शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

प्रामाणिक शिक्षकच दुर्लक्षित : ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ नको रे बाबा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 01:49 IST

दरवर्षी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या ५ सप्टेंबर रोजी जयंतीनिमित्त ‘शिक्षक दिन’ साजरा करण्यात येतो.

बी़ एम़ काळे जेजुरी : दरवर्षी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या ५ सप्टेंबर रोजी जयंतीनिमित्त ‘शिक्षक दिन’ साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त शासनाच्या वतीने ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ दिले जातात. प्रत्येक तालुक्यात एक मुख्य पुरस्कार आणि दुसरा प्रोत्साहनपर पुरस्कार असे दोनच पुरस्कार दिले जातात. सध्या प्रत्येक तालुक्यातून या पुरस्कारासाठी शिक्षकांची व शाळा तपासणीची प्रक्रिया सुरू आहे. पुरंदर तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातून मात्र या पुरस्काराबाबत व पुरस्कारासाठी शिफारशी झालेल्या नावांबाबत प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. पुरस्कार शिक्षकांच्या गुणवत्तेचा, की केंद्रप्रमुखांच्या प्रतिष्ठेचा? प्रामाणिकपणे गुणवत्तेचे कार्य करणारे शिक्षकच दुर्लक्षित राहात असल्याने ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ नको रे बाबा! अशाच प्रतिक्रिया येत आहेत.‘आदर्श शिक्षकांची अर्थपूर्ण वर्णी’ अशा प्रकारे आदर्श शिक्षक पुरस्कार निवडीमध्ये घोडेबाजार होत असल्याचा आक्षेप घेत ही निवड व तपासणी अतिशय काटेकोरपणे व पारदर्शक व्हावी अशी अपेक्षा ‘लोकमत’ने (दि.२२) व्यक्त केली होती. मात्र तशा प्रकारे कोणतीही प्रक्रिया राबवण्यात आलेली नाही. पुरस्कारार्थींची नावे पाठवताना गटशिक्षणाधिकारी यांच्या मर्जीतील व अतिशय घनिष्ठ संबंध असणाºया केंद्रप्रमुखांनी सुचवलेली नावेच अंतिम झाली असल्याने शिक्षणक्षेत्रात आश्चर्य व्यक्त होत आहे.पुरंदरमधून पुणे जिल्हा परिषदेकडे पाच शिक्षकांची शिफारस करण्यात आली आहे. त्यापैकी एक शिक्षक तर पंचायत समितीत कार्यालयातील कामे, दहावी बारावीची आॅक्टोबर तसेच मार्च एप्रिलच्या परीक्षेचे नियोजन उत्कृष्ठरीत्या पार पाडण्याचे तंत्र अवगत असलेला शिक्षक म्हणूनच तालुक्यात प्रसिद्ध आहे. शाळेवर कमी पण कार्यालयीन कामाला जास्त वेळ असणाºया शिक्षकांच्या नावाची शिफारस केल्याची चर्चा आहे.वरिष्ठांशी घनिष्ठ संबंध असणारे एक पर्यटन व्यावसायिक केंद्रप्रमुख तर वर्षातून अनेक वेळा भारतभ्रमण पर्यटनावरच असतात. मात्र ते अनेक वर्षांपासून आपल्याच केंद्रातील शिक्षकाची शिफारस करण्यास वरिष्ठांना भाग पाडतात व पुरस्कारही मिळवून घेतात. या शिवाय दोन शिक्षकांची नावे गेल्या वर्षीही सुचवण्यात आली होती. पुरस्कारास पात्र न ठरल्याने या वर्षीही पुन्हा नावे पाठवण्यात आली आहेत. या वर्षी पाठवण्यात आलेल्या यादीतील एकाच शिक्षकाचे नाव योग्य असल्याचे शिक्षण क्षेत्रात चर्चा आहे.यावषी गुणवत्तेत व लोकसहभागातून शाळा आदर्श करणाºया व जिल्हा परिषद सदस्यांचे गावातीलच एका महिला शिक्षिकेचे नाव शिफारसीसाठी जाणीवपूर्वक डावलल्याने सदर शिक्षिकाही न्याय मागत आहे.तालुका प्रशासनाने आपल्यावर अन्याय केल्याचा आरोप या शिक्षिकेने ‘लोकमत’कडे केला आहे. पुरस्कारासाठी शिफारशी केलेल्या शिक्षकांच्या शाळांची तपासण्या सुरू झाल्या आहेत. यात मुळशी व मावळ या ठिकाणाहून अधिकारी येऊन एका दिवसामध्ये रामवाडी, चिल्हावळी व पानवडी या तीनही शाळांतील शिक्षकांची व गुणवत्तेची पाहणी घाई गडबडीत करतातच कशी? अशी चर्चा आहे. या शिक्षिकेला न्याय मिळावा यासाठी तालुका गटशिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला असता त्यांनी गेल्या वर्षी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी वेगळे होते, या वेळी दुसरे आहेत, त्यामुळे आपण या महिला शिक्षिकेच्या नावाबद्दल वरिष्ठांकडे शिफारस करतो. त्यांनी दखल घेतली तर तपासणी होईल असे सांगितले. या शिक्षिकेला न्याय मिळणार का? अशीच चर्चा शिक्षण क्षेत्रात आहे.

टॅग्स :Teacherशिक्षक