शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

दारुपीडित महिलांच्या करुण कहाण्यांना फुटणार वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 20:53 IST

स्वामिनी दारूमुक्ती आंदोलन आणि साद माणुसकीची या सामाजिक चळवळींच्या पुढाकारातून या दारूपिडीत महिलांच्या मुलाखतीचा व सत्य घटनांवर आधारित नाटिकांचा कार्यक्रम आयोजिला आहे.

पुणे : "रोजची मारहाण, आरडाओरडा... घरात होणारी भांडणं... बायका-पोरांवर ढोरांसारखा अत्याचार... त्यातून होणाऱ्या आत्महत्या अन मृत्यू... तारुण्यातच कपाळाचं कुंकू पुसणं... चिमुकल्यांच्या डोक्यावरचं बापाचं अगर आईचं छत्र जाणं... अख्खा संसार आणि कुटुंब उद्ध्वस्त होणं... हे सगळं होत असताना निमूटपणे सहन करणं हेच स्त्रीच्या नशिबी..." पण आता नाही. त्याही जाग्या झाल्यात, उभारताहेत या दारुरूपी राक्षसाचा सामना करण्यासाठी. या लढ्यातल्या आणि दारूच्या पीडिता ठरलेल्या महिलांच्या कहाण्यांना वाचा फुटणार आहे.

स्वामिनी दारूमुक्ती आंदोलन आणि साद माणुसकीची या सामाजिक चळवळींच्या पुढाकारातून या दारूपिडीत महिलांच्या मुलाखतीचा व सत्य घटनांवर आधारित नाटिकांचा कार्यक्रम आयोजिला आहे. येत्या गुरुवारी (दि. १२ जुलै २०१८) सायंकाळी ६.०० वाजता घोले रस्त्यावरील नेहरू सांस्कृतिक केंद्रात हा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या घाटंजीतील दारूपिडीत कुटुंबातीलच महेश पवार या युवकाने उभारलेल्या या चळवळीबद्दल पत्रकार परिषदेत माहिती दिली. याप्रसंगी साद माणुसकीचे हरीश बुटले, संदीप बर्वे, ज्ञानेश्वर जाधवर, सचिन अशा सुभाष, अभिजित मंगल, गणेश सातव यांच्यासह इतर सहकारी उपस्थित होते.

महेश पवार म्हणाले, "फक्त यवतमाळ जिल्ह्यातच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात दारूमुळे भयावह परिस्थिती आहे. हे चित्र बदलण्यासाठी युवकांनी दारूबंदी साठी उभा केलेल हे अंदोलन आहे. हा प्रश्न फक्त त्या महिलेचा नाही, तर संपूर्ण कुटूंबाचा आहे. कुटूंब सावरायचे असेल, तर ज्या घरात दारूच व्यसन केलं जात ते बंद व्हाव म्हणुन युवकांनी पुढ येवून २८ मार्च २०१५ ला घाटंजी मध्ये दारूबंदीचा पहिला एल्गार केला आणि त्यातूनच 'स्वामिनी दारूबंदी आंदोलनाचा' जन्म झाला. त्यादिवसापासून सतत आंदोलन वाढत गेली, महिलांचा सहभाग वाढला, युवकांनी पुंढ येवून जोरात काम करायला सुरूवात झाली."

"स्वामिनी दारूबंदी आंदोलनाविषयी लोकांमध्ये विश्वासार्हता निर्माण झाली. बघता बघता ३५० गावांमध्ये स्वामिनीचे जाळे पसरले. त्यातून दोनशेहून अधिक गावातील दारूची दुकाने बंद करण्यात आंदोलनाला यश आलं. पण काही ठिकाणाहून न्यायालयीन लढाई सुरु झाली. केसेस अंगावर पडल्या, हल्ले झाले, धमक्या मिळाल्या, अटक झाली. पण आम्ही डगमगलो नाहीत. पुढे तिरडी आंदोलन, चटके आंदोलन, दारू चले जाव आंदोलन अशा वेगवेगळ्या आंदोलनामधून युवकांच नेतृत्व व संघटन अजूनच सक्षम होत गेलं. आणि लाखो महिला, युवक आणि पुरूष या लढाईचे शिलेदार बनले."

हरीश बुटले म्हणाले, “दारूच्या व्यसनामुळे आमचा संसार उधवस्त झालाय, सर्व जमिन-जुमला मालमत्ता तर बुडालीच पण आम्ही मनाने देखिल खचलो आहोत... यातुन आम्हांला वाचवा” असं सांगण्यासाठी आजवर खूप आंदोलन केली आहेत. यवतमाळ ते मुंबई ७०० कि.मी. अंतर शेतीतील कामे सोडून पावसाळी अधिवेशनात जाऊन दरवर्षी हजारो महिला सरकारला दारूबंदीची मागणी करतात. पण अजून बंदी होत नाही. ती व्हावी म्हणून महेश पवार सारखा तडफदार तरूण हजारो महिलांना या संकटातून वाचवण्यासाठी त्याच्या तरूण सहका-यांसोबत सक्षम नेतृत्व करतोय."

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्याliquor banदारूबंदी