शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
4
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
5
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
6
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
7
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
8
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
9
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
10
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
11
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
12
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
13
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
14
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
15
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
16
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
17
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
18
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
19
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
20
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !

शाश्वत विकासासाठी विचारगट महत्त्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:16 IST

पुणे : ‘कोणत्याही देशाचे, संस्थेचे धोरण ठरवताना सर्वांगाने विचार व्हावा लागतो. त्या दृष्टीने समर्पित वृत्तीने विचार करणाऱ्या तटस्थ, तज्ज्ञ ...

पुणे : ‘कोणत्याही देशाचे, संस्थेचे धोरण ठरवताना सर्वांगाने विचार व्हावा लागतो. त्या दृष्टीने समर्पित वृत्तीने विचार करणाऱ्या तटस्थ, तज्ज्ञ मंडळींचा विचारगट काम करत असतो. शाश्वत विकासासाठी असा विचारगट अतिशय महत्त्वाचा आहे. भारतामध्ये राष्ट्रीय ते स्थानिक पातळीपर्यंत असे विचारगट स्थापन होण्याची गरज आहे. शांतता, संघर्ष आणि दहशतवाद यामध्येही विचारगटाची भूमिका महत्त्वपूर्ण राहते’, असे मत ज्येष्ठ विचारवंत संदीप वासलेकर यांनी व्यक्त केले.

टेक्नॉलॉजी ट्रान्सफर असोसिएशनतर्फे (टीटीए) ‘थिंक टॅंक : का आणि कसे?’ या विषयावर आयोजित व्याख्यानात संदीप वासलेकर बोलत होते. वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा), डेक्कन शुगर टेकनॉलॉजिस्टस असोसिएशन (डीएसटीए) आणि शुगर फॅक्टरीज फेडेरेशन (एसएफएफ) यांच्या सहयोगाने हे व्याख्यान झाले. प्रसंगी राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड, ‘टीटीए’चे अध्यक्ष यशवंत घारपुरे, सचिव विलास रबडे, ‘डीएसटीए’चे अध्यक्ष श्रीपाद गंगावती, ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, अजित चौगुले उपस्थित होते.

वासलेकर म्हणाले, ‘सामाजिक, राजकीय, अर्थशास्त्र, लष्कर, तंत्रज्ञान, पर्यावरण, पायाभूत सुविधा, पाणी, संशोधन आणि संस्कृती आदी गोष्टींच्या विकासाचे धोरण कसे असावे, हे विचारगट ठरवतो. प्रभावी विचारगटासाठी चांगले आर्थिक पाठबळ, तज्ज्ञ व्यक्तींचे योगदान, दूरदृष्टीकोन असणे गरजेचे असते. अलीकडच्या काळात विचारगटाचे महत्त्व सर्वच स्तरांवर अधोरेखित होत असून, ते विस्तारत आहे. शासकीयसह खासगी आस्थापना आणि उद्योगांमध्येही विचारगट स्थापन होत आहेत. अनुभवी, नवकल्पना असलेले ज्येष्ठ, तरुण, महिला अशा सगळ्यांमुळे विचारगट अधिक सक्षम होत आहेत.’

शेखर गायकवाड म्हणाले, ‘नवकल्पना, ज्ञान सर्वांसाठी खुले होण्याची गरज आहे. विचारगटांचे स्वतंत्र अस्तित्व व त्यांची मान्यता दूरगामी असावी. सरकार बदलाचा परिणाम विचारगटावर किंवा त्यांनी तयार केलेल्या धोरणांवर होऊ नये. त्याचबरोबर विचारगट दबावगटही होता कामा नयेत. पक्षीय विरोधामुळे सध्या अनेक चांगल्या योजना कालबाह्य होताना आपण पाहतो. त्यामुळे तटस्थ, निःपक्ष विचारगट उभारण्यासाठी प्रयत्न व्हावेत.’

श्रीपाद गंगावती यांनीही आपले विचार मांडले. विलास रबडे यांनी सूत्रसंचालन केले. अजित चौगुले यांनी आभार मानले.