शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

लोकशाहीतील राजे नीट वागत नसतील तर त्यांना अडवा आणि गाडा! उदयनराजे भोसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 14:56 IST

सरकारला विशेष अधिवेशन घेण्याचे आव्हान

लोकशाहीतील राजे नीट वागत नसतील तर त्यांना आडवा आणि गाडा असे थेट वक्तव्य छत्रपती उदयनराजे भोसलेंनी केले आहे. देशाची फाळणी करायची आहे का असा सवाल उपस्थित करतानाच राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

पुण्यात आज औंध मध्ये छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजेंची भेट झाली.त्यानंतर उदयनराजे भोसले पत्रकारांशी बोलत होते.

" व्यक्तिगत स्वार्थासाठी कधी दुफळी निर्माण होईल असे काही कृत्य केलं नाही. आंदोलन वगैरे काय होणार ? आरक्षण द्यायचं असतं तर ते मागेच दिलं असतं. राजकारणी व्यक्तीकेंद्रित झाले आहेत . उद्रेक झाला तर आम्ही काही करू शकणार नाही. भूतकाळाचा विचार करायला पाहिजे. हे का झालं? व्ही पी सिंग मंडळ आयोगाचा वेळी लोकांनी भोसकाभोसकी सुरू केली होती. इश्यू बेस्ड पॉलिटिक्स करा. निवडून यायचं असल्याने त्यांना त्या समाजाचा फायदा करून देतात.लोकशाहीतले राजे नीट वागत नसले तर त्यांना आडवा आणि गाडा ना! माझ्या पासून सुरुवात करा. मला प्रश्न विचारा" असे उदयनराजे भोसले म्हणाले.

दरम्यान संभाजीराजेंचा आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे ते म्हणाले. भाजपच्या भूमिकेबाबत विचारल्यावर तसेच पंतप्रधानांना भेटणार का असं विचारल्यावर उदयनराजे भोसले म्हणाले," कोण काय बोलतं?प्रत्येकाचे विचार एक सारखे असावे अशी अपेक्षा करणे चुकीचे.गायकवाड कमिशन चा अहवाल यांनी वाचलाच नाही.पक्ष यात आणू नका. हे सगळ्या पक्षांना लागू होतं.इथे प्रश्न समजाचा आहे. आरक्षण प्रश्न ही राज्याची जबाबदारी. सभागृहात एक बोलतात आणि बाहेर वेगळं. विशेष अधिवेशन होऊ द्या ना.मग बघू"

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा