शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

दिल्लीत गंभीर परिस्थिती असताना गृहमंत्री झारखंड प्रचारात हे दुर्दैव : सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 15:06 IST

नागरिकत्व विधेयकाच्या दुरुस्तीवरून दिल्लीत सुरू असलेल्या हिंसाचारावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुणे : नागरिकत्व विधेयकाच्या दुरुस्तीवरून दिल्लीत सुरू असलेल्या हिंसाचारावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशात एवढे गंभीर प्रश्न असताना दिल्लीचे पोलीस प्रशासन ज्यांच्या अखत्यारीत काम करते ये गृहमंत्री झारखंड प्रचारात व्यस्त आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. इतकेच नव्हे तर . हे सरकार केंद्रातले निवडणूक ते निवडणूक आणि फक्त प्रचारात व्यस्त असते. त्यांना प्रशासन आणि सर्वसामान्य जनतेचं सुख-दुःख यांच्यासाठी वेळ नसतो असेही त्या म्हणाल्या.पुण्यात सिंचन भवनात झालेल्या बैठकीनंतर सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, अतिशय भयानक परिस्थिती आहे. दिल्लीचे पोलीस हे केंद्र सरकारचे असतात.हे गृह मंत्रालयाचे अजून एक अपयश आहे. इथे भारतात इतके प्रश्न गंभीर असताना, दिल्लीत बस जळत असताना पण देशाचे जबाबदार व्यक्तिमत्व आणि गृहमंत्री हे झारखंडच्या प्रचारात आहेत , हे दुर्दैव आहे. हे सरकार केंद्रातले निवडणूक ते निवडणूक आणि फक्त प्रचारात व्यस्त असते. त्यांना प्रशासन आणि सर्वसामान्य जनतेचं सुख-दुःख यांच्यासाठी वेळ नसते. या सगळ्या झालेल्या गोष्टीचा निषेध करते. पहिला हिंसाचार थांबला पाहिजे, दिल्लीत होत आहे. ज्या भागात आंदोलन केल्यावर लाठीचार्ज होत असेल आणि कॉलेजमध्ये घुसून होत असतील तर हे अतिशय दुर्दैवी आहे आणि देशासाठी घातक आहे.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळे