शहरं
Join us  
Trending Stories
1
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
2
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
3
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
4
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
5
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
6
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
7
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
8
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
9
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
10
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
11
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
12
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
13
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
14
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
15
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
16
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
17
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा
18
७ सीटर Kia Carens CNG मध्ये झाली लॉन्च; जाणून घ्या फिचर्स अन् किंमत, Ertiga ला देणार टक्कर
19
Video: ७ महिन्याच्या गर्भवतीनं उचललं तब्बल १४५ किलो वजन; कसा अन् कुणी केला हा पराक्रम?
20
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?

मानवतावादाचे विचार देशाला तारू शकतील - लक्ष्मीकांत देशमुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 00:33 IST

मानवतावाद, विज्ञानवाद आणि विवेकवाद हेच विचार देशाला तारू शकतील. यासाठी साहित्यकलेचा प्रचार करून तरुण पिढीने वाचन संस्कृती जपावी, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.

सोमेश्वरनगर - मानवतावाद, विज्ञानवाद आणि विवेकवाद हेच विचार देशाला तारू शकतील. यासाठी साहित्यकलेचा प्रचार करून तरुण पिढीने वाचन संस्कृती जपावी, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.सोमेश्वरनगर येथील साहित्यप्रेमी मंडळाच्या वतीने बारामती येथे रविवारी (दि. २३) काव्यसागर या राज्यस्तरीय कवितासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप अध्यक्षस्थानी होते. या वेळी तहसीलदार हनुमंत पाटील, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, सोमेश्वरचे संचालक किशोर भोसले, विशाल गायकवाड, शैलेश रासकर, उद्योजक राजेंद्र जगताप, कृष्णाई पतसंस्थेचे अध्यक्ष सुनील भोसले, महसूल विभागाचे निवृत्त उपायुक्त शिवाजी राजेनिंबाळकर, डॉ. जया कदम, संभाजी गायकवाड यांच्यासह राज्याच्या विविध भागांतून आलेले साहित्यिक व कवी उपस्थित होते.देशमुख म्हणाले, ‘‘स्वातंत्र्य, समता, बंधुता, समाजवाद आणि सेक्युलरवाद ही सूत्रे समाजामध्ये अवलंबून आपल्याला वाटचाल करायची आहे. जात, धर्म विरहित माणूस घडविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी नवोदित कलावंतांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.’’सोमेश्वरचे अध्यक्ष जगताप यांच्यासह चित्रपट मंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, अभिनेत्री भाग्यश्री देसाई यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले. राज्याच्या विविध भागांतील साहित्यिक आणि कवींना या वेळी कृतज्ञता सन्मान, राज्यस्तरीय साहित्यरत्न आणि जीवनगौरव साधना पुरस्कार देऊन गौरविले. साहित्यप्रेमी मंडळाचे अध्यक्ष प्रा. हनुमंत माने यांनी प्रास्ताविक केले. प्रा. प्रकाश गायकवाड यांनी संयोजन केले.संस्कृती आणि साहित्य वाचणाराच देश मोठासत्य, शिव आणि सुंदर विचार केल्यानेच माणसाची वाटचाल पशुसंस्कृती ते देवसंस्कृती अशी झाली आहे. आदर्श असणाऱ्या ‘रामायण’ या महाकाव्यातून बोध घेण्याची गरज आहे. साहित्य, कला, संगीत, क्रीडा या क्षेत्रांत महाराष्ट्राचे योगदान महत्त्वाचे आहे. संस्कृती आणि साहित्य वाचणाराच देश मोठा असतो, असे देशमुख म्हणाले.

टॅग्स :Puneपुणे