शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

हिंदू राष्ट्राभिमान पोकळ, ढोंगी : कुमार केतकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 01:38 IST

पुणे : सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या नावाखाली देशात हिंदू राष्ट्र प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांना हिंदू राष्ट्र म्हणजे नेमके काय ...

पुणे : सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या नावाखाली देशात हिंदू राष्ट्र प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांना हिंदू राष्ट्र म्हणजे नेमके काय अभिप्रेत आहे? हिंदू राष्ट्राच्या अभिव्यक्तीमध्ये नागालँड, तमिळनाडू यांचा समावेश आहे का, याचा विचार व्हायला हवा. हिंदू राष्ट्राभिमान पोकळ, ढोंगी आणि धोकादायक आहे, असे प्रतिपादन खासदार कुमार केतकर यांनी केले.

अनुबंध प्रकाशनातर्फे साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी लिखित ‘सांस्कृतिक धोरणाचे वास्तव आणि सांस्कृतिक अनुशेष’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी नितू मांडके सभागृहात झाले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून केतकर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस होते. लेखक अन्वर राजन आणि आकाशवाणीचे वृत्त विभागाचे उपसंचालक नितीन केळकर यांनी पुस्तकावर भाष्य केले.

केतकर म्हणाले, ‘सध्या महाराष्ट्र अज्ञानी अवस्थेत आहे. त्यामुळे कोणतेही ज्ञान राज्यासाठी उद्बोधकच आहे. सांस्कृतिक धोरणाबाबत आठ वर्षांत सरकारकडून काही हालचाली झाल्या नाहीत, याबाबत समाजातून फारशी नाराजी नोंदवली गेली नाही. सभ्यता आणि संस्कृती यांचे अर्थ आणि संदर्भ वेगवेगळे आहेत. माणूस जन्माला आल्यावर लगेच संस्कृती उदयाला आली. आपल्या देशात सांस्कृतिकतेमध्ये कोणत्याही गोष्टीत समान धोरण नाही. सांस्कृतिक धोरण अस्तित्वात आले असते तर देशातील अंतर्गत असंतोष, संघर्ष कमी झाला असता. दहशतवादी म्हटले की इस्लाम, असेच हिंदू राष्ट्रवाद्यांना वाटते. प्रत्यक्षात खलिस्तानवादी हे आद्य दहशतवादी आहेत. १९४७ ते १९७६ या काळातील अखंड भारत हिंदू राष्ट्रवाद्यांना मान्य नव्हता. त्या अखंड भारतातील लोक आता परदेशी कसे ठरतील?’

सबनीस म्हणाले, ‘संस्कृती हा विकासाचा केंद्रबिंदू असला पाहिजे. लोकांची संस्कृती शासन ठरवू शकत नाही. आमचे शासन माणसातले भेद संपवून सौख्य निर्माण करते का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. संविधानातील बंधुत्वाच्या संकल्पनेची कुचंबणा होत आहे.’

टॅग्स :Puneपुणे