शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

कच्च्या कैैद्यांना सुटकेची आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 02:21 IST

सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार : खितपत पडलेल्या ५ जणांना मोकळी हवा

पुणे : न्यायालयाने जामीन मंजूर केलाय, निर्दोष मुक्तताही झालीय; पण न्यायालयीन कामकाजाची पूर्तता करण्यासाठी त्यांच्याकडे केवळ ७ हजार रुपये नाहीत. असे अनेक कच्चे कैदी कारागृहात खितपत पडले होते. नातेवाईक किंवा मित्रही मदतीसाठी पुढे येत नव्हते. या बंद्यांसाठी रॉयल ग्रूप आशेचा किरण बनून आला आहे. त्यांच्या मदतीने आतापर्यंत अशा ५ कैद्यांची सुटका झाली असून, आणखी १० जणांच्या सुटकेची प्रक्रिया सुरू आहे़एखाद्या गुन्ह्यात एकाला अटक केल्यानंतर पोलीस कोठडी पूर्ण झाल्यावर त्याची न्यायालयीन कोठडीत तुरुंगात रवानगी होते़ किरकोळ गुन्हे असतील, तर अशा कैद्यांना जामिनावर सोडावे, अशा उच्च न्यायालयाच्या सूचना आहेत़ कारागृहातील कच्च्या कैद्यांची संख्या वाढल्याने याबाबत न्यायालयानेही चिंता व्यक्त केली होती़ अशा कैद्यांची सुटका व्हावी, यासाठी आता स्वयंसेवी संस्था पुढे आली आहे़रॉयल ग्रुप आॅफ कंपनीचे प्रफुल्ल कोठारी यांनी सांगितले, की कारागृह विभागाचे प्रमुख भूषणकुमार उपाध्याय यांची एकदा भेट घेतली. त्यांनी, ज्यांचा जामीन झाला; परंतु न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण न झाल्याने अजूनही कारागृहात खिचपत पडले आहेत अशा कच्च्या कैद्यांना मदतीसाठी एखादी स्वयंसेवी संस्था शोधत असल्याचे सांगितले़ आमची संस्था याबाबत पुढाकार घेईल, असे सांगून हे काम हाती घेतले़ त्यांनी ज्यांचा जामीन झाला आहे, अशा ५० कच्च्या कैद्यांची यादीच दिली़ सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र जोशी यांच्या मदतीने पाठपुरावा सुरू केला़ न्यायालयीन बाजू पूर्ण करण्यासाठी चार वकिलांची नेमणूक केली़ त्यातूनच ४ फेब्रुवारीला या कामाला सुरुवात झाली़ राजेंद्र सुनसुने याला अवैध दारू बाळगल्याबद्दल २ फेब्रुवारी २०१६ रोजी कारागृहात ठेवण्यात आले होते़ तो २८ मार्च २०१८ पर्यंत कारागृहात होता. त्याच्या खटल्याचा निकाल लागला असता तर त्याला ३ ते ४ महिन्यांची शिक्षा झाली असती़ परंतु, त्याचे कोणीही नातेवाईक केवळ ७ हजार रुपये भरण्यासाठी पुढे न आल्याने तो जवळपास २ वर्षे कारागृहात होता़चोरीप्रकरणात फरासखाना पोलिसांनी अटक केलेल्या जितू शहदानपुरी याचीही नुकतीच कारागृहातून सुटका करण्यात आली़ अशाच प्रकारे दोन जणांना लोकअदालतीमध्ये सोडण्यात आले आहे़ तर, काही जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे़ परंतु, न्यायालयीन प्रक्रिया आणि त्याची रक्कम भरण्यासाठी पैसे नसल्याने ते कारागृहात अनेक महिने पडून होते़ अशा ५ जणांची आतापर्यंत सुटका करण्यात आली आहे़जितू शहदानपुरी म्हणाले, ‘‘रॉयल ग्रुपने मदत केली नसती, तर अजून बाहेर येऊ शकलो नसतो़ ते माझ्या दृष्टीने देवासारखे धावून आले़’’राज्यभरात २१ हजार ४४८ कच्चे कै दीराज्यभरामधील कारागृहातील २१ हजार ४४८ कच्चे कैदी आहेत़ त्यातील ३ हजार ४१२ जणांना ३ वर्षांपेक्षा कमी शिक्षा झालेले आहेत़ ३ हजार ९०० कैद्यांना ३ ते ७ वर्षे शिक्षा झाली आहे़ राज्यातील ४३३ कच्चे कैदी असे आहेत, की त्यांच्या जामिनाची रक्कम ते अथवा त्यांचे नातेवाईक भरू शकत नाहीत़ त्यांच्या सुटकेसाठी कारागृह प्रशासनाकडून आता प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत़

टॅग्स :Crimeगुन्हा