शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

मानवतावादाचे विचार देशाला तारू शकतील - लक्ष्मीकांत देशमुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 00:33 IST

मानवतावाद, विज्ञानवाद आणि विवेकवाद हेच विचार देशाला तारू शकतील. यासाठी साहित्यकलेचा प्रचार करून तरुण पिढीने वाचन संस्कृती जपावी, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.

सोमेश्वरनगर - मानवतावाद, विज्ञानवाद आणि विवेकवाद हेच विचार देशाला तारू शकतील. यासाठी साहित्यकलेचा प्रचार करून तरुण पिढीने वाचन संस्कृती जपावी, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.सोमेश्वरनगर येथील साहित्यप्रेमी मंडळाच्या वतीने बारामती येथे रविवारी (दि. २३) काव्यसागर या राज्यस्तरीय कवितासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप अध्यक्षस्थानी होते. या वेळी तहसीलदार हनुमंत पाटील, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, सोमेश्वरचे संचालक किशोर भोसले, विशाल गायकवाड, शैलेश रासकर, उद्योजक राजेंद्र जगताप, कृष्णाई पतसंस्थेचे अध्यक्ष सुनील भोसले, महसूल विभागाचे निवृत्त उपायुक्त शिवाजी राजेनिंबाळकर, डॉ. जया कदम, संभाजी गायकवाड यांच्यासह राज्याच्या विविध भागांतून आलेले साहित्यिक व कवी उपस्थित होते.देशमुख म्हणाले, ‘‘स्वातंत्र्य, समता, बंधुता, समाजवाद आणि सेक्युलरवाद ही सूत्रे समाजामध्ये अवलंबून आपल्याला वाटचाल करायची आहे. जात, धर्म विरहित माणूस घडविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी नवोदित कलावंतांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.’’सोमेश्वरचे अध्यक्ष जगताप यांच्यासह चित्रपट मंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, अभिनेत्री भाग्यश्री देसाई यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले. राज्याच्या विविध भागांतील साहित्यिक आणि कवींना या वेळी कृतज्ञता सन्मान, राज्यस्तरीय साहित्यरत्न आणि जीवनगौरव साधना पुरस्कार देऊन गौरविले. साहित्यप्रेमी मंडळाचे अध्यक्ष प्रा. हनुमंत माने यांनी प्रास्ताविक केले. प्रा. प्रकाश गायकवाड यांनी संयोजन केले.संस्कृती आणि साहित्य वाचणाराच देश मोठासत्य, शिव आणि सुंदर विचार केल्यानेच माणसाची वाटचाल पशुसंस्कृती ते देवसंस्कृती अशी झाली आहे. आदर्श असणाऱ्या ‘रामायण’ या महाकाव्यातून बोध घेण्याची गरज आहे. साहित्य, कला, संगीत, क्रीडा या क्षेत्रांत महाराष्ट्राचे योगदान महत्त्वाचे आहे. संस्कृती आणि साहित्य वाचणाराच देश मोठा असतो, असे देशमुख म्हणाले.

टॅग्स :Puneपुणे