शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

काश्मीरप्रश्नी नेहरू जबाबदार कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 05:55 IST

यदुनाथ थत्ते स्मृती व्याख्यानमालेत सुरेश द्वादशीवार यांचा सवाल

पुणे : काश्मीर असो किंवा चीन हे प्रश्न राजकीय किंवा धार्मिक मुद्द्यांवर सोडवता येणे शक्य नाही. पंडित नेहरूंनी शरणागती न पत्करता काश्मीरचा प्रश्न युनोमध्ये नेला. तो एक धोरणाचा भाग होता. काश्मीरप्रश्नी नेहरूंना जबाबदार धरणे चुकीचे आहे, असे परखड मत ज्येष्ठ विचारवंत आणि ‘लोकमत’चे नागपूर आवृतीचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले.‘साधना’ साप्ताहिकाच्या वतीने यदुनाथ थत्ते स्मृती व्याख्यानमालेअंतर्गत ‘नेहरू : देशाचे पंतप्रधान’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाठ उपस्थित होते.द्वादशीवार म्हणाले, पंडित नेहरूंना पंतप्रधानपदाची कारकिर्द ही एकटेपणानेच सुरू करावी लागली. नेहरू समाजवादाची बीजे रोवू पाहत होते, मात्र त्यांना जयप्रकाश नारायण यांनी विरोध दर्शविला. भांडवलदारांच्या मदतीने नेहरू समाजवाद आणि फॅसिझम आणू पाहत आहेत, अशी टीका करणारे पत्र त्यांनी लिहिले. सरदार पटेल यांनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काँग्रेसमध्ये प्रवेश करावा, अशी भूमिका मांडली होती. ती पंडितजींना मान्य नव्हती. अशा प्रकारे नेहरूंना त्यांच्या प्रवासात स्वकीयांविरुद्धच अनेकदा संघर्ष करावा लागला. गांधीजींची हत्या ही घटना नेहरू आणि पटेल यांचे मनोमिलन घडविणारी ठरली. त्यांच्यात मतभेद होते पण कटुता नव्हती. गांधीजी आणि पटेल यांच्यानंतर नेहरूंनी देशाचे एकाकी नेतृत्व केले. नेहरू खऱ्या अर्थाने देशाचे भाग्यविधाते होते.काश्मीर आणि चीनप्रश्नी नेहरूंना जबाबदार धरले जाते, मात्र हा प्रश्न आजही सुटू शकलेला नाही, सरकार बदलले पण प्रश्न जैसे थेच राहिला आहे. एकवेळ पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राइक करू शकतो पण डोकलाममध्ये ते शक्य नाही. या गोष्टी समजून न घेता गांधी आणि नेहरूंना शिव्या दिल्या जातात तेव्हा लोकच दुबळे वाटतात. चीनच्या अध्यक्षांना गुजरातचा ढोकळा खायला दिला जातो पण याने मोदीप्रेम वाढेल, भारतप्रेम वाढेल का? अशा शब्दांत द्वादशीवार यांनी अप्रत्यक्षपणे सरकारला टोला लगावला.

टॅग्स :Jawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूJammu Kashmirजम्मू-काश्मीर