शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

टाकाऊ वस्तूंपासून घराला गारवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 16:26 IST

एप्रिल, मे महिन्यामध्ये सूर्य माथ्यावर येऊ लागला की उष्णता असह्य होऊ लागते. वाढत्या उष्णतेमुळे घराचेही तापमान वाढते. उकाड्यापासून बचाव करण्यासाठी फॅन, एसी, कूलर असे खर्चिक पर्याय निवडण्याकडेच जास्त कल असतो.

ठळक मुद्देटाकाऊ वस्तूंपासून घरात गारवा निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न

पुणे : उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याने घरातही उकाडा असह्य होऊ लागला आहे. कूलर, एसी, फॅनचा वापर करण्याशिवाय पर्यायच उरलेला नाही. भारनियमनामुळे अचानक लाईट गेले तर काय करणार? शिवाय, विजेचे वाढते बिलही काळजाचा ठोका चुकवते. यावर पर्याय म्हणून एका पुणेकर अवलियाने घराचे तापमान कमी करण्यासाठी अनोखी क्लृप्ती शोधून काढली आहे.अचानक लाईट गेले तर काय करणार? शिवाय, विजेचे वाढते बिलही काळजाचा ठोका चुकवते. यावर पर्याय म्हणून एका पुणेकर अवलियाने घराचे तापमान कमी करण्यासाठी अनोखी क्लृप्ती शोधून काढली आहे.एप्रिल, मे महिन्यामध्ये सूर्य माथ्यावर येऊ लागला की उष्णता असह्य होऊ लागते. वाढत्या उष्णतेमुळे घराचेही तापमान वाढते. उकाड्यापासून बचाव करण्यासाठी फॅन, एसी, कूलर असे खर्चिक पर्याय निवडण्याकडेच जास्त कल असतो. यावर उपाय म्हणून कोथरुडमधील उमेश दारवटकर यांनी टाकाऊ वस्तूंपासून घरात गारवा निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.जुनी वापरलेली पोती, इतरांनी वापरुन फेकून दिलेले थर्माकोलचे शीठ आणि ठिबक सिंचनाचा वापर करुन दारवटकर यांनी घराचे वातावरण ४-५ अंश सेल्सियशने कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. बाहेरचे वातावरण अंशाअंशाने वाढत असताना, घरातील तापमान १९-२० अंश सेल्सियश कमी करण्यात यश आले आहे.दारवटकर यांनी मार्केट यार्डमधून कमी दराने मिळणारी पोती विकत घेतली. ही पोती त्यांनी एकमेकांना शिवून भिंतीवर आणि टेरेसवर लावली आहेत. थर्माकोलच्या शीटमधून रबरी नळीच्या सहाय्याने पाणी पोत्यांवर पडत राहते. त्यामुळे पोती आणि पर्यायाने भिंती कायम थंड राहतात. त्याचाच परिणाम म्हणून घरात कायम गारवा राखून ठेवण्यास मदत मिळते. याबाबत ‘लोकमत’शी बोलताना दारवटकर म्हणाले, ‘मी गेल्या तीन वर्षांपासून दर वर्षी उन्हाळयात अशा प्रकारचे प्रयोग करण्याचा प्रयत्न करतो. घराच्या आजूबाजूला खूप झाडे असल्याने त्यांची पाने पडून कचरा आणि पालापाचोळा होत असे. सुरुवातीला पालापाचोळा एकत्र करुन तो पोत्यात भरुनही पोती गच्चीवर पसरली होती. या पोत्यांवर पाणी मारल्याने टेरेसवर थंडावा पसरत होता. मात्र, पाणी मारल्यानंतर पालापाचोळा भिजून त्यास वास येत असे. त्यानंतर पोती आणि थर्माकोल यांचा पर्याय सुचला.’ मित्रमंडळी, नातेवाईकांनाही असे उपाय सातत्याने सुचवण्यासाठी ते पुढाकार घेतात.आपल्या दैनंदिन वापरातील अनेक गोष्टी, वस्तू आपण विनाकारण फेकून देतो. बारकाईने विचार केल्यास साध्या-सोप्या उपायांनी टाकाऊ वस्तूंचा कल्पकतेने वापर करता येतो. नव्या पिढीला टाकाउपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याचे महत्व समजल्यास भविष्यात फायदा होऊ शकेल, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Puneपुणेkothrudकोथरूड