शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

शेकडो पोती कांदा फेकला जातो, तर शेकडो एकर पेरलाही जातोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 01:24 IST

कांद्याचा वांदा; कमी कालावधीत भरपूर केली होती लागवड

खोडद : यंदा दुष्काळाचा दाहकतेत टिकून राहणारे पीक म्हणून आणि कमी कालावधीत येणारे नगदी पीक म्हणून जुन्नर तालुक्यात कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. तर दुसरीकडे, मागील हंगामातील कांदाच अद्याप मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. मात्र, त्या कांद्याना साठवून ठेवल्याने मोड आल्यामुळे शेकडो पोती कांदा अक्षरश: फेकून द्यावा लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांची मेहनत, पैसा वाया गेला असून येणाºया कांद्याला तरी किमान भाव मिळेल की नाही, याची चिंता शेतकºयांना सतावत आहे.मागील वर्षभर कांद्याला चांगला बाजारभाव नसल्याने साठवणूक चाळींमध्ये कांदा मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. यंदा तरी कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल, या आशेने शेतकºयांनी कांद्याची विक्रीदेखील केली नव्हती. मात्र, सध्याच्या विषम हवामानातमुळे त्या साठविलेल्या कांद्याला मोड फुटत असल्याने अनेक शेतकºयांनी हा कांदा अक्षरश: फेकून दिला आहे. मोड आलेला कांदा ना व्यापारी घ्यायला तयार आहेत, ना चाळीत व्यापारी साठवून ठेवायला तयार आहेत. त्यामुळे शेतकºयांना पर्यायच राहिलेला नाही.मिागील वर्षी कांद्याला बाजारभाव मिळाला नसतानाही चालू कांद्याची लागवड केली आहे.भाजीपाला आणि फळपिकांवर सध्याच्या विषम हवामानामुळे विपरित परिणाम होत आहे. पिकांची वाढ खुंटली, तर मावा किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊ लागला आहे. विषम हवामान आणि तापमान यामुळे पिकांच्या मुळांची वाढ मंदावली आहे. सध्याच्या वातावरणामुळे शेतकºयांना बुरशीनाशकांची वारंवार फवारणी करावी लागत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.थंडीमुळे पात वाढते व गाठ कमी होतेचालू वर्षी कडाक्याच्या थंडीने महाराष्ट्र गाराठला असून, या थंडीचा तसेच विषम हवामानाचा परिणाम शेतपिकांवरही मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. सध्या रब्बी पिकांना ही थंडी पोषक ठरत असून, गहू, हरभरा, कांदा या पिकांची जोरदार वाढ होत आहे. विशेषत: कांदापिकाच्या बाबतीत शाखीय वाढ (कांदापात) जास्त होऊन कांदागाठीची वाढ कमी होत आहे. यामुळे दर्जात्मकदृष्ट्या हा कांदा कमी टिकाऊ असेल.नवीन लागवड केलेल्या भाजीपाला पिकांमध्ये रस शोषणाºया किडींच्या नियंत्रणासाठी आंतरप्रवाही कीटकनाशकांची फवारणी करावी. सकाळी शेताच्या बांधावर धूर करून तापमान वाढविण्याचा प्रयत्न करावा. फळबागांमध्ये या तंत्राचा चांगला लाभ होतो. सध्या मावा या प्रमुख किडीचा तसेच डावणी आणि भुरीसारख्या रोगांचा द्राक्षपिकावरही परिणाम होऊ शकतो. काढणीला आलेल्या बागांमध्ये मणी तडकणे, साखर उतारा कमी मिळणे अशा अडचणी उद्भवू शकतात. डाळिंबबागांवरही मावा व अन्य रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. त्याचेही नियंत्रण करणे गरजेचे आहे.- प्रा. राधाकृष्ण गायकवाडप्राचार्य, कृषी तंत्रनिकेतन, नारायणगाव 

टॅग्स :onionकांदाJunnarजुन्नरFarmerशेतकरी