शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

लाल फितीत अडकल्या घरांच्या नोंदी, लोकांचा जलसमाधी घेण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 23:54 IST

पुनर्वसन होऊन अजूनही नागरिक दुर्लक्षित

घोडेगाव : डिंभे धरणाच्या बुडीत क्षेत्रात गेलेल्या आंबेगावातील शिल्लक क्षेत्र व घरांचा समावेश बोरघर ग्रामपंचायतीमध्ये व्हावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून या शिल्लक घरांमध्ये राहणाऱ्या कातकरी कुटुंबाची आहे. मात्र, अजूनही या कुटुंबांची नोंद बोरघर ग्रामपंचायत दप्तरी होत नसल्याने येथील ४१ कातकरी कुटुंबांनी दि. २ आॅक्टोबरला डिंभे धरणात जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

आंबेगाव (जुना) गावचे उर्वरित क्षेत्र व घरेही बोरघर ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट करावीत, यासाठी २ आॅक्टोबर २०१७ रोजी येथील कातकरी लोकांनी आंदोलन केले होते. यावेळी संबंधित अधिकाºयांनी सहा महिन्यांत घरकुलांची नोंद करून कातकरी बांधवांना नागरी सुविधा देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर दि. २७ नोव्हेंबर २०१७ रोजी विभागीय आयुक्त पुणे यांनी बोरघर ग्रामपंचायतीमध्ये ही कुटुंबे समाविष्ट करावीत, म्हणून शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. मात्र, अजूनही यावर कोणताच निर्णय झालेला नाही.

सध्या या क्षेत्रात ४१ कातकरी कुटुंबे राहत आहेत. यातील २२ कुटुंबांसाठी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून शाश्वत संस्थेने घरकुल बांधून दिली आहेत. उर्वरित १९ कुटुंबे अजूनही नदीच्या काठी राहून जीवन जगत आहेत. ज्या २२ कुटुंबांना घरकुल बांधून देण्यात आली आहेत, त्यांच्या घरांची नोंददेखील बोरघर ग्रामपंचायत दप्तरी झालेली नसल्याने त्यांना कोणत्याच योजनेचा लाभ मिळत नसल्याचे आदिवासी एकजूट संघटनेचे बुधाजी डामसे यांनी सांगितले.त्यामुळे या कातकरी कुटुंबास लाईट, पाणी व इतर कोणत्याच मूलभूत सुविधा मिळत नाहीत. एवढेच काय, तर जन्म-मृत्यूची नोंद करता येत नाही. डिंभे धरणाच्या पुनर्वसनापासून हा प्रश्न प्रलंबित असून शासनाच्या लाल फितीच्या कारभारात गोरगरीब कातकरी लोक अजूनही विकासापासून वंचित राहिले आहेत.

टॅग्स :Puneपुणे