शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
‘भाजपा ४०० जागा कदाचित चंद्रावर जिंकेल, भारतात मात्र…’ आदित्य ठाकरेंचा खोचक टोला 
3
....तोपर्यंत तपास यंत्रणा वकिलांना समन्स बजावू शकत नाहीत; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
4
आता उगाच उठून सोशल मीडियावर काहीही बोलता येणार नाही! 'या' देशाने इन्फ्लुएन्सर्सबाबतीत घेतला मोठा निर्णय
5
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
6
१ कोटी रुपयांचं घर घेण्यासाठी तुमची मिनिमम सॅलरी किती असली पाहिजे? पाहा काय म्हणताहेत एक्सपर्ट्स
7
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
8
Swami Samartha: घरातील देवांची मूर्ती, प्रतिमा यातील चैतन्य कसे ओळखावे? उपासना कशी वाढवावी? वाचा
9
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
10
घर घ्यायचंय? फ्लॅट घेताना स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचा खर्च किती येतो? कुठे होईल पैशांची बचत
11
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
12
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
13
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
14
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
15
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
16
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
17
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
18
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
19
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
20
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग

मावळ परिसरात राजरोसपणे होतेय शिकार; वन विभागाचे सोयीस्कर दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 14:28 IST

मावळ तालुक्यात नाणे, आंदर व पवन मावळातील दुर्गम भागात अजूनही बऱ्यापैकी जंगल शिल्लक असून ते वन विभागाच्या अखत्यारित येतात. मात्र, काही दिवसांपासून येथे मोठ्याप्रमाणावर प्राण्यांच्या शिकांंरी होत असून, काही स्थानिकांनी हा आपला जोडधंदा बनवला आहे

ठळक मुद्दे मावळ भागांमध्ये वन्य प्राण्यांच्या शिकारीचे वाढले प्रमाण गावातील ठराविक नागरिकांना बंदुकीचे परवाने, मात्र शिकारीसाठी सर्रास वापर

कामशेत : मावळ तालुक्यात नाणे, आंदर व पवन मावळातील दुर्गम भागात अजूनही बऱ्यापैकी जंगल शिल्लक असून ते वन विभागाच्या अखत्यारित येतात. मात्र, काही दिवसांपासून येथे मोठ्याप्रमाणावर प्राण्यांच्या शिकांंरी होत असून, काही स्थानिकांनी हा आपला जोडधंदा बनवला आहे. या भागांमध्ये वन्य प्राण्यांच्या शिकारीची मजा घेण्याचे प्रमाण काही वर्षांमध्ये वाढले आहे. यासह वृक्षतोड, बेकायदा उत्खननही वाढले आहे. यामुळे वन्यप्राण्यांचे जीवन तर धोक्यात आलेच; तसेच वनविभागातील जंगले नष्ट होऊ लागली आहेत. मावळ तालुका हा निसर्गसृष्टीने व नैसर्गिक संसाधन सामग्रीने बहरला असून, मावळातील निसर्गसृष्टी पाहण्यासाठी अनेक पर्यटक मावळात भेट देत आहेत. मावळातील अतिदुर्गम भागात मोठ्या प्रमाणात दाट वनराई, जंगले असल्याने येथे बऱ्याच प्रमाणात वन्यप्राण्यांचा वावर असतो. दरम्यान, गावातील काही ठराविक नागरिकांना बंदुकीचे परवाने दिले असून, या बंदुकीचा विधायक कामासाठी वापर न करता अनेकजण सर्रास शिकारीसाठी वापर करण्याचे प्रकार वाढले आहे. यातच अनेकांकडे बेकायदा बंदूकही आहेत असे अनेक निसर्गप्रेमी सांगतात. स्थानिकांनी शेतीबरोबर शिकार करणे, मुंबई-पुणे व आजूबाजूच्या प्रमुख शहरांतील प्रतिष्ठित नागरिकांना शिकारीचे सावज कोठे मिळेल, शिकार कशी करायची या बरोबरच एखाद्या प्राण्याची केलेली शिकार व त्याची मेजवानी आदी बंदोबस्त करणे यासारखा जोडधंदाच सुरु केला आहे. यामुळेच शहरी भागातील अनेक अधिकृत व अनधिकृत बंदूकधारी शिकारीसाठी मावळला पसंती देत आहेत. प्रामुख्याने या शिकारी सुटीच्या दिवशी होत असून, शहरी भागातील पाहुणे येणार म्हणून त्यांच्यासाठी खास बेत व पूर्वनियोजनही केले जात आहे.नाणे, अंदर, पवन मावळातील शेवटच्या टोकावर वसलेल्या भागांमध्ये मोठी वनराई जंगले, मोठी धरणे, तलाव, ओढे, गावतळी असून, डोंगर पठारावरील जंगलातील पाणी कमी झाल्यास वन्यप्राणी या पाण्याच्या ठिकाणी पाणवठ्यावर येतात. या प्राण्यांकडून कोणाच्याही जीविताला अद्यापपर्यंत धोका निर्माण झालेला नाही. तरीही अनेक जण येथे शिकार करतात. या शिकारींमध्ये प्रामुख्याने रानडुक्कर, सायाळ, ससे, मोर, लांडोर आदी प्राण्यांचा समावेश असतो. शहरात राहणाऱ्या मित्रमंडळींना  पार्ट्यांचे आमंत्रण पाठवून पारंगत आहेत. या सर्वांत ग्रामीण जनजीवन विस्कळीत झाले असून, ग्रामीण भागातील बहुतेकांनी हा रोजगार बनवला आहे. तर गावातील अनेक तरुण व्यसनाच्या अधीन होऊ लागले आहेत. मावळातील वाढलेल्या शिकारींमध्ये गावातील स्थानिकांबरोबर अनेक मोठ्या शहरातील प्रतिष्ठित नागरिकांचा समावेश आहे. मुंबई-पुण्याच्या, तसेच आजूबाजूच्या प्रमुख शहरातील नागरिकांचे सुटीच्या दिवशी मावळातील या दुर्गम भागात वावर वाढला असून, गावातील अनेक तरुण पैशांसाठी त्यांना साथ देऊन वन्यसृष्टीच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरत आहेत. याचप्रमाणे शहरातील नागरिकांच्या दारूच्या आमिषाला बळी पडत आहेत. या वाढत्या शिकारींमुळे दुर्गम गावांमधील तरुणवर्ग नशेच्या आहारी जाऊ लागला असून, फुकटात मिळणाऱ्या मद्यासाठी मुक्या प्राण्यांचे बळी घेऊ लागला आहे. अशा शिकारी बंदूकधाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी, त्याचप्रमाणे स्थानिकांच्या वृक्षतोड, बेकायदा उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. मावळातील निसर्गसृष्टी वाचवा, वन्यप्राणी वाचवा हा नारा अनेक प्राणिमित्र संघटना, पर्यावरणप्रेमी व नागरिक देत आहेत.

टॅग्स :mavalमावळforest departmentवनविभागpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड