शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

लाल फितीत अडकल्या घरांच्या नोंदी, लोकांचा जलसमाधी घेण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 23:54 IST

पुनर्वसन होऊन अजूनही नागरिक दुर्लक्षित

घोडेगाव : डिंभे धरणाच्या बुडीत क्षेत्रात गेलेल्या आंबेगावातील शिल्लक क्षेत्र व घरांचा समावेश बोरघर ग्रामपंचायतीमध्ये व्हावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून या शिल्लक घरांमध्ये राहणाऱ्या कातकरी कुटुंबाची आहे. मात्र, अजूनही या कुटुंबांची नोंद बोरघर ग्रामपंचायत दप्तरी होत नसल्याने येथील ४१ कातकरी कुटुंबांनी दि. २ आॅक्टोबरला डिंभे धरणात जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

आंबेगाव (जुना) गावचे उर्वरित क्षेत्र व घरेही बोरघर ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट करावीत, यासाठी २ आॅक्टोबर २०१७ रोजी येथील कातकरी लोकांनी आंदोलन केले होते. यावेळी संबंधित अधिकाºयांनी सहा महिन्यांत घरकुलांची नोंद करून कातकरी बांधवांना नागरी सुविधा देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर दि. २७ नोव्हेंबर २०१७ रोजी विभागीय आयुक्त पुणे यांनी बोरघर ग्रामपंचायतीमध्ये ही कुटुंबे समाविष्ट करावीत, म्हणून शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. मात्र, अजूनही यावर कोणताच निर्णय झालेला नाही.

सध्या या क्षेत्रात ४१ कातकरी कुटुंबे राहत आहेत. यातील २२ कुटुंबांसाठी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून शाश्वत संस्थेने घरकुल बांधून दिली आहेत. उर्वरित १९ कुटुंबे अजूनही नदीच्या काठी राहून जीवन जगत आहेत. ज्या २२ कुटुंबांना घरकुल बांधून देण्यात आली आहेत, त्यांच्या घरांची नोंददेखील बोरघर ग्रामपंचायत दप्तरी झालेली नसल्याने त्यांना कोणत्याच योजनेचा लाभ मिळत नसल्याचे आदिवासी एकजूट संघटनेचे बुधाजी डामसे यांनी सांगितले.त्यामुळे या कातकरी कुटुंबास लाईट, पाणी व इतर कोणत्याच मूलभूत सुविधा मिळत नाहीत. एवढेच काय, तर जन्म-मृत्यूची नोंद करता येत नाही. डिंभे धरणाच्या पुनर्वसनापासून हा प्रश्न प्रलंबित असून शासनाच्या लाल फितीच्या कारभारात गोरगरीब कातकरी लोक अजूनही विकासापासून वंचित राहिले आहेत.

टॅग्स :Puneपुणे