शहरं
Join us  
Trending Stories
1
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
2
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
3
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
4
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
5
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
6
भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
7
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
8
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप
9
"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
10
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
11
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती नपुंसक असल्याचे समजले, तिने मोठ्या जावेला सांगितले, मग दीर आला...
12
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
13
स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'
14
लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार
15
"माझ्यासाठीच नाही, तर १४० कोटी भारतीयांसाठीही..."; ब्राझीलचा सर्वोच्च सन्मान मिळाल्यावर काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
16
अरे देवा! ज्या सावत्र आईचा आशीर्वाद घ्यायचा, तिच्यासोबत पळाला अल्पवयीन मुलगा; केलं लग्न
17
Kangana Ranaut : "लोकांना तिला निवडून दिल्याबद्दल पश्चात्ताप होतोय"; कंगना राणौतवर काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल
18
पुणे : बाहेरून दिसायचा स्पा, आत चालायचा देह व्यापार; १८ मुलींची सुटका, परदेशी मुलींचाही समावेश
19
Video - संतापजनक! राजस्थानमध्ये उद्घाटनापूर्वीच वाहून गेला नवा रस्ता; पावसाने केली पोलखोल
20
अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या प्राथमिक चौकशी अहवालात काय?; कारण अद्यापही गुलदस्त्यात

‘ढ’ असूनही माझ्यापेक्षा जास्त मार्क कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:14 IST

दहावी-बारावीचा निकाल चुकीचा? : अपेक्षेपेक्षा कमी गुणांमुळे नाराजी लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक ...

दहावी-बारावीचा निकाल चुकीचा? : अपेक्षेपेक्षा कमी गुणांमुळे नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या दहावी-बारावीच्या निकालावर अनेक विद्यार्थी व पालकांनी आक्षेप घेतला आहे. शाळा-महाविद्यालयांनी राज्य मंडळाकडे पाठवलेल्या चुकीच्या माहितीमुळे विद्यार्थ्यांना क्षमतेपेक्षा कमी गुण मिळाले आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी असमाधानी असून त्यांनी निकालात दुरुस्ती करून देण्याची मागणी केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करून, मागील वर्षाच्या व अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला. परंतु, निकालासाठी वापरण्यात आलेल्या सूत्रामुळे काही विद्यार्थ्यांना कमी गुण, तर काहींना क्षमतेपेक्षा अधिक गुण मिळाल्याची भावना पालकांकडून व्यक्त केली जात आहे. एकाच वर्गात शिक्षण घेतलेल्या हुशार विद्यार्थ्याला कमी गुण आणि बौध्दिक दृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्याला जास्त गुण मिळाल्याचेही विद्यार्थी निदर्शनास आणून देत आहेत. तरीही निकालात दुरुस्ती करून दिला जात नसल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये संतापाची भावना आहे.

चौकट

परीक्षा नाही ; पुनर्मूल्यांकनही नाही

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या. त्यामुळे लेखी परीक्षा झालीच नाही. शाळा-महाविद्यालयांनी राज्य मंडळाकडे पाठवलेल्या गुणांच्या आधारे अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. मात्र, विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनाची संधी उपलब्ध नाही. त्यामुळे चुकीचे गुण मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.

चौकट

“माझ्यासह अनेक विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले आहेत. क्षमता असूनही कमी गुण मिळाल्याने आम्ही निकालाबाबत असमाधानी आहोत. आधीच ‘कोरोना बॅच’चा शिक्का आणि त्यात कमी गुण मिळाल्याने आमच्या पुढील शिक्षणावर परिणाम होणार आहे. महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या चुकीचा फटका आम्हा विद्यार्थ्यांना बसत आहे.”

-राधिका राका, विद्यार्थी

चौकट

“कनिष्ठ महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी चुकीची माहिती राज्य मंडळाच्या संगणकीय प्रणालीत भरल्याने विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले. कर्मचाऱ्यांच्या चुकीचा फटका विद्यार्थ्यांना बसला असून याची जबाबदारी महाविद्यालये स्वीकारत नाहीत. निकालात दुरुस्ती करण्यासही टाळाटाळ केली जात आहे.”

- कल्पना राका, पालक

चौकट

“अनेक विद्यार्थ्यांनी निकालाबाबत विभागीय मंडळाकडे तक्रार केली. अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यावर संबंधित विद्यार्थ्याला मिळालेले गुण आणि शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांनी संगणकीय प्रणालीत पाठवलेले गुण पडताळून पाहिले.”

- संगीता शिंदे, सह सचिव, पुणे विभागीय शिक्षण मंडळ, पुणे

चौकट

जिल्ह्यातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची आकडेवारी

इयत्ता नोंदणी केलेले विद्यार्थी उत्तीर्ण विद्यार्थी

दहावी १ लाख ३० हजार २५ ---१ लाख २९ हजार ९६२

बारावी १ लाख १९ हजार १३ ---१ लाख २८ हजार ६८०

------------------------