शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

घरांबाबत अधिकारी उदासीन, आदिवासींची आर्त हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 02:55 IST

वषार्नुवर्षे स्वत:च्या हक्काच्या निवा-यापासून वंचित असलेल्या गरजू व आदिवासी बांधवांना हक्काची घरे मिळावीत, यासाठी पूर्वीच्या सरकारच्या इंदिरा आवास योजनेचे नाव बदलून मोदी सरकारने ‘पंतप्रधान आवास योजना’ असे नामकरण २३ मार्च २०१६ रोजी करून, या योजनेतअंतर्गत देशातील ग्रामीण भागातील गरीब जनतेला १ कोटी घरे बांधून देण्याचा भव्य संकल्प केला आहे.

पौड - वषार्नुवर्षे स्वत:च्या हक्काच्या निवाºयापासून वंचित असलेल्या गरजू व आदिवासी बांधवांना हक्काची घरे मिळावीत, यासाठी पूर्वीच्या सरकारच्या इंदिरा आवास योजनेचे नाव बदलून मोदी सरकारने ‘पंतप्रधान आवास योजना’ असे नामकरण २३ मार्च २०१६ रोजी करून, या योजनेतअंतर्गत देशातील ग्रामीण भागातील गरीब जनतेला १ कोटी घरे बांधून देण्याचा भव्य संकल्प केला आहे.या योजनेला अधिकची जोड म्हणून पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसाह्य योजनाही केंद्र सरकारने सुरू केली आहे. २०२२ पर्यंत देशातील प्रत्येकाला हक्काचा निवारा उपलब्ध करून देण्याचा स्वप्नवत संकल्पही या सरकारने सोडला आहे.परंतु, मुळशी तालुक्यात प्रशासनातील संबंधित खात्याच्या अधिकाºयांच्या उदासीनतेमुळे सदर योजना केवळ कागदावरच राहणार आहे. सरकारचे हे घरकुल योजनेचे स्वप्न केवळ स्वप्नच राहणार असल्याचे चित्र आहे.पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागाखरेदी अर्थसाह्य योजनेच्या अंमलबजावणीसाठी पंचायत समितीच्यागटविकास अधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली समिती स्थापणे अपेक्षित असताना योजना सुरू होऊन दोन वर्षे उलटली असली, तरी जानेवारी २०१८ पर्यंत ही समितीच अस्तित्वात नसल्याने अद्यापपर्यंत या योजनेचा एकाही लाभार्थ्याला लाभ मिळालेला नसल्याचे समोर आले आहे.हद्द म्हणजे, मुळशी तालुक्यात शेकडो कातकरी बांधवांना आजही स्वत:च्या हक्काचे घर तर सोडाच; पण हक्काची जागाही नावावर नसल्याचे भयानक वास्तव आहे.खरेदीखत करून झाले वर्षशासनाच्या योजनांच्या भरवशावर न राहता आंदेशे येथील १२ कातकरी बांधवांनी व्याजाने व उसने पैसे उभे करून आपले प्रतिनिधी बाळू सीताराम वाघमारे यांच्या नावे घराच्या बांधकामासाठी एक खासगी जमीन विकत घेतली. त्याचे खरेदीखत होऊन वर्ष संपले तरी महसूल विभागाच्या संबंधित अधिकाºयांच्या उदासीनतेमुळे व सदर खरेदीदार कातकरी शेतकरी नसल्याचे कारण पुढे करीत अद्याप त्या जागेची नोंदच करणे बाकी ठेवले आहे.सदर जागेची नोंदच होणार नव्हती, तर खरेदीखतच मंजूर का करण्यात आले? जमीन खरेदीसाठी जागामालकाला दिलेली मोठी रक्कम व खरेदीखताचे पैसे वाया जाणार का? अशी भीती व्यक्त होतआहे.गेले वर्षभर तलाठी, तहसीलदार, प्रांत अधिकारी, गटविकास अधिकारी व लोकप्रतिनिधी यांचे उंबरे झिजवून अद्याप हाती काहीच लागले नसल्याची खंत आंदेशे येथील आदिवासी बांधवांनी व्यक्त केली. आदिवासी बांधवांना एका खासगी कंपनीकडून सीएसआर निधीतून मोफत घरे बांधून दिली जाणार आहेत.

टॅग्स :Homeघर