शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

महाबळेश्वरला घोडेस्वारी नको रे बाबा; विष्ठेमुळे पसरतेय रोगराई! अभ्यासात परिस्थिती उघड

By श्रीकिशन काळे | Updated: January 5, 2024 19:09 IST

गोखले इन्स्टिट्यूटने तीन वर्षे केले सर्वेक्षण

श्रीकिशन काळे, लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: महाबळेश्वरमध्ये घोड्यांच्या विष्ठेमुळे रोगराई पसरत असल्याचे एका अभ्यासात समोर आले आहे. ही विष्ठा वेण्णा तलावाच्या पाण्यात मिसळत असून, त्यामुळे नागरिक आणि पर्यटक यांना अनेक आजार होत आहेत. तसेच लहान मुलांमध्ये रोटा व्हायरस देखील आढळून आला आहे. या मुलांचे लसीकरण झाल्यानंतरही त्यांच्यात हा व्हायरस असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे घोड्यांना इतरत्र हलवणे किंवा त्यांची विष्ठा एकत्र करणे आवश्यक आहे. घोड्यांच्या मागे विष्ठा पडण्यासाठी बॅग लावली तर जमिनीवर ते पडणार नाही, असे उपायही यावर सुचविण्यात आले आहेत.

‘गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थे’च्या ‘सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट’ (सीएसडी) या संस्थेच्या वतीने महाबळेश्वर येथे नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये ही बाब स्पष्ट झाली आहे. याची माहिती गोखले इन्स्टिट्यूटच्या डॉ. प्रा. प्रीती मस्तकार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या वेळी प्रा. गुरूदास नूलकर, निखिल अटक आदी उपस्थित होते. ‘सीएसडी’ या संस्थेच्या माध्यमातून ‘आरोग्य जोखीम मूल्यांकन संशोधन प्रकल्प’ हाती घेतला होता. तीन वर्ष या प्रकल्पावर काम झाले. त्या प्रकल्पामध्ये महाबळेश्वरची निवड केली होती. संस्थेच्या प्रा. डॉ. मस्तकार यांच्या नेतृत्वाखाली निखिल अटक, दिशा सावंत, रोहिणी सातपुते, सूरज भोळे आणि विनित दुपारे यांनी त्यावर काम केले. गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिकांना आणि पर्यटकांना देखील विविध आजारांचा त्रास होत आहे. यावर संशोधन केल्यानंतर समजले की, घोड्यांची विष्ठा पिण्याच्या पाण्यांच्या स्त्रोतामध्ये मिसळत आहे. त्यातून मग नागरिकांच्या पोटात जात आहे. परिणामी त्यांना विविध आजार होत आहेत.

दरम्यान, ‘गोखले इन्स्टिट्यूट’ने महाबळेश्वरसंदर्भातील अभ्यासाची माहिती सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी आणि महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी पाटील यांना दिली आहे. त्यावर ते कार्यवाही करू असे म्हणाले आहेत.

कसा झाला अभ्यास?

महाबळेश्वरला वेण्णा तलावातून पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे तिथल्या पाण्याचा नमुना घेतला होता. तसेच इतर जलशुध्दीकरण केंद्र, घरातून, भुजलातून नमुने घेण्यात आली. त्यामध्ये प्रदूषण आढळून आले. मग प्रदूषणाचा उगम शोधला आणि मग घोड्यांची विष्ठा पाण्यात जात असल्याचे समोर आले.

कोणते आजार होतात?

घोड्यांची विष्ठा तलावामध्ये जात असल्याने नागरिकांना अतिसार, श्वसनाचा संसर्ग, बुरशीजन्य संसर्ग, टायफॉइड आदी आजार होत आहेत. तसेच लहान मुलांमध्ये लसीकरणानंतरही रोटा व्हायरस दिसून आला. जो घोड्यांच्या विष्ठेमुळे होतो. गेल्या काही वर्षांमध्ये श्वसनाचे आजार, रोटा व्हायरस, पोटविकाराचे आजार वाढल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले.

तलाव प्रदूषित

वेण्णा तलावाशेजारीच घोड्यांची सफर होते. महाबळेश्वरमध्ये १७० घोडे आहेत. त्यांची विष्ठा जमिनीवर पडते. त्यामुळे घोडे चालताना ही विष्ठा उडते आणि ती श्वसनाद्वारे मानवी शरीरात जाते. हीच विष्ठा पावसाळ्यात पाण्यासोबत तलावामध्ये जाते आणि अनेक पाण्याच्या पाइपमध्येही जाते. त्यामुळे स्थानिक नागरिकांनाही त्याचा त्रास होत आहे, असे डॉ. मस्तकार यांनी सांगितले.

काय करता येईल?

  • - तलावापासून घोड्यांना दूर इतरत्र ठेवणे
  • - मोकळ्या जागेवर एकत्र ठेवून तिथे घोडेस्वारी करणे
  • - व्यापाऱ्यांनी पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत स्वच्छ ठेवणे
  • - घोड्यांची विष्ठा एकत्र करून त्यापासून बायोगॅस होऊ शकेल
  • - घोड्यांच्या मागे विष्ठेसाठी बॅग लावणे
टॅग्स :Puneपुणे