शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

माझ्याच चित्रपटावर अन्याय का झालाय, हे कळत नाही; दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडेंची संतप्त भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 12:23 IST

जर एवढी वाईट वागणूक मराठी चित्रपटांना मिळाली तर आगामी काळात नवीन चित्रपट बनवावा की नाही? याबाबत विचार करावा लागेल

पुणे: माझ्याच चित्रपटावर अन्याय का झालाय, हे कळत नाही. पण नक्कीच काही तरी वेगळे कारण आहे. यापुढील काळात एखादा नवीन चित्रपट तयार केला तर तो चित्रपटगृहात प्रदर्शित करायचा का नाही? यावर विचार करावा लागेल, अशी संतप्त भावना ‘ख्वाडा’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी व्यक्त केली.

'ख्वाडा’ आणि ‘बबन’ चित्रपटांच्या अभूतपूर्व यशानंतर एक आगळावेगळा विषय 'टीडीएम' चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी मांडला आहे. मल्टिप्लेक्समध्ये या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र चित्रपटाला पुरेशा स्क्रीन उपलब्ध न झाल्याने त्यांनी व्यथित होऊन चित्रपटाचे शो थांबविण्याचा निर्णय घेतला. मराठी चित्रपटांवर होणाऱ्या या अन्यायाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. इतकी वाईट वागणूक जर मराठी चित्रपटांना मिळत असेल तर आगामी काळात नवीन चित्रपट बनवावा की नाही? याबाबत विचार करावा लागेल. ओटीटी प्लॅटफॉर्मवर एक वेबसीरिज आणि चित्रपट आणण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. ‘टीडीएम’ चित्रपटातील नायक अन् नायिकेची निवड कशी केली? त्यामागची कहाणीही त्यांनी सांगितली.

‘टीडीएम’ हे नाव पहिल्यांदा

२००२ मध्ये कीर्तनातून प्रबोधन करताना एका महाराजांनी ग्रामीण भागात तरुणांना शेतात काम करताना ट्रॅक्टरचे आकर्षण असायचे म्हणून टीडीएम म्हणजे, ट्रॅक्टर, ड्रायव्हर ऑफ महिंद्रा असे नाव दिले. तेच नाव घेऊन ग्रामीण भागाचे वास्तव चित्र मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला असल्याचे कऱ्हाडे म्हणाले. ग्रामीण भागाचे वास्तव चित्र मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केले आहे, तर ग्रामीण भागातील साधा पृथ्वीराज व साधी हीरोईन म्हणून कालिंदीला संधी दिली. नवोदित जोडगोळी अभिनेता पृथ्वीराज थोरात आणि अभिनेत्री कालिंदी निस्ताने यांची अस्सल प्रेमकथा, त्यांचे अस्सल गावरान ठसकेबाज संवाद आणि सोबतीला रांगड्या पृथ्वीचा ॲक्शन अवतार असं सगळं काही या चित्रपटात ग्रामीण भागातील जुन्या आठवणींना उजाळा दिला असल्याचे सांगितले. तसेच मुळात या चित्रपटातील ग्रामीण भागातील तरुणांच्या प्रेमकहाणीच्या प्रवासात तो कसा भारी याची हुबेहूब मांडणी केली आहे. ‘ख्वाडा’ आणि ‘बबन’ या चित्रपटांविषयी वेगवेगळ्या भूमिका कशा घेतल्या याबद्दल भाष्य करण्यात आले.

टॅग्स :Puneपुणेbhaurao karhadeभाऊराव क-हाडेcinemaसिनेमाcultureसांस्कृतिकGovernmentसरकार