शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

जल्लोष तर महत्त्वाचाच, नियमांचे व्हावे पालन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 00:20 IST

गणेशोत्सवामध्ये विद्युत अपघात टाळण्यासाठी असोसिएशनच्या वतीने मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येते. त्याला सार्वजनिक गणेश मंडळांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतो देखील

गणेशोत्सवामध्ये विद्युत अपघात टाळण्यासाठी असोसिएशनच्या वतीने मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येते. त्याला सार्वजनिक गणेश मंडळांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतो देखील. मात्र अद्याप सर्वच गणेशमंडळांकडून विद्युत रोषणाई करतानाची काळजी योग्य त्या पद्धतीने घेतली जात नाही. गणेशोत्सवात तात्पुरत्या काळासाठी विद्युतसंच मांडणी म्हणजेच जे काही नवीन विद्युत कनेक्शन घेतली जातात त्याविषयी गांभीर्य आणि सावधानता बाळगण्यात कार्यकर्ते अपयशी ठरतात. शेवटी याचा गंभीर परिणाम म्हणजे अपघाताला सामोरे जावे लागणे.

वीजसंच मांडणीचे काम परवानाधारक विद्युत कंत्राटदाराकडून करून घेणे हे केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या २0१0च्या नियमाच्या कलम २९ नुसार बंधनकारक केले असताना अनेकांकडून कायद्याचे पालन केले जात नाही. शहरात काही प्रमाणात नियमांचे पालन होताना दिसते. मात्र ग्रामीण भागात बऱ्याच वेळा मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून मनमानी सहन करावी लागते. यासगळ्यात काही जणांना पैसे देऊन विद्युत जोडणीची कामे करून घेऊन तात्पुरत्या पद्धतीने प्रश्न सोडविण्यावर भर दिला जातो. मुळातच तात्पुरत्या वीज जोडणीसाठी महावितरण विभागाकडून अधिकृत पद्धतीने वीज घेणे गरजेचे आहे. कायद्याने ते बंधनकारकदेखील आहे. एकूणच ते सर्वांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. परंतु आपल्याकडे नियमांना डावलून त्यांना धाब्यावर बसवून कामे करून घेण्यास प्राधान्यक्रम दिला जातो. परिणामी उत्सवादरम्यान सर्वांच्या जिवाला धोका निर्माण होतो.‘इकॅम’च्या वतीने केवळ पुण्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रभरातील सर्व गणेश मंडळांना सुरक्षेच्या कारणास्तव आवाहन करण्यात येते. या आवाहनाच्या माध्यमातून संबंधित मंडळाच्या कार्यकर्त्यांना आयएसआय मार्क विद्युत साहित्याचा वापर करण्यास प्राधान्यक्रम द्यावा. अशी सूचना देण्यात येते. अनेकदा उत्सवादरम्यान निकृष्ट दर्जाच्या वस्तू वापरल्याने नुकसान व अपघाताला सामोरे जावे लागल्याची अनेक उदाहरणे सांगता येतील. मेनस्वीच बरोबर ईएलसीबीचा (अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर) वापर करण्याच्या सूचना दिल्या जातात. फ्युजऐवजी एमसीबीचा (मिनिएचर सर्किट ब्रेकर) वापर करावा, मंडपाच्या पत्र्याजवळ, खांबाजवळ, वायरिंग उघड्या स्थितीत नसावी. याबरोबरच वायरिंग पीव्हीसी पाईपमधूनच करावे, आर्थिंग सुस्थितीत असल्याची खात्री करावी, ती नसल्यास नवीन आर्थिंग करून घ्यावी, स्वीचबोर्डच्या मागे प्लायवूड अथवा लाकडी फळी लावावी, जेणेकरून स्वीच टर्मिनल उघडी राहून कोणाला शॉक बसणार नाही. स्वीचबोर्ड अथवा वायरिंग लहान मुलांच्या हाताला लागणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. अनेकदा महत्त्वाच्या सूचनांकडेच दुर्लक्ष झाल्याने वेगवेगळ्या प्रकारच्या अपघाताला सामोरे जावे लागल्याची उदाहरणे आहेत. स्वीच बोर्ड लहान मुलांच्या हाताला लागणार नाही याची काळजी घ्यावी. ही सूचना केवळ घरातील विद्युत जोडणी करण्यापुरतीच मर्यादित नसून गणेशोत्सवादरम्यान कटाक्षाने पालन होणे गरजेचे आहे. पावसापासून वीज संचमांडणी सुरक्षित कशी राहील याकडे बहुतांशी दुर्लक्ष केले जाते.पावसाळी दिवसात येणाºया उत्सवादरम्यान अनुचित प्रकार टाळण्याकरिता योग्य ती खबरदारी घ्यायला हवी. विविध कनेक्शनकरिता वायरला जोड दिले जातात. तसे दिल्यास पीव्हीसी इन्सुलेशन टेपचा वापर करावा आणि मंडपासाठी खोदाई करताना तेथे पूर्वीची कोणती केबल आहे का, याबाबतची माहिती महावितरण विभागाकडून घ्यावी.

गणेशोत्सवाच्या तयारीची गडबड सुरू असल्याचे दृश्य सर्वत्र   पाहावयास मिळतेय. लाडक्या गणरायाच्या आगमनाकरिता मोठ्या भक्तिभावाने त्याच्या स्वागताची तयारी करण्यात मग्न झालेल्या कार्यकर्त्यांनी आपल्याबरोबरच सर्व भक्तांच्या सुरक्षेसाठी विद्युतविषयक नियमांचे पालन करण्याची गरज आहे. उत्सव नेहमीचा असून त्याकरिता आपल्या जिवाशी खेळणे उचित नाही. असे मत इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरर्स असोशिएशन आॅफ महाराष्ट्र पुणे विभागाचे अध्यक्ष सुनील गायकवाड यांनी व्यक्त केले. गणेशोत्सव तयारीनिमित्त त्यांच्याशी साधलेला संवाद. 

टॅग्स :Puneपुणे