शहरं
Join us  
Trending Stories
1
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
2
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
3
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
4
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
5
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
6
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
7
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
8
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
9
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
10
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
11
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
12
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
13
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
14
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
15
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
16
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
17
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
18
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
19
फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
20
स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला
Daily Top 2Weekly Top 5

दीडशे जणांवरच भार

By admin | Updated: December 29, 2014 01:11 IST

शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता अग्निशमन यंत्रणा सक्षम असणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस आगीच्या घटनाही वाढत आहेत

पिंपरी : शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता अग्निशमन यंत्रणा सक्षम असणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस आगीच्या घटनाही वाढत आहेत. अशातच ७५० कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. फक्त १५० कर्मचाऱ्यांवर अग्निशमन विभागाचे कामकाज सुरू आहे. आपत्कालीन समस्येतून मार्ग काढणारा महत्वाचा विभाग म्हणजे अग्निशमन दलाकडे पाहिले जाते. मात्र, याच विभागात १९८५ पासून जागा भरल्या नाहीत. कर्मचाऱ्यांअभावी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अग्निशमन दलाकडून ३५ कोटीचे उत्पन्न पालिकेला मिळत असतानाही प्रशासनाकडून या विभागाकडे दुर्लक्ष होत आहे. शहराचा विस्तार होत असताना अग्निशमन दलाचाही ताण वाढत चालला आहे. आळंदी, तळेगाव, जुन्नर या ठिकाणी अग्निशमनाच्या गाड्या उपलब्ध असतानाही पिंपरी-चिंचवड विभागातून गाड्या बोलवल्या जातात. यामुळे कामावरचा ताण वाढलेला दिसून येत आहे. शहरात एकूण भोसरी, रहाटणी, प्राधिकरण व पिंपरी अशी चार केंद्र आहेत. शहरातील शासकीय इमारती, दवाखाने, शाळा सर्व ठिकाणी अग्निशामक दलाने विहीत मानांकाप्रमाणे आग विझवण्याची यंत्रणा कार्यरत केलेली आहे. मात्र खासगी शाळा, दवाखाने अथवा इमारती या ठिकाणीही अग्निशमन यंत्रणा कार्यरत असणे गरजेचे आहे. ही जबाबदारी बिल्डर अथवा सोसायटीची आहे. अग्निशमन दलाच्या वतीने खासगी ठिकाणी प्रशिक्षण देण्याचे काम नाममात्र शुल्क दरात दिले जाते. अशा ठिकाणी परवानाधारक एजन्सीकडून ही अग्निशमण यंत्रणेची तपासणी केली जाते. मात्र, रहिवासी इमारतीना अग्निशामक यंत्रणा वापरताना दिसून येत नाही. जिवित व वित्त हानी वाचविणे, आपत्कालीन व्यवस्थापन व अग्निशामनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे ही अग्निशमन विभागाची कामे असतात. पायाभूत सोईसुविधा, तसेच अग्निशमन दलाकडे वाहनसंख्याही अपुरी आहे. अग्निशमन विभागाकडे सध्या आग विझवण्यासाठी १० वाहने आहेत, मात्र ही यंत्रणा अपुरी पडत आहे. अग्निशमन वाहनांची संख्या दुपटीने वाढविणे गरजेचे आहे. अग्निशामन अधिकारी, मुख्य अधिकारी ही पदे भरणे गरजेचेआहे. फायरमनची पदे सध्या ९५ आहेत. आणखी २५० जागांची आवश्यकता आहे. आगीच्या घटनाबरोबरच झाडे पडणे, इमारती कोसळणे, गॅस लिकेज, प्राणी संकटात सापडणे आदी घटनांतही अग्निशमनदलाला धाव घ्यावीलागत आहे. आपत्कालीन संकटाचा सामना करत असताना मात्र अग्निशमन दलाकडेच पालिके चे दुर्लक्ष झाले आहे. (प्रतिनिधी)