शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर अजित पवारांची माफी मागा; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला
2
Rishabh Pant Has Been Ruled Out : रिषभ पंतची न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेतून माघार; कारण...
3
'ठाकरे ब्रँड'चा फायदा उद्धव-राजना होणार? मराठी मतं 'गेम' फिरवणार? सर्व्हेची टक्केवारी समोर
4
WPL 2026 : हरमनप्रीतच्या MI चा विजयी कल्ला! DC ची कॅप्टन जेमिमावर आली स्मृतीसारखी वेळ
5
"उत्तर भारतीयांकडे वाकड्या नजरेने कुणी पाहिले तर..."; भाजपा मंत्री नितेश राणे काय बोलून गेले?
6
शिंदेसेनेला मतदान करा, जैन व्यापाऱ्याच्या मुलाची पोस्ट; भाजपा उमेदवाराच्या पत्नीने दिली धमकी
7
'गणेश नाईक यांची मनस्थिती बिघडली, त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जा', शिंदेसेनेची बोचरी टीका
8
बांगलादेशला लागणार जॅकपॉट! ५०० टक्के टॅरिफच्या टांगत्या तलवारीनं का वाढली भारताची डोकेदुखी?
9
राम मंदिराजवळ नमाज पढणारा अब्दुल अहद शेख कोण? बॅगेत सापडलं असं काही, कुटुंबीय म्हणाले...  
10
PCMC Election 2026: निवडणुका जवळ आल्या की, अनेकांचा कंठ फुटून काहीही बोलतात, दादा आपण रागवायचं नाही - देवेंद्र फडणवीस
11
सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबईहून पालघरला आले, पोहायला पाण्यात उतरले आणि एकावर मृत्युने घातली झडप
12
ठाकरे बंधूंच्या 'शिवगर्जनेची' तारीख ठरली! शिवाजी पार्कवर राज ठाकरे कोणता गौप्यस्फोट करणार?
13
शरद पवार अन् अजित पवार एकत्र येणार नाहीत?; प्रफुल पटेल यांच्या विधानानं नव्या चर्चांना उधाण
14
WPL 2026 : अनुष्का शर्माचा ‘पायगुण’! GG ची ‘साडेसाती’ संपली; UP वॉरियर्सकडून ‘ती’ एकटीच लढली
15
मोदी सरकारविरोधात लिखाण करणाऱ्या डॉ. संग्राम पाटील यांना मुंबईत येताच पोलिसांनी घेतलं ताब्यात
16
Holiday for Election: मतदानासाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर, कोणाला लागू असणार?
17
"आमचा जीव घेतला तरीही..."; सुप्रिया सुळे कडाडल्या; भाजपाला इशारा, मुंबईबाबत काय म्हणाल्या?
18
चौफेर टीका, भाजपाची नाचक्की, अखेरीस स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे याने दिला राजीनामा
19
Video - ओडिशामध्ये ९ सीटर चार्टर्ड प्लेन क्रॅश; पायलटसह ६ जण गंभीर जखमी
20
ICC U19 World Cup Warm up Matches : वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी! शतक अवघ्या ४ धावांनी हुकलं
Daily Top 2Weekly Top 5

शाश्वत विकासासाठी विचारगट महत्त्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:16 IST

पुणे : ‘कोणत्याही देशाचे, संस्थेचे धोरण ठरवताना सर्वांगाने विचार व्हावा लागतो. त्या दृष्टीने समर्पित वृत्तीने विचार करणाऱ्या तटस्थ, तज्ज्ञ ...

पुणे : ‘कोणत्याही देशाचे, संस्थेचे धोरण ठरवताना सर्वांगाने विचार व्हावा लागतो. त्या दृष्टीने समर्पित वृत्तीने विचार करणाऱ्या तटस्थ, तज्ज्ञ मंडळींचा विचारगट काम करत असतो. शाश्वत विकासासाठी असा विचारगट अतिशय महत्त्वाचा आहे. भारतामध्ये राष्ट्रीय ते स्थानिक पातळीपर्यंत असे विचारगट स्थापन होण्याची गरज आहे. शांतता, संघर्ष आणि दहशतवाद यामध्येही विचारगटाची भूमिका महत्त्वपूर्ण राहते’, असे मत ज्येष्ठ विचारवंत संदीप वासलेकर यांनी व्यक्त केले.

टेक्नॉलॉजी ट्रान्सफर असोसिएशनतर्फे (टीटीए) ‘थिंक टॅंक : का आणि कसे?’ या विषयावर आयोजित व्याख्यानात संदीप वासलेकर बोलत होते. वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा), डेक्कन शुगर टेकनॉलॉजिस्टस असोसिएशन (डीएसटीए) आणि शुगर फॅक्टरीज फेडेरेशन (एसएफएफ) यांच्या सहयोगाने हे व्याख्यान झाले. प्रसंगी राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड, ‘टीटीए’चे अध्यक्ष यशवंत घारपुरे, सचिव विलास रबडे, ‘डीएसटीए’चे अध्यक्ष श्रीपाद गंगावती, ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, अजित चौगुले उपस्थित होते.

वासलेकर म्हणाले, ‘सामाजिक, राजकीय, अर्थशास्त्र, लष्कर, तंत्रज्ञान, पर्यावरण, पायाभूत सुविधा, पाणी, संशोधन आणि संस्कृती आदी गोष्टींच्या विकासाचे धोरण कसे असावे, हे विचारगट ठरवतो. प्रभावी विचारगटासाठी चांगले आर्थिक पाठबळ, तज्ज्ञ व्यक्तींचे योगदान, दूरदृष्टीकोन असणे गरजेचे असते. अलीकडच्या काळात विचारगटाचे महत्त्व सर्वच स्तरांवर अधोरेखित होत असून, ते विस्तारत आहे. शासकीयसह खासगी आस्थापना आणि उद्योगांमध्येही विचारगट स्थापन होत आहेत. अनुभवी, नवकल्पना असलेले ज्येष्ठ, तरुण, महिला अशा सगळ्यांमुळे विचारगट अधिक सक्षम होत आहेत.’

शेखर गायकवाड म्हणाले, ‘नवकल्पना, ज्ञान सर्वांसाठी खुले होण्याची गरज आहे. विचारगटांचे स्वतंत्र अस्तित्व व त्यांची मान्यता दूरगामी असावी. सरकार बदलाचा परिणाम विचारगटावर किंवा त्यांनी तयार केलेल्या धोरणांवर होऊ नये. त्याचबरोबर विचारगट दबावगटही होता कामा नयेत. पक्षीय विरोधामुळे सध्या अनेक चांगल्या योजना कालबाह्य होताना आपण पाहतो. त्यामुळे तटस्थ, निःपक्ष विचारगट उभारण्यासाठी प्रयत्न व्हावेत.’

श्रीपाद गंगावती यांनीही आपले विचार मांडले. विलास रबडे यांनी सूत्रसंचालन केले. अजित चौगुले यांनी आभार मानले.