शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

टाकाऊ वस्तूंपासून घराला गारवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 16:26 IST

एप्रिल, मे महिन्यामध्ये सूर्य माथ्यावर येऊ लागला की उष्णता असह्य होऊ लागते. वाढत्या उष्णतेमुळे घराचेही तापमान वाढते. उकाड्यापासून बचाव करण्यासाठी फॅन, एसी, कूलर असे खर्चिक पर्याय निवडण्याकडेच जास्त कल असतो.

ठळक मुद्देटाकाऊ वस्तूंपासून घरात गारवा निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न

पुणे : उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याने घरातही उकाडा असह्य होऊ लागला आहे. कूलर, एसी, फॅनचा वापर करण्याशिवाय पर्यायच उरलेला नाही. भारनियमनामुळे अचानक लाईट गेले तर काय करणार? शिवाय, विजेचे वाढते बिलही काळजाचा ठोका चुकवते. यावर पर्याय म्हणून एका पुणेकर अवलियाने घराचे तापमान कमी करण्यासाठी अनोखी क्लृप्ती शोधून काढली आहे.अचानक लाईट गेले तर काय करणार? शिवाय, विजेचे वाढते बिलही काळजाचा ठोका चुकवते. यावर पर्याय म्हणून एका पुणेकर अवलियाने घराचे तापमान कमी करण्यासाठी अनोखी क्लृप्ती शोधून काढली आहे.एप्रिल, मे महिन्यामध्ये सूर्य माथ्यावर येऊ लागला की उष्णता असह्य होऊ लागते. वाढत्या उष्णतेमुळे घराचेही तापमान वाढते. उकाड्यापासून बचाव करण्यासाठी फॅन, एसी, कूलर असे खर्चिक पर्याय निवडण्याकडेच जास्त कल असतो. यावर उपाय म्हणून कोथरुडमधील उमेश दारवटकर यांनी टाकाऊ वस्तूंपासून घरात गारवा निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.जुनी वापरलेली पोती, इतरांनी वापरुन फेकून दिलेले थर्माकोलचे शीठ आणि ठिबक सिंचनाचा वापर करुन दारवटकर यांनी घराचे वातावरण ४-५ अंश सेल्सियशने कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. बाहेरचे वातावरण अंशाअंशाने वाढत असताना, घरातील तापमान १९-२० अंश सेल्सियश कमी करण्यात यश आले आहे.दारवटकर यांनी मार्केट यार्डमधून कमी दराने मिळणारी पोती विकत घेतली. ही पोती त्यांनी एकमेकांना शिवून भिंतीवर आणि टेरेसवर लावली आहेत. थर्माकोलच्या शीटमधून रबरी नळीच्या सहाय्याने पाणी पोत्यांवर पडत राहते. त्यामुळे पोती आणि पर्यायाने भिंती कायम थंड राहतात. त्याचाच परिणाम म्हणून घरात कायम गारवा राखून ठेवण्यास मदत मिळते. याबाबत ‘लोकमत’शी बोलताना दारवटकर म्हणाले, ‘मी गेल्या तीन वर्षांपासून दर वर्षी उन्हाळयात अशा प्रकारचे प्रयोग करण्याचा प्रयत्न करतो. घराच्या आजूबाजूला खूप झाडे असल्याने त्यांची पाने पडून कचरा आणि पालापाचोळा होत असे. सुरुवातीला पालापाचोळा एकत्र करुन तो पोत्यात भरुनही पोती गच्चीवर पसरली होती. या पोत्यांवर पाणी मारल्याने टेरेसवर थंडावा पसरत होता. मात्र, पाणी मारल्यानंतर पालापाचोळा भिजून त्यास वास येत असे. त्यानंतर पोती आणि थर्माकोल यांचा पर्याय सुचला.’ मित्रमंडळी, नातेवाईकांनाही असे उपाय सातत्याने सुचवण्यासाठी ते पुढाकार घेतात.आपल्या दैनंदिन वापरातील अनेक गोष्टी, वस्तू आपण विनाकारण फेकून देतो. बारकाईने विचार केल्यास साध्या-सोप्या उपायांनी टाकाऊ वस्तूंचा कल्पकतेने वापर करता येतो. नव्या पिढीला टाकाउपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याचे महत्व समजल्यास भविष्यात फायदा होऊ शकेल, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Puneपुणेkothrudकोथरूड