शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

प्रामाणिक शिक्षकच दुर्लक्षित : ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ नको रे बाबा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 01:49 IST

दरवर्षी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या ५ सप्टेंबर रोजी जयंतीनिमित्त ‘शिक्षक दिन’ साजरा करण्यात येतो.

बी़ एम़ काळे जेजुरी : दरवर्षी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या ५ सप्टेंबर रोजी जयंतीनिमित्त ‘शिक्षक दिन’ साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त शासनाच्या वतीने ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ दिले जातात. प्रत्येक तालुक्यात एक मुख्य पुरस्कार आणि दुसरा प्रोत्साहनपर पुरस्कार असे दोनच पुरस्कार दिले जातात. सध्या प्रत्येक तालुक्यातून या पुरस्कारासाठी शिक्षकांची व शाळा तपासणीची प्रक्रिया सुरू आहे. पुरंदर तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातून मात्र या पुरस्काराबाबत व पुरस्कारासाठी शिफारशी झालेल्या नावांबाबत प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. पुरस्कार शिक्षकांच्या गुणवत्तेचा, की केंद्रप्रमुखांच्या प्रतिष्ठेचा? प्रामाणिकपणे गुणवत्तेचे कार्य करणारे शिक्षकच दुर्लक्षित राहात असल्याने ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ नको रे बाबा! अशाच प्रतिक्रिया येत आहेत.‘आदर्श शिक्षकांची अर्थपूर्ण वर्णी’ अशा प्रकारे आदर्श शिक्षक पुरस्कार निवडीमध्ये घोडेबाजार होत असल्याचा आक्षेप घेत ही निवड व तपासणी अतिशय काटेकोरपणे व पारदर्शक व्हावी अशी अपेक्षा ‘लोकमत’ने (दि.२२) व्यक्त केली होती. मात्र तशा प्रकारे कोणतीही प्रक्रिया राबवण्यात आलेली नाही. पुरस्कारार्थींची नावे पाठवताना गटशिक्षणाधिकारी यांच्या मर्जीतील व अतिशय घनिष्ठ संबंध असणाºया केंद्रप्रमुखांनी सुचवलेली नावेच अंतिम झाली असल्याने शिक्षणक्षेत्रात आश्चर्य व्यक्त होत आहे.पुरंदरमधून पुणे जिल्हा परिषदेकडे पाच शिक्षकांची शिफारस करण्यात आली आहे. त्यापैकी एक शिक्षक तर पंचायत समितीत कार्यालयातील कामे, दहावी बारावीची आॅक्टोबर तसेच मार्च एप्रिलच्या परीक्षेचे नियोजन उत्कृष्ठरीत्या पार पाडण्याचे तंत्र अवगत असलेला शिक्षक म्हणूनच तालुक्यात प्रसिद्ध आहे. शाळेवर कमी पण कार्यालयीन कामाला जास्त वेळ असणाºया शिक्षकांच्या नावाची शिफारस केल्याची चर्चा आहे.वरिष्ठांशी घनिष्ठ संबंध असणारे एक पर्यटन व्यावसायिक केंद्रप्रमुख तर वर्षातून अनेक वेळा भारतभ्रमण पर्यटनावरच असतात. मात्र ते अनेक वर्षांपासून आपल्याच केंद्रातील शिक्षकाची शिफारस करण्यास वरिष्ठांना भाग पाडतात व पुरस्कारही मिळवून घेतात. या शिवाय दोन शिक्षकांची नावे गेल्या वर्षीही सुचवण्यात आली होती. पुरस्कारास पात्र न ठरल्याने या वर्षीही पुन्हा नावे पाठवण्यात आली आहेत. या वर्षी पाठवण्यात आलेल्या यादीतील एकाच शिक्षकाचे नाव योग्य असल्याचे शिक्षण क्षेत्रात चर्चा आहे.यावषी गुणवत्तेत व लोकसहभागातून शाळा आदर्श करणाºया व जिल्हा परिषद सदस्यांचे गावातीलच एका महिला शिक्षिकेचे नाव शिफारसीसाठी जाणीवपूर्वक डावलल्याने सदर शिक्षिकाही न्याय मागत आहे.तालुका प्रशासनाने आपल्यावर अन्याय केल्याचा आरोप या शिक्षिकेने ‘लोकमत’कडे केला आहे. पुरस्कारासाठी शिफारशी केलेल्या शिक्षकांच्या शाळांची तपासण्या सुरू झाल्या आहेत. यात मुळशी व मावळ या ठिकाणाहून अधिकारी येऊन एका दिवसामध्ये रामवाडी, चिल्हावळी व पानवडी या तीनही शाळांतील शिक्षकांची व गुणवत्तेची पाहणी घाई गडबडीत करतातच कशी? अशी चर्चा आहे. या शिक्षिकेला न्याय मिळावा यासाठी तालुका गटशिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला असता त्यांनी गेल्या वर्षी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी वेगळे होते, या वेळी दुसरे आहेत, त्यामुळे आपण या महिला शिक्षिकेच्या नावाबद्दल वरिष्ठांकडे शिफारस करतो. त्यांनी दखल घेतली तर तपासणी होईल असे सांगितले. या शिक्षिकेला न्याय मिळणार का? अशीच चर्चा शिक्षण क्षेत्रात आहे.

टॅग्स :Teacherशिक्षक