शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

काश्मीरप्रश्नी नेहरू जबाबदार कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 05:55 IST

यदुनाथ थत्ते स्मृती व्याख्यानमालेत सुरेश द्वादशीवार यांचा सवाल

पुणे : काश्मीर असो किंवा चीन हे प्रश्न राजकीय किंवा धार्मिक मुद्द्यांवर सोडवता येणे शक्य नाही. पंडित नेहरूंनी शरणागती न पत्करता काश्मीरचा प्रश्न युनोमध्ये नेला. तो एक धोरणाचा भाग होता. काश्मीरप्रश्नी नेहरूंना जबाबदार धरणे चुकीचे आहे, असे परखड मत ज्येष्ठ विचारवंत आणि ‘लोकमत’चे नागपूर आवृतीचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले.‘साधना’ साप्ताहिकाच्या वतीने यदुनाथ थत्ते स्मृती व्याख्यानमालेअंतर्गत ‘नेहरू : देशाचे पंतप्रधान’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाठ उपस्थित होते.द्वादशीवार म्हणाले, पंडित नेहरूंना पंतप्रधानपदाची कारकिर्द ही एकटेपणानेच सुरू करावी लागली. नेहरू समाजवादाची बीजे रोवू पाहत होते, मात्र त्यांना जयप्रकाश नारायण यांनी विरोध दर्शविला. भांडवलदारांच्या मदतीने नेहरू समाजवाद आणि फॅसिझम आणू पाहत आहेत, अशी टीका करणारे पत्र त्यांनी लिहिले. सरदार पटेल यांनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काँग्रेसमध्ये प्रवेश करावा, अशी भूमिका मांडली होती. ती पंडितजींना मान्य नव्हती. अशा प्रकारे नेहरूंना त्यांच्या प्रवासात स्वकीयांविरुद्धच अनेकदा संघर्ष करावा लागला. गांधीजींची हत्या ही घटना नेहरू आणि पटेल यांचे मनोमिलन घडविणारी ठरली. त्यांच्यात मतभेद होते पण कटुता नव्हती. गांधीजी आणि पटेल यांच्यानंतर नेहरूंनी देशाचे एकाकी नेतृत्व केले. नेहरू खऱ्या अर्थाने देशाचे भाग्यविधाते होते.काश्मीर आणि चीनप्रश्नी नेहरूंना जबाबदार धरले जाते, मात्र हा प्रश्न आजही सुटू शकलेला नाही, सरकार बदलले पण प्रश्न जैसे थेच राहिला आहे. एकवेळ पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राइक करू शकतो पण डोकलाममध्ये ते शक्य नाही. या गोष्टी समजून न घेता गांधी आणि नेहरूंना शिव्या दिल्या जातात तेव्हा लोकच दुबळे वाटतात. चीनच्या अध्यक्षांना गुजरातचा ढोकळा खायला दिला जातो पण याने मोदीप्रेम वाढेल, भारतप्रेम वाढेल का? अशा शब्दांत द्वादशीवार यांनी अप्रत्यक्षपणे सरकारला टोला लगावला.

टॅग्स :Jawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूJammu Kashmirजम्मू-काश्मीर