांनी त्यासंबंधीचे निर्णय घ्यावेत. मात्र त्यांना समाजाचा आश्रय मिळवून देण्याची जबाबदारी आपण घ्यावी असा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना खो-खो सारखा खेळ शरीरसंपदा आणि बुद्धिमत्ता यांचा मेळ घालणारा आहे परंतु हा खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर तितकासा नावाजला गेला नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.या कार्यक्रमात क्रीडा क्षेत्रात अनेक वर्षांपासून कार्यरत असणाºया आणि अनेक राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडवणाºया संस्थांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यामध्ये साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर, सन्मित्र संघ क्रीडामहर्षी हरिभाऊ साने क्रीडा संकुल, महाराष्ट्रीय मंडळ, नवमहाराष्ट्र संघ, दाजीसाहेब नातू बॅडमिंटन प्रमोशन फाउंडेशन या संस्थांचा समावेश होता. याशिवाय क्रीडा क्षेत्रात आंतराराष्ट्रीय स्तरावर कामगिरी करणाºया मुरलीकांत पेटकर यांनाही सन्मानित करण्यात आले. डॉ मुजुमदार म्हणाले की, या संस्था स्थापन होऊन अनेक वर्षे उलटली आहेत, मात्र आजही संस्थापकांची नावे कोणाला माहिती नाहीत.या निमित्ताने त्यांची आठवण व्हावी हा या पुरस्कारामागचा भाग असल्याचे त्यांनी सांगितले. सामाजिक हित जपण्याकरता या संस्था स्थापन केल्या असून, त्यांच्या वारसदारांनीही हा वारसा जपल्याचा उल्लेखही त्यांनी केला.पेटकर यांनी सन्मानाला उत्तर देताना मी दिव्यांग असताना विश्वविक्रम करू शकतो तर विद्यार्थी का करू शकत नाहीत, अशा शब्दांत तरुण खेळाडूंचे मनोबल वाढवले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार