शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
2
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
3
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
4
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
5
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
6
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
7
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
8
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
9
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
10
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
11
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
12
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
13
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
14
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
15
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
16
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
17
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
18
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
19
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
20
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान

काश्मीरप्रश्नी नेहरू जबाबदार कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 05:55 IST

यदुनाथ थत्ते स्मृती व्याख्यानमालेत सुरेश द्वादशीवार यांचा सवाल

पुणे : काश्मीर असो किंवा चीन हे प्रश्न राजकीय किंवा धार्मिक मुद्द्यांवर सोडवता येणे शक्य नाही. पंडित नेहरूंनी शरणागती न पत्करता काश्मीरचा प्रश्न युनोमध्ये नेला. तो एक धोरणाचा भाग होता. काश्मीरप्रश्नी नेहरूंना जबाबदार धरणे चुकीचे आहे, असे परखड मत ज्येष्ठ विचारवंत आणि ‘लोकमत’चे नागपूर आवृतीचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले.‘साधना’ साप्ताहिकाच्या वतीने यदुनाथ थत्ते स्मृती व्याख्यानमालेअंतर्गत ‘नेहरू : देशाचे पंतप्रधान’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाठ उपस्थित होते.द्वादशीवार म्हणाले, पंडित नेहरूंना पंतप्रधानपदाची कारकिर्द ही एकटेपणानेच सुरू करावी लागली. नेहरू समाजवादाची बीजे रोवू पाहत होते, मात्र त्यांना जयप्रकाश नारायण यांनी विरोध दर्शविला. भांडवलदारांच्या मदतीने नेहरू समाजवाद आणि फॅसिझम आणू पाहत आहेत, अशी टीका करणारे पत्र त्यांनी लिहिले. सरदार पटेल यांनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काँग्रेसमध्ये प्रवेश करावा, अशी भूमिका मांडली होती. ती पंडितजींना मान्य नव्हती. अशा प्रकारे नेहरूंना त्यांच्या प्रवासात स्वकीयांविरुद्धच अनेकदा संघर्ष करावा लागला. गांधीजींची हत्या ही घटना नेहरू आणि पटेल यांचे मनोमिलन घडविणारी ठरली. त्यांच्यात मतभेद होते पण कटुता नव्हती. गांधीजी आणि पटेल यांच्यानंतर नेहरूंनी देशाचे एकाकी नेतृत्व केले. नेहरू खऱ्या अर्थाने देशाचे भाग्यविधाते होते.काश्मीर आणि चीनप्रश्नी नेहरूंना जबाबदार धरले जाते, मात्र हा प्रश्न आजही सुटू शकलेला नाही, सरकार बदलले पण प्रश्न जैसे थेच राहिला आहे. एकवेळ पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राइक करू शकतो पण डोकलाममध्ये ते शक्य नाही. या गोष्टी समजून न घेता गांधी आणि नेहरूंना शिव्या दिल्या जातात तेव्हा लोकच दुबळे वाटतात. चीनच्या अध्यक्षांना गुजरातचा ढोकळा खायला दिला जातो पण याने मोदीप्रेम वाढेल, भारतप्रेम वाढेल का? अशा शब्दांत द्वादशीवार यांनी अप्रत्यक्षपणे सरकारला टोला लगावला.

टॅग्स :Jawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूJammu Kashmirजम्मू-काश्मीर