शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

मधमाशांनी चढवला पर्यटकांवर हल्ला; राजगड किल्ल्यावरील प्रकार, ४ गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 17:51 IST

वेल्हे तालुक्यातील राजगड किल्ल्यावर आलेल्या पर्यटकांवर हल्ला चढविला. मधमाशांनी चावे घेतल्याने ४ जण गंभीर जखमी झाले. हे सर्व पर्यटक मुंबईतील आहेत.

ठळक मुद्देमुंबई येथील ‘नेचर लव्हर्स’ संस्थेमार्फत राजगड किल्ल्यावर दरवर्षी साजरा केला जातो उत्सव पर्यटक शिस्तीचे पालन करत नाहीत त्यामुळे वारंवार घडत आहेत दुर्घटना

वेल्हे : हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या वेल्हे तालुक्यातील राजगड किल्ल्यावर आलेल्या पर्यटकांवर हल्ला चढविला. मधमाशांनी चावे घेतल्याने ४ जण गंभीर जखमी झाले. हे सर्व पर्यटक मुंबईतील आहेत.स्थानिक शेतकऱ्यांनी किल्ल्यावर धाव घेतली. जखमींना झोळीतून पायथ्याशी असलेल्या गुंजवणे गावात आणून पुढील उपचारासाठी करंजावणे प्राथमिक अरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकारी नांदेडकर जखमींवर उपचार करत आहेत.मुंबई येथील ‘नेचर लव्हर्स’ नावाच्या संस्थेमार्फत दरवर्षी २३ ते २६ डिसेंबर या कालावधीत राजगड किल्ल्यावर मोठा उत्सव साजरा केला जातो. यावर्षी ही उत्साहात कार्यक्रम साजरा होत आहे. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी संस्थेचे कार्यकर्ते राजगडाला प्रदक्षिणा घालण्याचा कार्यक्रम चालू असताना ७ नंबरच्या गटामधील स्वप्निल मोहन जाधव, (वय २८) शंकर मारुती शेलार (वय २७), पुरुषोत्तम लक्ष्मण कडलसकर (वय ५८, सर्व रा. मुंबई) यांच्यावर गडाच्या पश्चिमेकडील बाजूने प्रदक्षिणा घालताना मधमाशांनी हल्ला चढविला. मधमाशांनी चावा घेतल्याने तिघेही गंभीर जखमी झाले. तसेच विनायक पटवर्धन (वय ४५) हे इसम मधमाशांच्या हल्ल्याला घाबरुन गडाच्या कपारीतून धावत सुटले. कपारीतून ते घसरुन पडल्यामुळे जखमी झाले.

स्थानिक शेतकरी धावले मदतीलापर्यटकांचा आरडाओरडा ऐकून स्थानिक शेतकरी संतोष ढेबे, तानाजी हारपुडे, संजय रसाळ, अंकुश पडवळ, अंकुश भिलारे, विलास लिम्हण, हनुमंत दरडिगे, प्रकाश ढेबे, सुभाष शिळीमकर यांनी जखमींकडे धाव घेतली. जखमी पर्यटकांना झोळीत घालून गडाच्या पायथ्याशी आणले व वाहनातून करंजावणे अरोग्य केंद्रात पाठविले.राजगड हा किल्ला अतिदुर्गम असून किल्ल्याची व्याप्ती प्रचंड आहे. या ठिकाणी अनेक ठिकाणी धोकादायक ठिकाणे असून गडावर जाणारी पाऊलवाट अरुंद आहे. याठिकाणी येणारे पर्यटक शिस्तीचे पालन करत नाहीत आणि स्थानिक नागरिकांच्या सूचनांना न जुमानता दुर्लक्ष करत असल्याने वारंवार दुर्घटना घडत आहेत. वनविभागाकडे नावनोंदणी करणे बंधनकारक असतानाही पर्यटक नाव न नोंदवता गडावर जातात. यामुळे गडावर कोण गेले आहे आणि काय चाचले आहे याची नोंद राहत नाही. दुर्घटना घडल्यावर ऐनवेळी स्थानिकांची मात्र धावपळ होते.  

टॅग्स :PuneपुणेMumbaiमुंबई