शहरं
Join us  
Trending Stories
1
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
2
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
3
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
4
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
5
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
6
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
7
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
9
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
10
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
11
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
12
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
13
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
14
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
15
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
16
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
17
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
18
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
19
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
Daily Top 2Weekly Top 5

‘ढ’ असूनही माझ्यापेक्षा जास्त मार्क कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:14 IST

दहावी-बारावीचा निकाल चुकीचा? : अपेक्षेपेक्षा कमी गुणांमुळे नाराजी लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक ...

दहावी-बारावीचा निकाल चुकीचा? : अपेक्षेपेक्षा कमी गुणांमुळे नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या दहावी-बारावीच्या निकालावर अनेक विद्यार्थी व पालकांनी आक्षेप घेतला आहे. शाळा-महाविद्यालयांनी राज्य मंडळाकडे पाठवलेल्या चुकीच्या माहितीमुळे विद्यार्थ्यांना क्षमतेपेक्षा कमी गुण मिळाले आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी असमाधानी असून त्यांनी निकालात दुरुस्ती करून देण्याची मागणी केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करून, मागील वर्षाच्या व अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला. परंतु, निकालासाठी वापरण्यात आलेल्या सूत्रामुळे काही विद्यार्थ्यांना कमी गुण, तर काहींना क्षमतेपेक्षा अधिक गुण मिळाल्याची भावना पालकांकडून व्यक्त केली जात आहे. एकाच वर्गात शिक्षण घेतलेल्या हुशार विद्यार्थ्याला कमी गुण आणि बौध्दिक दृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्याला जास्त गुण मिळाल्याचेही विद्यार्थी निदर्शनास आणून देत आहेत. तरीही निकालात दुरुस्ती करून दिला जात नसल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये संतापाची भावना आहे.

चौकट

परीक्षा नाही ; पुनर्मूल्यांकनही नाही

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या. त्यामुळे लेखी परीक्षा झालीच नाही. शाळा-महाविद्यालयांनी राज्य मंडळाकडे पाठवलेल्या गुणांच्या आधारे अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. मात्र, विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनाची संधी उपलब्ध नाही. त्यामुळे चुकीचे गुण मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.

चौकट

“माझ्यासह अनेक विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले आहेत. क्षमता असूनही कमी गुण मिळाल्याने आम्ही निकालाबाबत असमाधानी आहोत. आधीच ‘कोरोना बॅच’चा शिक्का आणि त्यात कमी गुण मिळाल्याने आमच्या पुढील शिक्षणावर परिणाम होणार आहे. महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या चुकीचा फटका आम्हा विद्यार्थ्यांना बसत आहे.”

-राधिका राका, विद्यार्थी

चौकट

“कनिष्ठ महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी चुकीची माहिती राज्य मंडळाच्या संगणकीय प्रणालीत भरल्याने विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले. कर्मचाऱ्यांच्या चुकीचा फटका विद्यार्थ्यांना बसला असून याची जबाबदारी महाविद्यालये स्वीकारत नाहीत. निकालात दुरुस्ती करण्यासही टाळाटाळ केली जात आहे.”

- कल्पना राका, पालक

चौकट

“अनेक विद्यार्थ्यांनी निकालाबाबत विभागीय मंडळाकडे तक्रार केली. अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यावर संबंधित विद्यार्थ्याला मिळालेले गुण आणि शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांनी संगणकीय प्रणालीत पाठवलेले गुण पडताळून पाहिले.”

- संगीता शिंदे, सह सचिव, पुणे विभागीय शिक्षण मंडळ, पुणे

चौकट

जिल्ह्यातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची आकडेवारी

इयत्ता नोंदणी केलेले विद्यार्थी उत्तीर्ण विद्यार्थी

दहावी १ लाख ३० हजार २५ ---१ लाख २९ हजार ९६२

बारावी १ लाख १९ हजार १३ ---१ लाख २८ हजार ६८०

------------------------