शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

शेकडो पोती कांदा फेकला जातो, तर शेकडो एकर पेरलाही जातोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 01:24 IST

कांद्याचा वांदा; कमी कालावधीत भरपूर केली होती लागवड

खोडद : यंदा दुष्काळाचा दाहकतेत टिकून राहणारे पीक म्हणून आणि कमी कालावधीत येणारे नगदी पीक म्हणून जुन्नर तालुक्यात कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. तर दुसरीकडे, मागील हंगामातील कांदाच अद्याप मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. मात्र, त्या कांद्याना साठवून ठेवल्याने मोड आल्यामुळे शेकडो पोती कांदा अक्षरश: फेकून द्यावा लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांची मेहनत, पैसा वाया गेला असून येणाºया कांद्याला तरी किमान भाव मिळेल की नाही, याची चिंता शेतकºयांना सतावत आहे.मागील वर्षभर कांद्याला चांगला बाजारभाव नसल्याने साठवणूक चाळींमध्ये कांदा मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. यंदा तरी कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल, या आशेने शेतकºयांनी कांद्याची विक्रीदेखील केली नव्हती. मात्र, सध्याच्या विषम हवामानातमुळे त्या साठविलेल्या कांद्याला मोड फुटत असल्याने अनेक शेतकºयांनी हा कांदा अक्षरश: फेकून दिला आहे. मोड आलेला कांदा ना व्यापारी घ्यायला तयार आहेत, ना चाळीत व्यापारी साठवून ठेवायला तयार आहेत. त्यामुळे शेतकºयांना पर्यायच राहिलेला नाही.मिागील वर्षी कांद्याला बाजारभाव मिळाला नसतानाही चालू कांद्याची लागवड केली आहे.भाजीपाला आणि फळपिकांवर सध्याच्या विषम हवामानामुळे विपरित परिणाम होत आहे. पिकांची वाढ खुंटली, तर मावा किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊ लागला आहे. विषम हवामान आणि तापमान यामुळे पिकांच्या मुळांची वाढ मंदावली आहे. सध्याच्या वातावरणामुळे शेतकºयांना बुरशीनाशकांची वारंवार फवारणी करावी लागत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.थंडीमुळे पात वाढते व गाठ कमी होतेचालू वर्षी कडाक्याच्या थंडीने महाराष्ट्र गाराठला असून, या थंडीचा तसेच विषम हवामानाचा परिणाम शेतपिकांवरही मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. सध्या रब्बी पिकांना ही थंडी पोषक ठरत असून, गहू, हरभरा, कांदा या पिकांची जोरदार वाढ होत आहे. विशेषत: कांदापिकाच्या बाबतीत शाखीय वाढ (कांदापात) जास्त होऊन कांदागाठीची वाढ कमी होत आहे. यामुळे दर्जात्मकदृष्ट्या हा कांदा कमी टिकाऊ असेल.नवीन लागवड केलेल्या भाजीपाला पिकांमध्ये रस शोषणाºया किडींच्या नियंत्रणासाठी आंतरप्रवाही कीटकनाशकांची फवारणी करावी. सकाळी शेताच्या बांधावर धूर करून तापमान वाढविण्याचा प्रयत्न करावा. फळबागांमध्ये या तंत्राचा चांगला लाभ होतो. सध्या मावा या प्रमुख किडीचा तसेच डावणी आणि भुरीसारख्या रोगांचा द्राक्षपिकावरही परिणाम होऊ शकतो. काढणीला आलेल्या बागांमध्ये मणी तडकणे, साखर उतारा कमी मिळणे अशा अडचणी उद्भवू शकतात. डाळिंबबागांवरही मावा व अन्य रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. त्याचेही नियंत्रण करणे गरजेचे आहे.- प्रा. राधाकृष्ण गायकवाडप्राचार्य, कृषी तंत्रनिकेतन, नारायणगाव 

टॅग्स :onionकांदाJunnarजुन्नरFarmerशेतकरी