शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

मधमाशांनी चढवला पर्यटकांवर हल्ला; राजगड किल्ल्यावरील प्रकार, ४ गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 17:51 IST

वेल्हे तालुक्यातील राजगड किल्ल्यावर आलेल्या पर्यटकांवर हल्ला चढविला. मधमाशांनी चावे घेतल्याने ४ जण गंभीर जखमी झाले. हे सर्व पर्यटक मुंबईतील आहेत.

ठळक मुद्देमुंबई येथील ‘नेचर लव्हर्स’ संस्थेमार्फत राजगड किल्ल्यावर दरवर्षी साजरा केला जातो उत्सव पर्यटक शिस्तीचे पालन करत नाहीत त्यामुळे वारंवार घडत आहेत दुर्घटना

वेल्हे : हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या वेल्हे तालुक्यातील राजगड किल्ल्यावर आलेल्या पर्यटकांवर हल्ला चढविला. मधमाशांनी चावे घेतल्याने ४ जण गंभीर जखमी झाले. हे सर्व पर्यटक मुंबईतील आहेत.स्थानिक शेतकऱ्यांनी किल्ल्यावर धाव घेतली. जखमींना झोळीतून पायथ्याशी असलेल्या गुंजवणे गावात आणून पुढील उपचारासाठी करंजावणे प्राथमिक अरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकारी नांदेडकर जखमींवर उपचार करत आहेत.मुंबई येथील ‘नेचर लव्हर्स’ नावाच्या संस्थेमार्फत दरवर्षी २३ ते २६ डिसेंबर या कालावधीत राजगड किल्ल्यावर मोठा उत्सव साजरा केला जातो. यावर्षी ही उत्साहात कार्यक्रम साजरा होत आहे. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी संस्थेचे कार्यकर्ते राजगडाला प्रदक्षिणा घालण्याचा कार्यक्रम चालू असताना ७ नंबरच्या गटामधील स्वप्निल मोहन जाधव, (वय २८) शंकर मारुती शेलार (वय २७), पुरुषोत्तम लक्ष्मण कडलसकर (वय ५८, सर्व रा. मुंबई) यांच्यावर गडाच्या पश्चिमेकडील बाजूने प्रदक्षिणा घालताना मधमाशांनी हल्ला चढविला. मधमाशांनी चावा घेतल्याने तिघेही गंभीर जखमी झाले. तसेच विनायक पटवर्धन (वय ४५) हे इसम मधमाशांच्या हल्ल्याला घाबरुन गडाच्या कपारीतून धावत सुटले. कपारीतून ते घसरुन पडल्यामुळे जखमी झाले.

स्थानिक शेतकरी धावले मदतीलापर्यटकांचा आरडाओरडा ऐकून स्थानिक शेतकरी संतोष ढेबे, तानाजी हारपुडे, संजय रसाळ, अंकुश पडवळ, अंकुश भिलारे, विलास लिम्हण, हनुमंत दरडिगे, प्रकाश ढेबे, सुभाष शिळीमकर यांनी जखमींकडे धाव घेतली. जखमी पर्यटकांना झोळीत घालून गडाच्या पायथ्याशी आणले व वाहनातून करंजावणे अरोग्य केंद्रात पाठविले.राजगड हा किल्ला अतिदुर्गम असून किल्ल्याची व्याप्ती प्रचंड आहे. या ठिकाणी अनेक ठिकाणी धोकादायक ठिकाणे असून गडावर जाणारी पाऊलवाट अरुंद आहे. याठिकाणी येणारे पर्यटक शिस्तीचे पालन करत नाहीत आणि स्थानिक नागरिकांच्या सूचनांना न जुमानता दुर्लक्ष करत असल्याने वारंवार दुर्घटना घडत आहेत. वनविभागाकडे नावनोंदणी करणे बंधनकारक असतानाही पर्यटक नाव न नोंदवता गडावर जातात. यामुळे गडावर कोण गेले आहे आणि काय चाचले आहे याची नोंद राहत नाही. दुर्घटना घडल्यावर ऐनवेळी स्थानिकांची मात्र धावपळ होते.  

टॅग्स :PuneपुणेMumbaiमुंबई