शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

"आजच्या काळात संतांचे विचारच मार्गदर्शक, तरुण पिढी त्याकडे कसं पाहते हे महत्त्वाचं!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 10:35 IST

रिंगण वक्तृत्व स्पर्धेप्रसंगी आयएएस अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचं वक्तव्य

आळंदीसध्याचं युग हे क्रोधाचं, द्वेषाचं आणि विचारधारांच्या अंताचं आहे. अशा काळात संतांचे विचार खऱ्या अर्थानं मार्गदर्शक आहेत. देशाचं भविष्य असणारी तरुण पिढी संत विचारांकडे कसं पाहते, याचा अभ्यास व्हायला हवा, असं मत आयएएस अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी व्यक्त केलं. संत विचारांवर आधारित रिंगण वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. 

पौर्णिमा तोटेवाड (औरंगाबाद), मुग्धा थोरात (पुणे), श्रुती बोरस्ते (नाशिक), सुजित काळंगे (सातारा), गणेश खुटवड (पुणे) यांना अनुक्रमे पहिल्या पाच पुरस्कारानी गौरवण्यात आलं. तर यश पाटील, आकाश सोनवणे आणि शुभांगी ढेमसे यांना उत्तेजनार्थ पुरस्कारानं गौरवण्यात आलं. ११ हजार, ९ हजार, ७ हजार, ५ हजार, ३ हजार आणि उत्तेजनार्थ २ हजार अशी रोख रकमेची पारितोषिके, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप होतं.

प्रख्यात पखवाजवादक दासोपंत स्वामी यांच्या वादनाने स्पर्धेचं उद्घाटन झालं. यावेळी एमआयटी युनिवर्सिटीचे संचालक महेश थोरवे आणि प्रा. पांडुरंग कंद उपस्थित होते. तर पुरस्कार वितरण सोहळ्यात कौस्तुभ दिवेगावकर यांच्यासह हभप पुरुषोत्तम पाटील आणि वार्षिक रिंगणचे संपादक सचिन परब होते. परीक्षक म्हणून अमृता मोरे आणि प्रा. डॉ. राजेंद्र थोरात उपस्थित होते.

रिंगण वक्तृत्व स्पर्धेचं हे दुसरं वर्ष. श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या सहकार्यानं ही स्पर्धा घेण्यात आली. यंदा महाराष्ट्रभरातून १५ ते २० वयोगटातील ५४ स्पर्धक सहभागी झाले होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :AlandiआळंदीPuneपुणे