शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

लाल फितीत अडकल्या घरांच्या नोंदी, लोकांचा जलसमाधी घेण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 23:54 IST

पुनर्वसन होऊन अजूनही नागरिक दुर्लक्षित

घोडेगाव : डिंभे धरणाच्या बुडीत क्षेत्रात गेलेल्या आंबेगावातील शिल्लक क्षेत्र व घरांचा समावेश बोरघर ग्रामपंचायतीमध्ये व्हावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून या शिल्लक घरांमध्ये राहणाऱ्या कातकरी कुटुंबाची आहे. मात्र, अजूनही या कुटुंबांची नोंद बोरघर ग्रामपंचायत दप्तरी होत नसल्याने येथील ४१ कातकरी कुटुंबांनी दि. २ आॅक्टोबरला डिंभे धरणात जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

आंबेगाव (जुना) गावचे उर्वरित क्षेत्र व घरेही बोरघर ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट करावीत, यासाठी २ आॅक्टोबर २०१७ रोजी येथील कातकरी लोकांनी आंदोलन केले होते. यावेळी संबंधित अधिकाºयांनी सहा महिन्यांत घरकुलांची नोंद करून कातकरी बांधवांना नागरी सुविधा देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर दि. २७ नोव्हेंबर २०१७ रोजी विभागीय आयुक्त पुणे यांनी बोरघर ग्रामपंचायतीमध्ये ही कुटुंबे समाविष्ट करावीत, म्हणून शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. मात्र, अजूनही यावर कोणताच निर्णय झालेला नाही.

सध्या या क्षेत्रात ४१ कातकरी कुटुंबे राहत आहेत. यातील २२ कुटुंबांसाठी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून शाश्वत संस्थेने घरकुल बांधून दिली आहेत. उर्वरित १९ कुटुंबे अजूनही नदीच्या काठी राहून जीवन जगत आहेत. ज्या २२ कुटुंबांना घरकुल बांधून देण्यात आली आहेत, त्यांच्या घरांची नोंददेखील बोरघर ग्रामपंचायत दप्तरी झालेली नसल्याने त्यांना कोणत्याच योजनेचा लाभ मिळत नसल्याचे आदिवासी एकजूट संघटनेचे बुधाजी डामसे यांनी सांगितले.त्यामुळे या कातकरी कुटुंबास लाईट, पाणी व इतर कोणत्याच मूलभूत सुविधा मिळत नाहीत. एवढेच काय, तर जन्म-मृत्यूची नोंद करता येत नाही. डिंभे धरणाच्या पुनर्वसनापासून हा प्रश्न प्रलंबित असून शासनाच्या लाल फितीच्या कारभारात गोरगरीब कातकरी लोक अजूनही विकासापासून वंचित राहिले आहेत.

टॅग्स :Puneपुणे